शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
2
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
3
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
4
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
5
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
7
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
8
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
9
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
10
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
11
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
12
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
13
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
14
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
15
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
16
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
17
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
18
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
19
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
20
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

आर्थिक संकटातून निघणार बेस्ट मार्ग

By admin | Updated: March 27, 2017 20:11 IST

आर्थिक संकटात असलेल्या बेस्ट या सार्वजनिक उपक्रमाला मदतीचा हात देण्यासाठी महापालिकेने अखेर पावलं उचलली आहेत

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 27 - आर्थिक संकटात असलेल्या बेस्ट या सार्वजनिक उपक्रमाला मदतीचा हात देण्यासाठी महापालिकेने अखेर पावलं उचलली आहेत. त्यानुसार महापालिका आणि बेस्टचा अर्थसंकल्प एकत्रित करण्याबाबत सर्वपक्षीय गटनेत्यांच्या बैठकीत आज चर्चा करण्यात आली. बेस्ट प्रशासनाने याबाबत दोन दिवसांत अहवाल सादर केल्यानंतर यावर निर्णय होणार आहे.गेली अनेक वर्षे बेस्ट उपक्रम तोट्यात आहे. उत्पन्नाहून खर्चच अधिक असल्याने बेस्टचे वाहतूक विभाग तुटीत आहे, हे कर्जाचे डोंगर वर्षागणिक वाढत असल्याने बेस्ट उपक्रमाला टाळे लागण्याची वेळ आली आहे. कामगारांचे फेब्रुवारी महिन्याचे वेतन देण्यासाठी बेस्टकडे पैसे नव्हते. त्यामुळे पालक संस्था म्हणून महापालिकेने बेस्ट उपक्रमाला सावरावे, अशी मागणी जोर धरत आहे. या संकटातून बेस्टला कसे बाहेर काढता येईल? याबाबतचा कृती आराखडाच तयार करण्यात आला आहे. महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या दालनात आज झालेल्या सर्वपक्षीय गटनेत्यांच्या बैठकीत यावर चर्चा करण्यात आली. बेस्ट आणि पालिकेचा अर्थसंकल्प एकत्र करून मांडल्यास बेस्टला पालिकेतून आर्थिक मदत करणे शक्य होईल, असे गटनेत्यांचे मत या बैठकीत तयार झाले. याबाबत दोन दिवसांत अहवाल सादर करून आपली मागणी ठेवण्याची सूचना बेस्टचे महाव्यवस्थापक जगदीश पाटील यांना महापौरांनी केली आहे.वचननाम्यामुळे शिवसेना बांधीलशिवसेनेने महापालिकेच्या निवडणुकीवेळी बेस्टला आर्थिक संकटातून बाहेर काढून मुंबईकरांचा प्रवास जलद आणि सुखकर करण्याची हमी दिली होती. मुंबई महापालिकेवर एकहाती सत्ता आल्यामुळे आपले वचन पाळण्यास शिवसेना बांधील आहे. त्यामुळे बेस्ट व महापालिकेचा अर्थसंकल्प एकत्रित करण्यासाठी शिवसेनेची धावपळ सुरू आहे.कायद्याची अडचणबेस्ट आणि महापालिकेचा अर्थसंकल्प एकत्रित केल्यास तुटीतून बाहेर पडण्याचा मार्ग बेस्टला सापडणार आहे. मात्र यासाठी बेस्ट आणि पालिकेच्या कायद्यात तरतूद करावी लागणार आहे. याबाबत बुधवारी पुन्हा महापौरांच्या दालनात बैठक होणार आहे. यावर असेल अहवालमहापालिकेकडून बेस्टला कोणत्या स्वरुपात मदत करता येईल, याबाबत सविस्तर अहवाल दोन दिवसांत सादर करण्याची शिफारस करण्यात आली आहे. बेस्ट उपक्रमाने पालिकेकडे एक हजार कोटी रुपयांची मागणी केली आहे. तर २०१३ मध्ये बेस्टला १६०० कोटी रुपयांचे कर्ज दहा टक्के व्याजाने महापालिकेने दिले होते. त्यातील ९०० कोटी रुपयांची बेस्टने परतफेड केली आहे. त्यामुळे आणखी निधी दिल्यास आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी बेस्ट कोणती पावलं उचलणार, यावर सविस्तर आराखडा बेस्टला द्यावा लागणार आहे.शिवसेनेची भाजपाला गुगलीराज्य व केंद्र सरकारला मुंबईतून कर जातो़ हा कर कोट्यवधी रुपयांचा असल्याने येथील सार्वजनिक उपक्रम वाचविण्यासाठी त्यांचे योगदानही अपेक्षित आहे, अशी गुगली महापौरांनी भाजपा सरकारपुढे टाकली आहे.