शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

वीज समस्यांसाठी ‘बेस्ट’ सज्ज

By admin | Updated: June 11, 2016 02:16 IST

पावसाळ्यात वीजपुरवठा खंडित होऊन तसेच विजेचा झटका बसून अपघातांचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते.

मुंबई : पावसाळ्यात वीजपुरवठा खंडित होऊन तसेच विजेचा झटका बसून अपघातांचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते. अशा घटना घडू नयेत आणि घडल्या तरी त्याचा सामना करता यावा म्हणून पावसाळ्यासाठी आता बेस्ट उपक्रम सज्ज झाले आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजनांसह वीज ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी जागोजागी अतिरिक्त कर्मचारी वर्गाची नेमणूक करण्यात येणार असून, खंडित झालेला वीजपुरवठा कमी कालावधीत सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.मुंबई शहर आणि उपनगरांत बेस्ट, रिलायन्स, टाटा आणि महावितरण अशा चार वीज कंपन्यांकडून वीजपुरवठा केला जात आहे. उपनगरांत वीजपुरवठा करणाऱ्या रिलायन्स आणि टाटाने यापूर्वीच आपल्या वीज ग्राहकांसाठी मान्सून काळातील हेल्पलाइन सुरू केल्या आहेत. शिवाय आपत्कालीन परिस्थितीत वीजग्राहकांना मदत करण्यासाठी पथकेही तयार ठेवली आहेत. आता शहरात वीजपुरवठा करणाऱ्या बेस्टनेही मान्सूनसाठी सज्जता दाखवली आहे. मान्सून काळात वीज ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी बेस्टने कॉल सेंटर प्रस्थापित केले आहेत. हे कॉल सेंटर बिघाड दुरुस्ती केंद्र आणि देखरेख यंत्रणेशी जोडण्यात आले आहे. वीज ग्राहकांनी मान्सून काळात आपत्कालीन परिस्थितीची माहिती कॉल सेंटरवर कळवल्यास त्याचे निवारण जलदगतीने करणे बेस्टला सुलभ जाणार आहे. (प्रतिनिधी)आपत्कालीनप्रसंगी खबरदारीचे उपाय म्हणून बेस्टला वीजपुरवठा बंद करावा लागतो. या काळात दाखल होत असलेल्या तक्रारींचे प्रमाण, त्याचे स्वरूप, पाणी तुंबल्यामुळे भूमिगत वीज वाहिन्या शोधण्यास होणारा विलंब आणि कर्मचारी वर्गाला कामावर हजर राहण्यास निर्माण होणाऱ्या अडचणी या घटकांचा विचार करता आणीबाणीच्या वीज ग्राहकांनी या काळात सहकार्य करावे, असे आवाहन बेस्टने केले आहे.>विद्युत पुरवठा खंडित होणे व इतर तक्रारींसाठी २२८४३९३९ या क्रमांकावर संपर्क साधावा.>वीज ग्राहकांनो हे करा...पावसापासून बचाव करण्यासाठी वीज मीटर केबीन सिमेंटने बांधून घ्या.केबीन जमिनीपासून उंचावर बांधा.लाकडी केबीन सुरक्षित करा.परवानाधारक विद्युत ठेकेदराकडून वायरिंग तपासा.वीज मीटर केबीनमध्ये पावसाचे पाणी शिरल्यास मुख्य स्विच बंद करा.त्रुटी पूर्णपणे दूर झाल्यानंतर विजेचे स्विच सुरू करा.>वीज ग्राहकांनो हे करू नका...केबीनमध्ये पाणी गळत असल्यास हातमोजे, रबरी बूट, लाकडी साहित्याचा वापर केल्याशिवाय मीटर केबीनला स्पर्श करू नका.विद्युत ठिणगी पडत असेल तर केबीनला स्पर्श करू नका.ज्या सदनिकांना, घरांना अथवा इमारतींना तात्पुरता वीजपुरवठा देण्यात आला आहे त्यांनी फक्त अत्यावश्यक उपकरणांचा वापर करावा.