शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
2
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
3
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
4
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
5
आधी ४५ कोटींचे मेट्रो स्टेशन बनवले, नंतर लक्षात आलं की उंची कमी झाली; मग...; हा जुगाड जाणून डोक्यावर हात माराल
6
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
7
वीज चमकली की सुरू होतं काउंटडाउन!… काय आहे क्रिकेटच्या मैदानात क्वचित लागू होणारा '30:30 नियम'?
8
चॉकलेट की बिस्किट... आरोग्यासाठी जास्त धोकादायक काय? खाण्याआधी एकदा विचार कराच
9
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
10
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
11
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
12
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
13
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
14
Mumbai: कूपर रुग्णालयात मृत रुग्णाच्या नातेवाईकाकडून डॉक्टरांना मारहाण
15
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
16
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
17
लय मोठा विषय चाललाय! चीन, पाकिस्तान अन् बांगलादेशला एकाचवेळी झटका; भारतीय सैन्य काय करतंय?
18
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!
19
बिहार निवडणुकीनंतर भाजपाला मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष? बड्या नेत्याने दिले सूचक संकेत
20
स्टंटबाजी करणाऱ्या टवाळखोरामुळं युवती जीवाला मुकली; ११० च्या स्पीडनं उडवलं, दात तुटले अन्...

‘बेस्ट’चा दरवाढ प्रस्ताव

By admin | Updated: April 7, 2017 06:10 IST

आर्थिक संकटातून बाहेर पाडण्यासाठी बेस्ट प्रशासनाने काढलेला मार्ग मुंबईकरांच्या खिशाला चाट देणारा आहे.

मुंबई: आर्थिक संकटातून बाहेर पाडण्यासाठी बेस्ट प्रशासनाने काढलेला मार्ग मुंबईकरांच्या खिशाला चाट देणारा आहे. गेल्या वर्षीच तिकिटांच्या दरांमध्ये दोनदा वाढ करणाऱ्या बेस्टने पुन्हा भाववाढ सुचवली आहे. यावेळेस ही भाववाढ थेट ५० टक्के असेल. त्यामुळे किमान बस भाडे आठ रुपयांवरून १२ रुपये करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. हा प्रस्ताव बेस्ट समितीच्या पटलावर चर्चेसाठी येणार आहे. पालिका प्रशासनाने मदतीचा हात देण्याआधी काही अटी ठेवल्या आहेत. हा काटकसरीचा कृती आराखडा बेस्ट समितीच्या बैठकीपुढे प्रशासनाने ठेवला आहे. यात कामगार महागाई भत्ता गोठवण्यापासून विविध भत्यांना कात्री लावण्याची शिफारस आहे. त्यानुसार कामगारांचा महागाई भत्ता १ एप्रिल २०१७ पासून गोठवण्यात येईल. वातानुकूलीत बस सेवा बंद, सर्वसाधारण- मर्यादिता बस तिकिटात कि.मी. मागे चार रुपये वाढ प्रस्तावित आहे. पांढरा हत्ती ठरलेली वातानुकूलित बस सेवा बंद करण्यात येईल. तत्पूर्वी त्याचे किमान भाडे १५ रुपयांवरून २५ रुपये करण्यात येईल. याबरोबरच मासिक बसपासमध्ये वाढ, विद्यार्थी आणि पत्रकारांना दिलेल्या सवलती रद्द करून त्यात वाढ करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. मात्र ही वाढ केल्यास प्रवाशांमध्ये आणखी घट होईल. त्यामुळे भाडेवाढीचा प्रस्ताव बेस्टसाठी पायावर धोंडा पाडून घेण्यासारखा असल्याची भीती नगरसेवकांकडून व्यक्त होत आहे. भत्ते, सवलतींना कात्रीएप्रिल २०१७ पासून महागाई भत्ता गोठवणे, वैद्यकीय भत्ता खंडित करणे, रजा प्रवास सहाय भत्ता, दूरध्वनी देयकांची बिले सेवा बंद करणे. सोबतच पाल्यांच्या वह्या, पुस्तके खरेदीवर आर्थिक मदत शिष्यावृत्ती योजना, वेतनश्रेणी आणि अन्य भत्ते इत्यादींच्या पुनर्रिक्षणाच्या बाबतीतील करार, नियमित होणाऱ्या विविध पदांच्या भरतीला स्थगिती दिली आहे.यासोबतच बस मागार्चे सुसूत्रीकरण, बसताफ्यांची पुनर्रचना, वातानुकुलित बससेवा बंद करणे यासह भाडेतत्त्वावर बसगाड्या घेणे, प्रवास भाड्याची पुनर्रचना, बस पास दरात वाढ, विद्यार्थ्यांच्या बसपास दरात वाढ, आनंदयात्री योजना रद्द करणे, सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांच्या बसपास दरात वाढ, पत्रकारांच्या बसपास दरात वाढ प्रस्तावित करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)>बेस्ट कर्मचारी जाणार संपावरबेस्ट प्रशासनाकडून कामगारांच्या सेवाशर्तीमध्ये सुरू असलेले बदल बेकायदेशीर असल्याचा आरोप करत दि बेस्ट वर्कर्स युनियनने बेस्ट प्रशासनाला संपाची नोटीस दिली आहे. प्रशासनाने सेवाशर्तींमध्ये बदल केल्यास १४ दिवसांनंतर युनियनचे सर्व कर्मचारी बेमुदत संपावर जातील, अशी माहिती युनियनचे सरचिटणीस शशांक राव यांनी दिली. यामुळे कर्मचाऱ्यांवर प्रचंड आर्थिक ताण येणार असल्याचे राव यांचे म्हणणे आहे. त्यामुळे संपावर जाण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.सर्वसाधारण बस भाडेकि.मी. विद्यमान दरप्रस्तावित दर २८१२४१०१४ ६१४१८ ८१६२०१०१८२२ १२२०२४१४२२२६ १७२४२८