शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
5
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
6
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
7
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
8
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
9
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
10
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
11
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
12
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
13
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
16
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
17
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
18
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
19
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
20
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?

...अखेर बेस्ट संप १६ तासांनी मिटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2017 05:10 IST

रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर बेस्ट कामगारांनी पुकारलेला संप अखेर १६ तासांनी मागे घेण्यात आला. दर महिन्याचा पगार १० तारखेपर्यंत देण्याची जबाबदारी महापालिकेने स्वीकारली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर बेस्ट कामगारांनी पुकारलेला संप अखेर १६ तासांनी मागे घेण्यात आला. दर महिन्याचा पगार १० तारखेपर्यंत देण्याची जबाबदारी महापालिकेने स्वीकारली आहे. तरीही लेखी आश्वासनासाठी अडून बसलेले कामगार नेते, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या तोंडी आश्वासनानंतर नरमले. मात्र, ऐन सणासुदीच्या काळात बेस्ट सेवा बंद असल्याने मुंबईकरांचे अतोनात हाल झाले.बेस्ट उपक्रमाची आर्थिक कोंडी फोडण्यासाठी गेले काही महिने महापालिका आणि बेस्ट प्रशासनामध्ये चर्चा सुरू होती. मात्र, महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या दालनात सहा वेळा झालेल्या बैठका निष्फळ ठरल्याने, कामगारांनी बेमुदत उपोषण सुरू केले. या आंदोलनाची दखल कोणी घेत नसल्याचे पाहून कामगारांनी संपाचा इशारा दिला. यावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी बैठक बोलावली होती. या बैठकीत बेस्ट कर्मचाºयांचा पगार १० तारखेपर्यंत देण्याचे आयुक्त अजय मेहता यांनी मान्य केले, परंतु असे लेखी आश्वासन देण्यास ते तयार नसल्याने, कामगार संघटनांनी रविवारी मध्यरात्रीपासून संप पुकारला. या संपात ३६ हजार कामगार-कर्मचारी सहभागी झाल्यामुळे बससेवा ठप्प झाली.बेस्ट उपक्रम म्हणजे, मुंबईची दुसरी लाइफ लाइन असल्याने, मुंबईकरांचे सोमवारी दिवसभर प्रचंड हाल झाले. ज्याचा पुरेपूर फायदा उठवित, रिक्षा, टॅक्सी व खासगी बस वाहतुकीने प्रवाशांकडून दामदुप्पट पैसे उकळत आपले खिसे भरले.उद्धव ठाकरेंची दिलगिरीशिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी दुपारी मातोश्रीवर कामगार नेत्यांची बैठक बोलावली. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी बेस्टची जबाबदारी घेण्याची तयारी दाखविली. बेस्टचे पगार वेळेत होतील, याची शाश्वती त्यांनी कामगार नेत्यांना दिली.मात्र, हे आश्वासनही तोंडीच असताना, बेस्ट कामगार कृती समितीने संप मागे घेतल्याचे जाहीर केले. कामगार नेत्यांनी संपाचे हत्यार म्यान केल्याने, कामगार सायंकाळी कामावर रूजू झाले. त्यानंतर, बेस्ट बस गाड्या पुन्हा रस्त्यावर धावू लागल्या आणि प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.रक्षाबंधनानिमित्त सकाळी घराबाहेर पडलेल्या मुंबईकरांचे बेस्ट संपामुळे हाल झाले, याबद्दल उद्धव ठाकरे यांनी बैठकीनंतर मुंबईकरांची माफी मागितली. या संपामुळे प्रवाशांचे हाल झाले. याबाबत आपण दिलगीर आहोत, असे त्यांनी सांगितले.