शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
3
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
4
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
6
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
7
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
8
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
9
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
10
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
11
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
12
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
13
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
14
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
15
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
16
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
17
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
18
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
19
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
20
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'

...अखेर बेस्ट संप १६ तासांनी मिटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2017 05:10 IST

रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर बेस्ट कामगारांनी पुकारलेला संप अखेर १६ तासांनी मागे घेण्यात आला. दर महिन्याचा पगार १० तारखेपर्यंत देण्याची जबाबदारी महापालिकेने स्वीकारली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर बेस्ट कामगारांनी पुकारलेला संप अखेर १६ तासांनी मागे घेण्यात आला. दर महिन्याचा पगार १० तारखेपर्यंत देण्याची जबाबदारी महापालिकेने स्वीकारली आहे. तरीही लेखी आश्वासनासाठी अडून बसलेले कामगार नेते, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या तोंडी आश्वासनानंतर नरमले. मात्र, ऐन सणासुदीच्या काळात बेस्ट सेवा बंद असल्याने मुंबईकरांचे अतोनात हाल झाले.बेस्ट उपक्रमाची आर्थिक कोंडी फोडण्यासाठी गेले काही महिने महापालिका आणि बेस्ट प्रशासनामध्ये चर्चा सुरू होती. मात्र, महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या दालनात सहा वेळा झालेल्या बैठका निष्फळ ठरल्याने, कामगारांनी बेमुदत उपोषण सुरू केले. या आंदोलनाची दखल कोणी घेत नसल्याचे पाहून कामगारांनी संपाचा इशारा दिला. यावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी बैठक बोलावली होती. या बैठकीत बेस्ट कर्मचाºयांचा पगार १० तारखेपर्यंत देण्याचे आयुक्त अजय मेहता यांनी मान्य केले, परंतु असे लेखी आश्वासन देण्यास ते तयार नसल्याने, कामगार संघटनांनी रविवारी मध्यरात्रीपासून संप पुकारला. या संपात ३६ हजार कामगार-कर्मचारी सहभागी झाल्यामुळे बससेवा ठप्प झाली.बेस्ट उपक्रम म्हणजे, मुंबईची दुसरी लाइफ लाइन असल्याने, मुंबईकरांचे सोमवारी दिवसभर प्रचंड हाल झाले. ज्याचा पुरेपूर फायदा उठवित, रिक्षा, टॅक्सी व खासगी बस वाहतुकीने प्रवाशांकडून दामदुप्पट पैसे उकळत आपले खिसे भरले.उद्धव ठाकरेंची दिलगिरीशिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी दुपारी मातोश्रीवर कामगार नेत्यांची बैठक बोलावली. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी बेस्टची जबाबदारी घेण्याची तयारी दाखविली. बेस्टचे पगार वेळेत होतील, याची शाश्वती त्यांनी कामगार नेत्यांना दिली.मात्र, हे आश्वासनही तोंडीच असताना, बेस्ट कामगार कृती समितीने संप मागे घेतल्याचे जाहीर केले. कामगार नेत्यांनी संपाचे हत्यार म्यान केल्याने, कामगार सायंकाळी कामावर रूजू झाले. त्यानंतर, बेस्ट बस गाड्या पुन्हा रस्त्यावर धावू लागल्या आणि प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.रक्षाबंधनानिमित्त सकाळी घराबाहेर पडलेल्या मुंबईकरांचे बेस्ट संपामुळे हाल झाले, याबद्दल उद्धव ठाकरे यांनी बैठकीनंतर मुंबईकरांची माफी मागितली. या संपामुळे प्रवाशांचे हाल झाले. याबाबत आपण दिलगीर आहोत, असे त्यांनी सांगितले.