शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

...अखेर बेस्ट संप १६ तासांनी मिटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2017 05:10 IST

रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर बेस्ट कामगारांनी पुकारलेला संप अखेर १६ तासांनी मागे घेण्यात आला. दर महिन्याचा पगार १० तारखेपर्यंत देण्याची जबाबदारी महापालिकेने स्वीकारली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर बेस्ट कामगारांनी पुकारलेला संप अखेर १६ तासांनी मागे घेण्यात आला. दर महिन्याचा पगार १० तारखेपर्यंत देण्याची जबाबदारी महापालिकेने स्वीकारली आहे. तरीही लेखी आश्वासनासाठी अडून बसलेले कामगार नेते, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या तोंडी आश्वासनानंतर नरमले. मात्र, ऐन सणासुदीच्या काळात बेस्ट सेवा बंद असल्याने मुंबईकरांचे अतोनात हाल झाले.बेस्ट उपक्रमाची आर्थिक कोंडी फोडण्यासाठी गेले काही महिने महापालिका आणि बेस्ट प्रशासनामध्ये चर्चा सुरू होती. मात्र, महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या दालनात सहा वेळा झालेल्या बैठका निष्फळ ठरल्याने, कामगारांनी बेमुदत उपोषण सुरू केले. या आंदोलनाची दखल कोणी घेत नसल्याचे पाहून कामगारांनी संपाचा इशारा दिला. यावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी बैठक बोलावली होती. या बैठकीत बेस्ट कर्मचाºयांचा पगार १० तारखेपर्यंत देण्याचे आयुक्त अजय मेहता यांनी मान्य केले, परंतु असे लेखी आश्वासन देण्यास ते तयार नसल्याने, कामगार संघटनांनी रविवारी मध्यरात्रीपासून संप पुकारला. या संपात ३६ हजार कामगार-कर्मचारी सहभागी झाल्यामुळे बससेवा ठप्प झाली.बेस्ट उपक्रम म्हणजे, मुंबईची दुसरी लाइफ लाइन असल्याने, मुंबईकरांचे सोमवारी दिवसभर प्रचंड हाल झाले. ज्याचा पुरेपूर फायदा उठवित, रिक्षा, टॅक्सी व खासगी बस वाहतुकीने प्रवाशांकडून दामदुप्पट पैसे उकळत आपले खिसे भरले.उद्धव ठाकरेंची दिलगिरीशिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी दुपारी मातोश्रीवर कामगार नेत्यांची बैठक बोलावली. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी बेस्टची जबाबदारी घेण्याची तयारी दाखविली. बेस्टचे पगार वेळेत होतील, याची शाश्वती त्यांनी कामगार नेत्यांना दिली.मात्र, हे आश्वासनही तोंडीच असताना, बेस्ट कामगार कृती समितीने संप मागे घेतल्याचे जाहीर केले. कामगार नेत्यांनी संपाचे हत्यार म्यान केल्याने, कामगार सायंकाळी कामावर रूजू झाले. त्यानंतर, बेस्ट बस गाड्या पुन्हा रस्त्यावर धावू लागल्या आणि प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.रक्षाबंधनानिमित्त सकाळी घराबाहेर पडलेल्या मुंबईकरांचे बेस्ट संपामुळे हाल झाले, याबद्दल उद्धव ठाकरे यांनी बैठकीनंतर मुंबईकरांची माफी मागितली. या संपामुळे प्रवाशांचे हाल झाले. याबाबत आपण दिलगीर आहोत, असे त्यांनी सांगितले.