शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
3
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
4
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
5
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
6
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
7
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
8
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
9
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
10
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
11
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
12
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
13
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
14
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
15
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
16
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
17
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
18
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
19
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
20
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी

अन्नसुरक्षा योजनेचा लाभ व्हावा

By admin | Updated: September 7, 2015 01:56 IST

दुष्काळामुळे रोजीरोटीसाठी मुंबईत आलेल्या विदर्भ व मराठवाड्यातील दुष्काळग्रस्तांची फरफट सुरूच आहे. दिवसभर काम करून मिळालेल्या पैशातून रोजचा उदरनिर्वाह करावा लागत आहे

प्राची सोनवणे, नवी मुंबईदुष्काळामुळे रोजीरोटीसाठी मुंबईत आलेल्या विदर्भ व मराठवाड्यातील दुष्काळग्रस्तांची फरफट सुरूच आहे. दिवसभर काम करून मिळालेल्या पैशातून रोजचा उदरनिर्वाह करावा लागत आहे. महागाईमुळे अन्नधान्य खरेदी करणेही परवडत नाही. शासनाने विशेष बाब म्हणून अन्न सुरक्षा योजनेचा लाभ या नागरिकांना मिळवून द्यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे. राज्यात पडलेल्या भीषण दुष्काळामुळे ग्रामीण भागातील अनेक नागरिकांनी मुंबईत स्थलांतर सुरू केले आहे. गावाकडे हाताला काम नाही, पिण्याला पाणी नसल्यामुळे मुंबईमध्ये मिळेल ते काम करून संसाराचा गाडा चालविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. परंतु येथे आल्यानंतरही त्यांची फरफट संपलेली नाही. उड्डाणपूल व झोपड्यांचा आधार घेवून कसेतरी जीवन जगत आहेत. नाका कामगार म्हणून काम करून मिळालेल्या पैशातून दोन वेळचे जेवण करत आहेत. अन्नधान्य व डाळींच्या किमती गगनाला भिडल्यामुळे रोजंदारीचे पैसे धान्य खरेदी करायला कमी पडू लागले असून अनेकांना उपाशीपोटी झोपावे लागत आहे. आघाडी शासनाने २०१४ मध्ये अन्नसुरक्षा योजना सुरू केली होती. देशातील ८१ कोटी नागरिकांना त्याचा लाभ होवू लागला होता. महाराष्ट्रात या योजनेची सुरवात नवी मुंबईमधील पटणी मैदानामध्ये १ फेब्रुवारी २०१४ ला तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी या योजनेचा शुभारंभ करून राज्यातील एकही नागरिक यापुढे उपाशी राहणार नसल्याचे आश्वासन दिले होते. २ रुपये किलो दराने गहू व ३ रुपये किलो दराने तांदूळ रेशनवर देण्यास शुभारंभ केला होता. यापूर्वी बेघर नागरिकांनाही तात्पुरत्या शिधापत्रिका देवून त्यांना अन्न सुरक्षा योजनेचा लाभ मिळवून दिला जात होता. कमी दरात अन्नधान्य मिळाल्यामुळे गरीब नागरिकांना दोन वेळचे पोटभर जेवण मिळत होते. आता तशी कोणतीही योजना नाही. यामुळे मुंबईत स्थलांतरित झालेल्या दुष्काळग्रस्तांना त्याचा फटका बसत आहे. नागरिकांना खाजगी दुकानांमधून धान्य घ्यावे लागत आहे. डाळीच्या किमती १०० ते १५० रुपयांवर गेल्या आहेत. महागाईमुळे मुंबईत जगणे अशक्य होवू लागले आहे. शासनाने दुष्काळग्रस्तांसाठी विशेष बाब म्हणून अन्न सुरक्षा योजनेचा लाभ मिळवून द्यावा. शासनाने रेशनवर धान्य देण्याचा निर्णय घेतला तर शिधापत्रिका दुकानांच्या माध्यमातून सर्वेक्षण करून त्यांना मोफत धान्य देता येवू शकते. त्यामुळे शासनाने याविषयी ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी आदर्श सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष शिवाजी जाधव यांनी केली आहे.