शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
3
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
4
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
5
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
6
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
7
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
8
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
9
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
10
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
11
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
12
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
13
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
14
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
15
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
16
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
17
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
18
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
19
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
20
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड

८ टक्क्यांहून कमी ‘एससीं’ना शैक्षणिक आरक्षणाचा लाभ

By admin | Updated: June 10, 2015 02:19 IST

अनुसूचित जातींना शैक्षणिक क्षेत्रात देण्यात आलेल्या आरक्षणाचा लाभ घेण्यात ते कमी पडत असल्याचे टाटा इन्स्टिट्यूट आॅॅफ सोशल सायन्सेसच्या पाहणीतून समोर आले आहे.

मुंबई : अनुसूचित जातींना शैक्षणिक क्षेत्रात देण्यात आलेल्या आरक्षणाचा लाभ घेण्यात ते कमी पडत असल्याचे टाटा इन्स्टिट्यूट आॅॅफ सोशल सायन्सेस (टीआयएसएस)च्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका अहवालावरून दिसून येत आहे. शैक्षणिक क्षेत्रातील आरक्षणाचा लाभ राज्यातील अनुसूचित जातींच्या केवळ ७.६ टक्के घरांपर्यंतच पोहोचत असल्याचा निष्कर्ष या अहवालातून काढण्यात आलेला आहे.टीआयएसएसने राज्यातील नागपूर, मुंबई, सिंधुदुर्ग, उस्मानाबाद आणि जळगाव या पाच जिल्ह्यांत दीड हजारांहून अधिक कुटुंबांचे सर्वेक्षण केले. त्यापैकी १,१२० कुटुंब अनुसूचित जातींची, तर ४६६ कुटुंब इतर (ओबीसी, मुस्लीम आदी) गटातील होती. सर्वेक्षणात प्रामुख्याने ८व्या इयत्तेपुढचे विद्यार्थी, पालक, शिक्षक, कुटुंबप्रमुख आणि शाळा-महाविद्यालयांच्या प्रमुखांचा समावेश करण्यात आला होता. आरक्षण असूनही ज्ञानगंगा अद्याप अनेक घरांपर्यंत पोहोचू शकत नसल्याचेच या सर्वेक्षणातून सिद्ध झाले. शैक्षणिक संस्थांच्या प्रशासनांची अनास्था, संबंधित अधिकाऱ्यांकडून होणारे दुर्लक्ष आणि तत्सम कारणांमुळे ६७ टक्के एससी विद्यार्थ्यांना आरक्षित जागांवर प्रवेशापासून वंचित राहावे लागते, असे यातून दिसून आले.परंतु, असे असले तरीही शाळेत शिक्षण घेताना मात्र कोणत्याही भेदभावाला सामोरे जावे लागत नसल्याचे तब्बल ९६.३ टक्के विद्यार्थ्यांनी सांगितले. महाविद्यालयांमध्येही सामाजिक किंवा आर्थिक स्थितीवरून भेदभाव नसल्याचे ६४.५ टक्के मुलांनी म्हटले. मात्र त्याच वेळी ११.४ टक्के मुलांनी वारंवार आणि १८.६ टक्के मुलांनी काही वेळा भेदभावाचा अनुभव घेतल्याचे नमूद केले. ‘तुमच्या पात्रतेमुळे नव्हेतर आरक्षणामुळे तुम्हाला या महाविद्यालयात प्रवेश मिळाला.’, ‘तुम्ही आमच्या जागा बळाविल्या आहेत,’ अशी शेरेबाजी ऐकावी लागत असल्याचे या मुलांनी सांगितले. अनुसूचित जातीच्या ८०.५ टक्के लोकांना मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तींबद्दल माहिती आहे. परंतु, केवळ १७.६ टक्के लोकांनाच त्याचा लाभ घेता आलाय. अनुसूचित जातीतील २३.४ कुटुंबांना मुलाने डॉक्टर-इंजिनीअर व्हावे असे वाटते; तर १९.६ टक्के कुटुंबांना मुलांनी शिक्षक-पीएच.डी.धारक-संशोधक व्हावे, असे वाटते.