शहरं
Join us  
Trending Stories
1
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
2
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
3
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
4
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
5
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
6
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
7
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
8
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
9
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
10
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना
11
IND vs ENG: कसोटी मालिकेआधी इग्लंडच्या उपकर्णधाराला विराट कोहलीची आठवण, म्हणाला...
12
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
13
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
14
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
15
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 
16
दोन मुलांची आई १७ वर्षांच्या तरुणाच्या प्रेमात पडली, वर्ष झालं पिच्छा सोडेना, अखेर तरुणाने 'असा' शिकवला धडा! 
17
खळबळजनक! ४ लाख फॉलोअर्स असलेल्या महिला इन्फ्लुएन्सरचा कारमध्ये सापडला मृतदेह
18
WTC Final : शमीला मागे टाकत स्टार्कनं सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड; त्यात टीम इंडियाचा मोठा हातभार
19
"पाकिस्तान्यांचा नानांना भलताच कळवळा?, तुमचा आणि तुमच्या मालकाचा डीएनए एकच...देशद्रोह"

‘बेळगावी’ कायदेशीरदृष्ट्या अशक्यच

By admin | Updated: October 13, 2014 05:16 IST

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी १ नोव्हेंबरला बेळगावचे ‘बेळगावी’ असे नामांतर करण्याची अधिकृतपणे घोषणा करणार असल्याचे जाहीर केले आहे.

कोल्हापूर : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी १ नोव्हेंबरला बेळगावचे ‘बेळगावी’ असे नामांतर करण्याची अधिकृतपणे घोषणा करणार असल्याचे जाहीर केले आहे. मात्र कोणत्याही शहराचे नाव बदलताना ठोस असा ऐतिहासिक संदर्भ गरजेचा असतो. एकतर्फी बदल करता येत नाही. ते बदलण्यासाठी केंद्र सरकारची मंजुरी आवश्यक असते. केंद्र शासनाकडून मंजुरी मिळालेली नसल्याने ‘बेळगावी’ नामकरण करणे कायदेशीरदृष्ट्या अशक्य आहे.बेळगाव, निपाणी, कारवार, बिदर, भालकीसह ८१४ मराठीबहुल गावे महाराष्ट्रात सामाविष्ट करावीत, अशी अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माध्यमातून लोकशाही मार्गाने दीर्घकाळ लढा सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयात प्रकरण गेल्यानंतर जाणीवपूर्वक सीमाभागात सक्तीने कानडीकरणाचा वरवंटा फिरवत आहे. कन्नडची सक्ती करीत आहे. आता मराठी भाषिकांच्या जखमेवर मीठ चोळण्यासाठी बेळगावचे ‘बेळगावी’ असे नामकरण करण्याचा घाट घातला आहे. परंतु, केंद्र शासनाच्या १९५३ सालच्या मार्गदर्शक तत्त्वात बसल्यास व कोणाचाही आक्षेप नसल्यास, तसेच ऐतिहासिक संदर्भ असल्यास नाव बदलण्यासाठी केंद्र सरकार मंजुरी देते.‘बेळगावी’ नामकरण करण्याच्या कर्नाटक शासनाच्या प्रस्तावाच्या विरोधात सन २००८ मध्ये उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली. ही याचिका उच्च न्यायालयाने सर्वेअर जनरल आॅफ इंडियाकडे वर्ग केली. मात्र, ‘बेळगावी’संबंधी सर्वेअर जनरल आॅफ इंडियाने स्पष्ट निकाल दिला नाही. त्यामुळे पुन्हा एकदा त्या विरोधातयाचिका दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे, असे बेळगावचे सीमा खटल्यातील वकील माधवराव चव्हाण यांनी ’लोकमत’शी बोलताना सांंगितले. (प्रतिनिधी)