शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

‘बेळगावी’ कायदेशीरदृष्ट्या अशक्यच

By admin | Updated: October 13, 2014 05:16 IST

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी १ नोव्हेंबरला बेळगावचे ‘बेळगावी’ असे नामांतर करण्याची अधिकृतपणे घोषणा करणार असल्याचे जाहीर केले आहे.

कोल्हापूर : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी १ नोव्हेंबरला बेळगावचे ‘बेळगावी’ असे नामांतर करण्याची अधिकृतपणे घोषणा करणार असल्याचे जाहीर केले आहे. मात्र कोणत्याही शहराचे नाव बदलताना ठोस असा ऐतिहासिक संदर्भ गरजेचा असतो. एकतर्फी बदल करता येत नाही. ते बदलण्यासाठी केंद्र सरकारची मंजुरी आवश्यक असते. केंद्र शासनाकडून मंजुरी मिळालेली नसल्याने ‘बेळगावी’ नामकरण करणे कायदेशीरदृष्ट्या अशक्य आहे.बेळगाव, निपाणी, कारवार, बिदर, भालकीसह ८१४ मराठीबहुल गावे महाराष्ट्रात सामाविष्ट करावीत, अशी अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माध्यमातून लोकशाही मार्गाने दीर्घकाळ लढा सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयात प्रकरण गेल्यानंतर जाणीवपूर्वक सीमाभागात सक्तीने कानडीकरणाचा वरवंटा फिरवत आहे. कन्नडची सक्ती करीत आहे. आता मराठी भाषिकांच्या जखमेवर मीठ चोळण्यासाठी बेळगावचे ‘बेळगावी’ असे नामकरण करण्याचा घाट घातला आहे. परंतु, केंद्र शासनाच्या १९५३ सालच्या मार्गदर्शक तत्त्वात बसल्यास व कोणाचाही आक्षेप नसल्यास, तसेच ऐतिहासिक संदर्भ असल्यास नाव बदलण्यासाठी केंद्र सरकार मंजुरी देते.‘बेळगावी’ नामकरण करण्याच्या कर्नाटक शासनाच्या प्रस्तावाच्या विरोधात सन २००८ मध्ये उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली. ही याचिका उच्च न्यायालयाने सर्वेअर जनरल आॅफ इंडियाकडे वर्ग केली. मात्र, ‘बेळगावी’संबंधी सर्वेअर जनरल आॅफ इंडियाने स्पष्ट निकाल दिला नाही. त्यामुळे पुन्हा एकदा त्या विरोधातयाचिका दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे, असे बेळगावचे सीमा खटल्यातील वकील माधवराव चव्हाण यांनी ’लोकमत’शी बोलताना सांंगितले. (प्रतिनिधी)