शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
3
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
4
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
5
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
6
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
7
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
8
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
9
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
10
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
11
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  
12
Air India Plane Crash: नव्या पाहुण्याचं स्वागत करण्याआधीच सगळं संपलं; ७ महिन्याची गर्भवती होती जिनल
13
Iran Israel युद्घात अजब चोरी; इस्रायली हॅकर्सनं ८०० कोटींची क्रिप्टोकरन्सी केली नष्ट, प्रकरण काय?
14
Yogini Ekadashi 2025: एखाद्या व्यक्तीने दिलेला शाप योगिनी एकादशी व्रताचरणामुळे होतो दूर!
15
खळबळ उडाली! जीन्स अन् टॉपमध्ये दिसू लागल्या हायफाय भिकारी, लोक १००-२०० रुपये देऊ लागले... 
16
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
17
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
18
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
19
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
20
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर

बेळगावसह कारवार सीमाभाग केंद्रशासित करा

By admin | Updated: August 14, 2014 03:25 IST

मराठी भाषेला कर्नाटकात कधीच सन्मान मिळणार नाही. यासाठी बेळगावसह मराठी भाषक सीमा भाग केंद्रशासित प्रदेश झाला पाहिजे,

कोल्हापूर : मराठी भाषेला कर्नाटकात कधीच सन्मान मिळणार नाही. यासाठी बेळगावसह मराठी भाषक सीमा भाग केंद्रशासित प्रदेश झाला पाहिजे, अशी आग्रही मागणी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केली.यावेळी साहित्यिक, नाट्य-चित्रपट कलावंतांनी येळ्ळूर येथील मराठी भाषिकांवर कर्नाटक पोलिसांकडून झालेल्या लाठी हल्लयाचा निषेध केला. याबाबतचा ठराव करुन तो लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविण्याचा निर्णय यावेळी झाला.माधवी वैद्य म्हणाल्या, मराठी भाषेला, मराठी माणसाला आंदोलन करावे लागत आहे, ही खेदाची बाब आहे. सीमा प्रश्नी आंदोलनात मराठी बेळगुंदी येथे तीन जणांना हौतात्म्य पत्करावे लागले. लवकरच मराठी साहित्य महामंडळाची शाखा बेळगावात सुरु करण्याचा प्रयत्न असल्याचे वैद्य यांनी सांगितले.महाराष्ट्र साहित्य परिषदेचे (बेळगाव) अशोक याळगी यांनी गेली ६० वर्षे आमचे सीमाप्रश्नी आंदोलन सुरु असल्याचे सांगितले. कन्नड भाषेसाठी तेथील सर्व साहित्यिक एकत्र येतात. परंतु सीमा भागातील मराठी भाषकांसाठी महाराष्ट्रातील साहित्यिक का एकत्र येत नाहीत, असा सवाल करत आता सर्व साहित्यिक व कलावंत पुढे आले आहेत. ही बाब स्वागतार्ह असल्याचे सांगितले. महाराष्ट्रात सांस्कृतिक कार्यक्रम करण्यासाठी कर्नाटक शासनातर्फे न परवडणारा जिझिया कर नाट्य संस्थांच्या गाड्यांना लावला जातो. त्यामुळे बेळगावात महाराष्ट्रातील सांस्कृतिक कार्यक्रमांची देवाण-घेवाण करता येत नाही. यामुळे भविष्यात मराठी भाषिकांवर अन्याय झाल्यास महाराष्ट्रातील सर्व विचारवंत, साहित्यिक, रंगकर्मी, तंत्रज्ञ एकत्र येऊन आंदोलन करतील, असे ही त्या म्हणाल्या.0नाट्य परिषद (बेळगाव)च्या वीणा लोकूर म्हणाल्या, बेळगावमध्ये सर्रास कानडीकरण सुरु आहे. त्याला विरोध करण्याचे काम सुरु आहे. भविष्यात या ठिकाणी नाट्य संमेलन घेण्याचा प्रयत्न असल्याचे लोकूर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)