शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिमंडळ मोठे निर्णय! बांबू धोरण जाहीर, ५ लाख रोजगार; मुंबई HC मध्ये २२२८ पदांना मान्यता
2
"अशी निवडणूक पद्धत भारतात कुठेच नाही, मग फक्त महाराष्ट्रातच का लागू आहे?"; निवडणूक आयोगाला घेरले, 'मविआ'च्या पत्रात काय?
3
दिवाळीला घरी आणा नवी कोरी दुचाकी! देशातील सर्वात स्वस्त ५ बाईक्स, मायलेज-फीचर्स सर्वच दमदार
4
4G आले तरी... २० वर्षांचा प्रवास थांबला, ग्राहक बीएसएनलच्या सेवेला वैतागला, अखेर पोर्टिंगचा निर्णय घेतला...
5
माओवादी चळवळीला मोठा हादरा ! नक्षल्यांचा नेता ‘भूपती’सह ६० जणांनी पोलिसांसमोर केले आत्मसमर्पण
6
इंटरनेटशिवाय करता येणार पेमेंट; RBI ने लॉन्च केला ‘ऑफलाइन डिजिटल रुपया’, जाणून घ्या...
7
उद्धव ठाकरे अन् मविआ नेत्यांसोबत राज ठाकरे मंत्रालयात; मुख्य निवडणूक अधिकाऱ्याशी एकत्र चर्चा, 'इंजिना'ची ठरली दिशा?
8
एकनाथ शिंदेंनी सुरू केलेल्या योजना खरेच बंद होणार का? CM फडणवीसांनी सरळ सांगितले; म्हणाले...
9
सोन्याचे दर ₹१.३० लाखांच्या जवळ, चांदीचा भाव ₹१.८१ लाखांच्या पुढे, कॅरेटनुसार पाहा नवे दर
10
रोहित-विराट संदर्भातील 'त्या' प्रश्नावर गंभीर यांचं मोठं वक्तव्य; नेमकं काय म्हणाले कोच? जाणून घ्या सविस्तर
11
Tata Motors Demerger: टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये दिसली ४०% ची घसरण, काय आहे यामगची खरी कहाणी आणि पुढे काय होणार? जाणून घ्या
12
Viral: बंगळुरुमध्ये घरकाम करणाऱ्या बाईचा पगार ₹४५,०००; महिलेच्या दाव्याने सोशल मीडियावर खळबळ...
13
धक्कादायक! पतीशी वाद, रागातून आईकडूनच जुळ्या मुलांची हत्या, स्वत: चौथ्या मजल्यावरुन मारली उडी
14
तंत्र-मंत्र, जारण-मारण, गेंडे आणि म्हशी! आसाममध्ये गूढ जंगलात काळी जादू करणारं गाव
15
राऊत म्हणतात, राज ठाकरे सोबत जाण्यास इच्छूक; पण काँग्रेस नेते म्हणाले, मनसेबाबत चर्चा नाही!
16
टॅक्स फ्री ४० लाखांचा फंड! पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत दरमहा इतके गुंतवा अन् कोट्यधीश व्हा
17
४ मुली पदरात, नवऱ्याने सोडलं पण 'तिने' धाडस केलं; सुरू केला व्यवसाय, आता लाखोंची मालकीण
18
भारताची खासगी बँक विकली जाणार! दुबईच्या शेखची मोठी बँक हजारो कोटी रुपये ओतणार, RBI ने दिला होकार...
19
छिंदवाडा'मध्ये झालेल्या मुलांच्या मृत्यूवर 'WHO' ने कडक कारवाई केली; या तीन सिरपबाबत इशारा दिला

पूनर्जन्माच्या दाव्याने बेलापूर पुन्हा चर्चेत

By admin | Updated: November 5, 2016 04:01 IST

काही वर्षांपूर्वी जम्मू- काश्मीर येथील गौरी शर्माच्या पुनर्जन्माच्या कथेमुळे श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूरगाव चांगलेच चर्चेत आले होते़

बेलापूर (अहमदनगर) : काही वर्षांपूर्वी जम्मू- काश्मीर येथील गौरी शर्माच्या पुनर्जन्माच्या कथेमुळे श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूरगाव चांगलेच चर्चेत आले होते़ आता पुन्हा एकदा गुजरात राज्यातील पटेल आडनावाच्या दाम्पत्याने आमचा बेलापूरमध्ये १९६९ मध्ये खून झाला होता, असा दावा केला आहे.शुक्रवारी गावात येऊन त्यांनी चौकशी केल्याने बेलापूर पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. गौरी शर्माच्या पुनर्जन्माचे वृत्त दाखविण्यासाठी अनेक वृत्तवाहिन्या चढाओढ करीत असल्याचे सगळ््यांनीच पाहिले. शुक्रवारी सकाळीच बेलापूर गावात सुरत (गुजरात) येथील विजया व सूरज पटेल हे दाखल झाले. त्यांनी गावात संभूज पाटील नावाची व्यक्ती कोठे राहते, याची चौकशी केली. संबंधित व्यक्तीचा पत्ता न सापडल्यामुळे पटेल दाम्पत्यास बेलापूर ग्रामपंचायत कार्यालयात आणण्यात आले. संबंधित व्यक्तीचे घर शोधण्याचे प्रयोजन काय असे विचारले असता, त्यांनी पुनर्जन्माचे कथन केले. १९६९ साली संभूज पाटील त्यांची पत्नी व मुलगा हे कामानिमित्त बेलापूर गावी आले होते. या गावात तिघांचीही हत्या झाली. हत्या झालेले पती-पत्नी आम्हीच असल्याचा दावा पटेल दाम्पत्यांनी सरपंच भरत साळुंके, बाजार समितीचे संचालक सुधीर नवले, अशोक गवते, कचरू वाबळे, प्रकाश जाजू, त्रिंबक कुर्हे या ग्रामस्थांसमोर केला. त्यामुळे गावकरीही चक्रावले. १९६९ मध्ये गावात तिहेरी खुनाची कुठलीही घटना घडली नसल्याचे सर्वांनी ठामपणे सांगितले. जुन्या जाणत्या गावकऱ्यांकडेही चौकशी केली. उपरोक्त काही नसल्याचे गावकऱ्यांनी पटेल यांना सांगितले. अकोले तालुक्यात बेलापूर बदगी हे गाव असल्याचे पटेल यांना सांगण्यात आले. त्यामुळे हे दाम्पत्य बेलापूर बदगीकडे रवाना झाले. पूनर्जन्माच्या चर्चेने गावात पुन्हा एकदा वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले आहे. (वार्ताहर)