शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफीज सईदला पाकिस्तान भारताला सोपवणार?; मुलगा तल्हा सईदचा खुलासा
2
३ वर्षाच्या चिमुकलीचं अपहरण करून बलात्कार; २४ तासांत पोलिसांनी नराधमाला यमसदनी धाडले
3
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा एकत्र होणार का? सुनील तटकर म्हणाले, 'तसा विषय..."
4
Uddhav Thackeray : "महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते होईल, लवकरच..."; 'मनसे'सोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंचं मोठं विधान
5
मस्क-ट्रम्प वादात स्टारलिंकसाठी मोठी बातमी! भारताने लायसन दिले...
6
रशियाच्या बदल्यानं युक्रेन हादरलं! ४०० ड्रोन अन् ४० हून अधिक मिसाईल हल्ल्यानं सगळीकडे विनाश
7
IND vs ENG : पतौडी ट्रॉफी आता तेंडुलकर-अँडरसन नावाने ओळखली जाणार! गावसकर नाराज, कारण...
8
पाण्यासाठी पाकिस्तानकडून विनवण्या, एक-दोन नव्हे चारवेळा पाठवलं पत्र! पण... 
9
तिसऱ्या मुलासाठी अधिकाऱ्यांनी प्रसूती रजा नाकारली पण सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निर्णय
10
एकीकडे युतीची चर्चा, पण दुसरीकडे मनसेचा बडा नेता मातोश्रीवर; उद्धव ठाकरेंनी बांधले शिवबंधन
11
'मी हा अध्याय संपवत आहे' टीम इंडियाचा आणखी एक खेळाडू तडकाफडकी निवृत्त!
12
Makarand Anaspure : ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर मकरंद अनासपुरेंनीही केलं होतं भाष्य, म्हणालेले की, "मराठी माणूस..."
13
Narendra Modi : "तो कुटुंबासाठी कष्ट करत होता, दहशतवाद्यांनी त्याला मारलं"; आदिलच्या आठवणीत मोदी भावुक
14
आजीच्याच शाळेत जातोय नातू...! पृथ्वी अंबानीच्या शाळेचे नाव काय, फी किती? डोळेच विस्फारतील...
15
'मला अशा मुली आवडत नाहीत, ज्या...'; भाजप नेत्याचे कपड्यांबद्दल वादग्रस्त विधान
16
Lord Hanuman : हनुमंताला पाच भाऊ होते, तेही विवाहित; काय होती त्यांची नावे? जाणून घ्या!
17
iPhone युजर्ससाठी खूशखबर! ट्रम्प यांच्या धमकीनंतरही Apple नं टाटांना सोपावलं दुरुस्तीचं काम
18
छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाला विरोध करणाऱ्या प्रवृत्तींचा कडेलोट करा: हर्षवर्धन सपकाळ
19
पाकिस्तानने हेरगिरीसाठी महिलांचीच निवड का केली? गद्दार तुफैल-हारूनने चौकशीत सांगून टाकलं!
20
आधी आईनं गळा आवळला, त्यानंतर मामानं...; बारावीत शिकणाऱ्या मुलीसोबत घडलं भयंकर!

भाडे कायद्यातील बदल मागे

By admin | Updated: January 29, 2016 04:18 IST

लाखो भाडेकरूंवर अन्याय करू पाहणाऱ्या भाडे नियंत्रण कायद्यातील बदलापासून अखेर राज्य सरकारला यू टर्न घ्यावा लागला. या कायद्यात कोणताही बदल केला जाणार नाही, असे मुख्यमंत्री

मुंबई : लाखो भाडेकरूंवर अन्याय करू पाहणाऱ्या भाडे नियंत्रण कायद्यातील बदलापासून अखेर राज्य सरकारला यू टर्न घ्यावा लागला. या कायद्यात कोणताही बदल केला जाणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज स्पष्ट केले. मुख्यमंत्र्यांच्या या स्पष्टीकरणानंतर भाडेवाढीचा निर्णय रद्द केल्याचे श्रेय घेण्यासाठी सत्तारूढ भाजपा-शिवसेनेतच चढाओढ लागली. सरकारच्या या निर्णयामुळे मुंबई शहरातील भाडेकरूवर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे.भाडे नियंत्रण कायदा राज्यात १९९९ मध्ये लागू करण्यात आला. आता ५०० चौरस फुटांपेक्षा अधिक क्षेत्रफळ असलेली भाडेतत्त्वावरील जागा आणि ८६२ चौरस फुटांपेक्षा अधिक क्षेत्रफळाच्या निवासी जागेतील भाडेकरूंना या कायद्याचे संरक्षण राहणार नाही, अशी दुरुस्ती प्रस्तावित होती.भाडे नियंत्रण कायद्यातील प्रस्तावित दुरुस्तीची माहिती मिळताच सत्तारूढ भाजपा-शिवसेनेसह काँग्रेस, राष्ट्रवादीनेही भाडेकरूंवर गदा आणणाऱ्या कायद्यातील बदलास तीव्र विरोध केला. शिवसेनेने तर मुंबईभर चौकाचौकात नागरिकांच्या सह्यांची मोहीमच राबविली. (विशेष प्रतिनिधी)काय होता प्रस्ताव?मालकांना भाडेवाढ मोठ्या प्रमाणात करता येऊ नये म्हणून कायद्यातील दुरुस्तीनंतर तीन वर्षांपर्यंत बाजार दराच्या ५० टक्केच रक्कम भाडे म्हणून आकारता येईल आणि चौथ्या वर्षापासून १०० टक्के बाजार दर आकारता येईल, अशी तरतूद प्रस्तावित होती. याशिवाय भाडेकरूच्या एकूण वार्षिक उत्पन्नाच्या तीस टक्क्यांपेक्षा अधिक रक्कम भाडे म्हणून आकारता येणार नाही, अशीही अट प्रस्तावित होती. तथापि, या सगळ्याच तरतुदी मालकधार्जिण्या आणि लाखो भाडेकरूंवर अन्याय करणाऱ्या असल्याची चौफेर टीका झाली होती. मुंबई महापालिकेची निवडणूक वर्षभरावर आलेली असताना या कायद्यात सुधारणा करणे राजकीयदृष्ट्या भाजपालाही परवडणारे नव्हते. तीव्र विरोधाची दखलप्रस्तावित बदलास होत असलेला तीव्र विरोध आगामी मुंबई महापालिकेत भाजपाला महागात पडू शकतो, ही बाब मुंबई भाजपाचे अध्यक्ष आ. आशिष शेलार, आ. मंगलप्रभात लोढा यांनी लक्षात आणून देताच मुख्यमंत्री फडणवीस यांनी गृहनिर्माणमंत्री प्रकाश महेता यांच्याशी चर्चा केली.त्यानंतर प्रस्तावित दुरुस्ती मागे घेत असल्याचे स्पष्टीकरण दिले. प्रस्तावित बदलाला विरोध करण्यासाठी सारेच राजकीय पक्ष एकवटले होते.सरकारच्या या स्पष्टीकरणानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी तातडीने पत्रपरिषद घेऊन प्रसारमाध्यमांना माहिती दिली. ते म्हणाले, भाडे नियंत्रण कायद्याविषयी सर्वोच्च न्यायालयात जो खटला प्रलंबित आहे. त्यामध्ये सरकार भाडेकरूंच्या बाजूने भूमिका घेईल, असे ते म्हणाले. तर या कायद्यात बदलाचा प्रस्ताव गेल्या वर्षी मेमध्ये आल्यानंतर तो सरकारने ६ जून रोजी फेटाळला होता. आता पुन्हा चर्चा सुरू झाल्यानंतर भाडेकरूंच्या मनातील भीती आम्ही सरकारपर्यंत पोहोचविली व त्यानंतर सरकारने स्पष्टीकरण दिले, असा दावा आ. लोढा यांनी केला.कायद्यातील दुरुस्ती मागे घेणे हा मुंबईकरांच्या दबावाचा विजय आहे. बीडीडी चाळ, धारावी पुनर्विकास प्रकल्प तसेच गृहनिर्माण धोरणातही मुंबईकरांचे हित समोर ठेवावे.- सचिन अहिर, राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष