शहरं
Join us  
Trending Stories
1
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
2
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
3
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
4
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
5
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
6
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
7
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
8
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
9
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
10
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
11
फक्त एक मिस्ड कॉल किंवा SMS द्वारे PF बॅलन्स तपासा; कुठेही लॉगइन करण्याची गरज नाही
12
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
13
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक
14
मुलगा देशसेवेसाठी दिलाय;काही झालं तर मन घट्ट केलंय! कर्नल नितीन काळदाते यांच्या आईची कृतार्थ भावना
15
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
16
IPL Re-Start : फायनल ठरलेल्या दिवशीच खेळवण्याचा प्लॅन; पण ते कसं शक्य होईल?
17
पाकिस्तानकडून युद्धविरामचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
18
"बुद्धिमत्तापूर्ण आणि संतुलित"; पी चिदंबरम यांनी पंतप्रधान मोदींच्या युद्ध धोरणाचं केलं भरभरुन कौतुक
19
पुन्हा समोर आला पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा; युद्धविरामानंतर रात्री काय-काय घडलं? जाणून घ्या
20
भीषण! भरधाव कारने घराबाहेर बसलेल्या महिलेसह ४ मुलांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video

जैन यांच्याविरुद्धचा खटला मागे

By admin | Updated: May 6, 2016 05:32 IST

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्या विरोधातील बदनामीचा खटला मागे घेतला. त्यामुळे १३ वर्षांनंतर उभयतांमधील न्यायालयीन लढाई संपुष्टात आली.

पुणे : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्या विरोधातील बदनामीचा खटला मागे घेतला. त्यामुळे १३ वर्षांनंतर उभयतांमधील न्यायालयीन लढाई संपुष्टात आली.सुरेशदादा जैन यांनी ९ मे २००३ रोजी पत्रकार परिषद घेऊन, अण्णांवर आरोप केले होते. त्यावर हजारे यांनी अ‍ॅड़ हर्षद निंबाळकर व अ‍ॅड़ मिलिंद पवार यांच्यामार्फत २००३मध्ये पुणे येथील न्यायालयात बदनामीचा फौजदारी खासगी खटला दाखल केला होता. हजारे यांच्या वतीने अ‍ॅड़ निंबाळकर यांनी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी शीतल एस़ बांगड यांच्या न्यायालयात बदनामीचा खटला मागे घेण्याच्या परवानगीचा अर्ज केला होता.धावपळ न करण्याचा डॉक्टरांचा सल्ला जैन यांनीदेखील आपल्या विरोधातील जळगाव न्यायालयातील बदनामीचा खटला मागे घेतला आहे़ सध्या आपले वय ७८ वर्षे असून, वयोमानपरत्वे अधिक प्रवास किंवा धावपळ न करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिलेला आहे़ त्यामुळे आपण हा खटला काढून घेण्याचा निर्णय घेतला, असे हजारे यांनी म्हटले आहे.घरकूल घोटाळ्यातील आरोपांमुळे सुरेशदादा जैन हे गेली ३ वर्षे कारागृहामध्ये आहेत़ सध्या ते आजारी असल्याचे कळते़ शिवाय, त्यांचे वय झाले आहे. त्यामुळे मानवतेच्या दृष्टीने विचार करता, हा बदनामीचा खटला पुढे चालविणे योग्य वाटत नाही़ जैन यांच्याशी माझे कोणतेही वैयक्तिक भांडण किंवा सूडभावना नाही़- अण्णा हजारे