शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

बाजार समित्यांमधील व्यवहार कोलमडले

By admin | Updated: June 3, 2017 04:07 IST

शेतकऱ्यांच्या संपामुळे राज्यातील ३०५ बाजार समित्यांमधील व्यवहार पूर्णपणे कोलमडले आहेत. बहुतांश ठिकाणचे कामकाज पूर्णपणे

नामदेव मोरे/  लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : शेतकऱ्यांच्या संपामुळे राज्यातील ३०५ बाजार समित्यांमधील व्यवहार पूर्णपणे कोलमडले आहेत. बहुतांश ठिकाणचे कामकाज पूर्णपणे थांबले आहे. शुक्रवारी जेमतेम ५५ बाजार समित्यांमध्येच समाधानकारक आवकची नोंद झाली असून, पूर्ण राज्यात २० हजार टन मालाचीच नोंद झाली आहे. एकूण आवकमधील ७ हजार टन आवक फक्त मुंबई बाजार समितीमध्ये झाली आहे. कृषी मालाला योग्य भाव मिळावा. स्वामीनाथन आयोगाची तंतोतंत अंमलबजावणी व कर्जमाफी करावी, या मागणीसाठी बळीराजा संपावर जाताच, पूर्ण राज्यात हाहाकार सुरू झाला आहे. १२ कोटी नागरिकांना अन्नधान्याचा तुटवडा जाणवू लागला आहे. मुंबई, पुणेसह सर्वच महानगरांमध्ये भाजीपाल्याचे दर गगनाला भिडू लागले आहेत. कृषी मालाचे प्रमुख केंद्र असणाऱ्या राज्यातील ३०५ बाजार समित्या व ६०३ उपबाजार आवारांमधील सर्व व्यवहार कोलमडले आहेत. ८० टक्के बाजार समित्यांमधील व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले असून, उर्वरित ठिकाणी आवक प्रचंड घटली आहे. मुंबई बाजार समितीमध्ये रोज १० ते १५ हजार टन मालाची आवक होत असते. शुक्रवारी फक्त ७,२४५ टन मालाचीच आवक झाली आहे. यामध्ये कांद्याची आवक झालीच नाही. भाजीपाल्याची आवक ७० टक्के घटली आहे. मसाला व धान्य मार्केटमधील बहुतांश आवक परराज्यातून होत असल्याने, राज्यातील इतर बाजार समित्यांच्या तुलनेमध्ये मुंबईमधील आवक जास्त दिसत आहे. संपाच्या दुसऱ्या दिवशी ३०५पैकी जेमतेम ५५ बाजार समित्यांमध्ये समाधानकारक आवक झाली आहे. पूर्ण राज्यभर फक्त २०,८८९ टन मालाची आवक झाली आहे. ज्या बाजार समित्यांमध्ये आवक झाली, त्यामध्येही भात, गहू, ज्वारी व इतर वस्तूंचा समावेश आहे. भाजीपाला, कांदा व इतर जीवनावश्यक व नाशिवंत वस्तूंची आवकच झालेली नाही. आंदोलन सुरूच राहिले, तर राज्यातील नागरिकांना शनिवारपासून भाजीपाला मिळणार नाही व डाळी व कडधान्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही. शेतकऱ्यांची ताकदराज्यातील शेतकरी संघटित झाला तर काय करू शकतो, हे शेतकरी संपामुळे दोन दिवसांमध्ये पूर्ण राज्याला समजले आहे. शेतकऱ्यांनी त्यांची ताकद दाखवून दिली असून, शासनाने आता तरी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवावेत, अन्यथा आंदोलन तीव्र होऊन राज्यभर अन्नटंचाई सुरू होईल, असे एपीएमसीमधील व्यापारी सुरेश शिंदे यांनी सांगितले.