शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
3
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
4
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
5
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
6
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
7
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
8
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
9
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
10
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
11
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
12
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
13
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
14
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
15
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
16
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
17
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
18
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
19
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
20
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले

बाजार समित्यांमधील व्यवहार कोलमडले

By admin | Updated: June 3, 2017 04:07 IST

शेतकऱ्यांच्या संपामुळे राज्यातील ३०५ बाजार समित्यांमधील व्यवहार पूर्णपणे कोलमडले आहेत. बहुतांश ठिकाणचे कामकाज पूर्णपणे

नामदेव मोरे/  लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : शेतकऱ्यांच्या संपामुळे राज्यातील ३०५ बाजार समित्यांमधील व्यवहार पूर्णपणे कोलमडले आहेत. बहुतांश ठिकाणचे कामकाज पूर्णपणे थांबले आहे. शुक्रवारी जेमतेम ५५ बाजार समित्यांमध्येच समाधानकारक आवकची नोंद झाली असून, पूर्ण राज्यात २० हजार टन मालाचीच नोंद झाली आहे. एकूण आवकमधील ७ हजार टन आवक फक्त मुंबई बाजार समितीमध्ये झाली आहे. कृषी मालाला योग्य भाव मिळावा. स्वामीनाथन आयोगाची तंतोतंत अंमलबजावणी व कर्जमाफी करावी, या मागणीसाठी बळीराजा संपावर जाताच, पूर्ण राज्यात हाहाकार सुरू झाला आहे. १२ कोटी नागरिकांना अन्नधान्याचा तुटवडा जाणवू लागला आहे. मुंबई, पुणेसह सर्वच महानगरांमध्ये भाजीपाल्याचे दर गगनाला भिडू लागले आहेत. कृषी मालाचे प्रमुख केंद्र असणाऱ्या राज्यातील ३०५ बाजार समित्या व ६०३ उपबाजार आवारांमधील सर्व व्यवहार कोलमडले आहेत. ८० टक्के बाजार समित्यांमधील व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले असून, उर्वरित ठिकाणी आवक प्रचंड घटली आहे. मुंबई बाजार समितीमध्ये रोज १० ते १५ हजार टन मालाची आवक होत असते. शुक्रवारी फक्त ७,२४५ टन मालाचीच आवक झाली आहे. यामध्ये कांद्याची आवक झालीच नाही. भाजीपाल्याची आवक ७० टक्के घटली आहे. मसाला व धान्य मार्केटमधील बहुतांश आवक परराज्यातून होत असल्याने, राज्यातील इतर बाजार समित्यांच्या तुलनेमध्ये मुंबईमधील आवक जास्त दिसत आहे. संपाच्या दुसऱ्या दिवशी ३०५पैकी जेमतेम ५५ बाजार समित्यांमध्ये समाधानकारक आवक झाली आहे. पूर्ण राज्यभर फक्त २०,८८९ टन मालाची आवक झाली आहे. ज्या बाजार समित्यांमध्ये आवक झाली, त्यामध्येही भात, गहू, ज्वारी व इतर वस्तूंचा समावेश आहे. भाजीपाला, कांदा व इतर जीवनावश्यक व नाशिवंत वस्तूंची आवकच झालेली नाही. आंदोलन सुरूच राहिले, तर राज्यातील नागरिकांना शनिवारपासून भाजीपाला मिळणार नाही व डाळी व कडधान्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही. शेतकऱ्यांची ताकदराज्यातील शेतकरी संघटित झाला तर काय करू शकतो, हे शेतकरी संपामुळे दोन दिवसांमध्ये पूर्ण राज्याला समजले आहे. शेतकऱ्यांनी त्यांची ताकद दाखवून दिली असून, शासनाने आता तरी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवावेत, अन्यथा आंदोलन तीव्र होऊन राज्यभर अन्नटंचाई सुरू होईल, असे एपीएमसीमधील व्यापारी सुरेश शिंदे यांनी सांगितले.