शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

बाजार समित्यांमधील व्यवहार कोलमडले

By admin | Updated: June 3, 2017 04:07 IST

शेतकऱ्यांच्या संपामुळे राज्यातील ३०५ बाजार समित्यांमधील व्यवहार पूर्णपणे कोलमडले आहेत. बहुतांश ठिकाणचे कामकाज पूर्णपणे

नामदेव मोरे/  लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : शेतकऱ्यांच्या संपामुळे राज्यातील ३०५ बाजार समित्यांमधील व्यवहार पूर्णपणे कोलमडले आहेत. बहुतांश ठिकाणचे कामकाज पूर्णपणे थांबले आहे. शुक्रवारी जेमतेम ५५ बाजार समित्यांमध्येच समाधानकारक आवकची नोंद झाली असून, पूर्ण राज्यात २० हजार टन मालाचीच नोंद झाली आहे. एकूण आवकमधील ७ हजार टन आवक फक्त मुंबई बाजार समितीमध्ये झाली आहे. कृषी मालाला योग्य भाव मिळावा. स्वामीनाथन आयोगाची तंतोतंत अंमलबजावणी व कर्जमाफी करावी, या मागणीसाठी बळीराजा संपावर जाताच, पूर्ण राज्यात हाहाकार सुरू झाला आहे. १२ कोटी नागरिकांना अन्नधान्याचा तुटवडा जाणवू लागला आहे. मुंबई, पुणेसह सर्वच महानगरांमध्ये भाजीपाल्याचे दर गगनाला भिडू लागले आहेत. कृषी मालाचे प्रमुख केंद्र असणाऱ्या राज्यातील ३०५ बाजार समित्या व ६०३ उपबाजार आवारांमधील सर्व व्यवहार कोलमडले आहेत. ८० टक्के बाजार समित्यांमधील व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले असून, उर्वरित ठिकाणी आवक प्रचंड घटली आहे. मुंबई बाजार समितीमध्ये रोज १० ते १५ हजार टन मालाची आवक होत असते. शुक्रवारी फक्त ७,२४५ टन मालाचीच आवक झाली आहे. यामध्ये कांद्याची आवक झालीच नाही. भाजीपाल्याची आवक ७० टक्के घटली आहे. मसाला व धान्य मार्केटमधील बहुतांश आवक परराज्यातून होत असल्याने, राज्यातील इतर बाजार समित्यांच्या तुलनेमध्ये मुंबईमधील आवक जास्त दिसत आहे. संपाच्या दुसऱ्या दिवशी ३०५पैकी जेमतेम ५५ बाजार समित्यांमध्ये समाधानकारक आवक झाली आहे. पूर्ण राज्यभर फक्त २०,८८९ टन मालाची आवक झाली आहे. ज्या बाजार समित्यांमध्ये आवक झाली, त्यामध्येही भात, गहू, ज्वारी व इतर वस्तूंचा समावेश आहे. भाजीपाला, कांदा व इतर जीवनावश्यक व नाशिवंत वस्तूंची आवकच झालेली नाही. आंदोलन सुरूच राहिले, तर राज्यातील नागरिकांना शनिवारपासून भाजीपाला मिळणार नाही व डाळी व कडधान्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही. शेतकऱ्यांची ताकदराज्यातील शेतकरी संघटित झाला तर काय करू शकतो, हे शेतकरी संपामुळे दोन दिवसांमध्ये पूर्ण राज्याला समजले आहे. शेतकऱ्यांनी त्यांची ताकद दाखवून दिली असून, शासनाने आता तरी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवावेत, अन्यथा आंदोलन तीव्र होऊन राज्यभर अन्नटंचाई सुरू होईल, असे एपीएमसीमधील व्यापारी सुरेश शिंदे यांनी सांगितले.