शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्यांच्याकडे काहीच नाही, त्यांच्याकडे संविधानाची गॅरंटी आहे"; नामिबियात PM मोदींच्या भाषणाला स्टँडिंग ओव्हेशन
2
संजय गायकवाडांचा कँटिनमध्ये राडा; अन्न आणि औषध प्रशासनाची अजंता केटरर्सवर मोठी कारवाई
3
ट्रम्प यांनी पुन्हा फोडला टॅरिफ बॉम्ब...! इराक, फिलिपिन्ससह 'या' 6 देशांना बसणार फटका
4
'डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कधीही होऊ शकतो 'ड्रोन हल्ला', खामेनेई यांच्या जवळच्या माणसाची अमेरिकेला खुली धमकी!
5
कुणाचा तरी राग माझ्यावर का काढता? अर्थसंकल्प कशाला मांडता म्हणणाऱ्या जाधवांना अजितदादांचे प्रत्युत्तर
6
"...तर मॉस्को अन् बिजिंग बॉम्बनं उडवेन!" ट्रम्प यांची पुतीन-जिनपिंग यांना खुली धमकी? 'ऑडिओ' लीक!
7
"गौतम गंभीरला काहीही बोलू नका; भारत मालिका हरला तरीही..."; योगराज सिंह यांनी कुणाला ठणकावलं?
8
“...तर राज्याच्या साधनसंपत्तीत भर, आर्थिक शिस्तीचे पालन करीतच अर्थकारभार”: DCM अजित पवार
9
युतीबाबत न बोलण्याचे राज ठाकरेंचे स्पष्ट आदेश, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
"मराठी अस्मिता जपली पाहिजे पण..."; भाषेच्या वादात जान्हवी कपूरची उडी; बॉयफ्रेंड शिखर पहारियाची पोस्ट केली शेअर
11
सावधान! हे अ‍ॅप तुमच्या हॉट्स अ‍ॅपचे मेसेज वाचू शकते, आताच सेटिंग्स बदला
12
अकोल्यात तरुणीवर कारमध्ये अत्याचाराचा प्रयत्न, आराेपीच्या गुप्तांगावर लाथ मारत करून घेतली स्वतःची सुटका
13
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...
14
शाळेत शिकणारी मुलगी प्रेगनंट राहिल्यास १ लाख रुपये मिळणार; रशियाच्या या योजनेची होतेय चर्चा
15
मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले
16
पुन्हा रॉकेट बनला MRF चा शेअर, गेला ₹ 150000 पार; लोकांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा
17
“महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ
18
"आमच्यावर आरोप केला जातो, शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं? माझं सरकार यांनी पाडलं नसतं तर...! काय म्हणाले उद्धव ठाकरे?
19
रामललांसाठी आणखी एक अस्सल सागवानी लाकडाचे खास भव्य मंदिर बनणार; अयोध्येत कुठे बांधले जाणार?
20
Maruti Suzuki ते Mahindra..; जगातील सर्वात श्रीमंत कार कंपन्यांमध्ये भारतीय कंपन्यांचा दबदबा

तिवरांवरील अतिक्रमण हटवण्यास सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2017 05:30 IST

उच्च न्यायालयाच्या फटकाऱ्यानंतर ठाण्यातील मुंब्रा, दिवा येथील तिवरांवरील बेकायदेशीर बांधकाम हटवण्यात आले

मुंबई : उच्च न्यायालयाच्या फटकाऱ्यानंतर ठाण्यातील मुंब्रा, दिवा येथील तिवरांवरील बेकायदेशीर बांधकाम हटवण्यात आले आहे. येथील बांधकाम तोडून त्याच्या सिमेंट-विटा हटवण्याचे काम सुरू असल्याची माहिती ठाणे महापालिकेचे आयुक्त संजीव जैस्वाल यांनी गुरुवारी उच्च न्यायालयाला दिली. मुंब्रा, दिवा येथील तिवरांची वने नष्ट करून याठिकाणी उभारण्यात आलेली बेकायदेशीर बांधकामे पाडण्याचा आदेश देऊनही ठाणे महापालिकेने व वनविभागाने काहीही कारवाई केली नाही. त्यामुळे संतापलेल्या उच्च न्यायालयाने गेल्या सुनावणीत ठामपा आयुक्तांना व मुख्य वनसंरक्षण अधिकाऱ्यांना उच्च न्यायालयात उपस्थित राहण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार गुरुवारच्या सुनावणीत ठामपा आयुक्त संजीव जैस्वाल व मुख्य वनसंवर्धन अधिकारी न्या.मंजुळा चेल्लुर व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठापुढे उपस्थित राहिले.सुनावणीत खुद्द जैस्वाल यांनी खंडपीठाला दोन दिवसांपूर्वी स्वत:च्या उपस्थित तिवरांच्या वनावरील बेकायदेशीर बांधकाम हटवल्याची माहिती खंडपीठाला दिली. एवढे दिवस शांत बसलेल्या ठाणे महापालिकेला उच्च न्यायालयाने धारेवर धरत तिवरांची झाडे नष्ट होऊन कशी दिली? असा प्रश्न केला. त्यावर आयुक्तांनी संबंधित जागा खासगी मालमत्ता असून वनविभागाने त्यासंबंधी अधिसूचना न काढल्याने महापालिकेने कारवाई केली नसल्याचे खंडपीठाला सांगितले. ‘महापालिका शंभर टक्के योग्य काम करत आहे, असे दाखवून वन विभागावर जबाबदारी ढकलू नका. या जागेवर बांधकामे बांधण्यात आली की नाही, याची पाहणी करण्याचे काम कोणाचे आहे? तुमचे वॉर्ड आॅफिसर काय करतात? त्यांनी भेट देऊन लक्ष ठेवायला हवे. तुम्हाला वाटत आम्ही लक्ष ठेवावे तर आम्ही ठेवू. त्यासाठी समिती नेमू मात्र ती समिती आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली काम करेल. तुम्हाला न्यायालयाचा आदर करता येत नसेल तर आदर करायला शिकवू,’ अशा शब्दांत उच्च न्यायालयाने सुरुवातील आयुक्तांना सुनावले. त्यावर आयुक्तांनी उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे बांधकाम हटवल्याची माहिती खंडपीठाला दिली. परंतु, हे सर्व कामकाज करताना खूप खर्च आल्याचेही सांगितले. त्यावर खंडपीठाने आयुक्तांना खर्चाची सर्व बिले सादर करण्याचे निर्देश देत संबंधित खर्च जमिनीच्या मालकाला भरायला लावू, असे म्हटले. (प्रतिनिधी)