शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

मतांसाठी बेगमी; सरकारचे झोपड्यांच्या जमिनींवर तुळशीपत्र

By admin | Updated: January 6, 2017 04:44 IST

महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मतांची बेगमी करण्यासाठी एसआरए योजनेत सहभागी होण्यास नकार देणाऱ्या नागपूरच्या झोपडपट्टीधारकांना झोपडी आणि अतिक्रमित जमीन

अतुल कुलकर्णी, मुंबईमहापालिका निवडणुकीच्या तोंडावर मतांची बेगमी करण्यासाठी एसआरए योजनेत सहभागी होण्यास नकार देणाऱ्या नागपूरच्या झोपडपट्टीधारकांना झोपडी आणि अतिक्रमित जमीन मोफत बहाल करण्याचा धक्कादायक निर्णय राज्य सरकारने ३ जानेवारी रोजी घेतला आहे. नागपुरात मतांचा फायदा घेताना, मुंबई, ठाणे, पुणे आणि पिंपरी चिंचवड या चार महानगरांतील झोपडपट्टीवासीयांनाही याच निर्णयाचे गाजर दाखवले आहे. ‘आवश्यकता भासल्यास याबाबत यथावकाश उचित निर्णय घेण्यात येईल,’ असे चार महानगरांतील झोपड्यांबद्दल म्हटले आहे. या विसंगतीचा फटका या चार शहरांत सुरू असलेल्या एसएआरएच्या प्रकल्पांना व त्यातील कोट्यवधींच्या गुंतवणुकीला बसणार आहे. १ जानेवारी २०००पर्यंतच्या झोपड्यांना संरक्षण देण्याची भूमिका सरकारने घेतली व अशा झोपडपट्टीवासियांना झोपड्या असलेली जागाच बहाल करणारा आदेश काढला. आशिया खंडातील सगळ्यात मोठ्या धारावी झोपडपट्टीधारकांनी उद्या हीच मागणी करत एसआरएला नकार दिल्यास, त्याचे राजकीय व सामाजिक परिणाम झाल्याशिवाय राहणार नाहीत, असे या क्षेत्रातील अभ्यासकांना वाटत आहे. किती आकाराची झोपडी आहे हे पाहून एसआरए योजना करताना ठराविक जागेचा फ्लॅट बांधून देणे आणि उर्वरित जागेवर व्यावसायिक वापर करणे ही योजना १९९५ साली युती सरकारने सुरू केली. पुढे आघाडी सरकारने या योजनेचे वाटोळे केले. आता पुन्हा सत्तेत आलेल्या युती सरकारने झोपड्यांच्या जागांची मालकीच त्यातील रहिवाशांना देण्याचे ठरविल्याने अतिक्रमण करणाऱ्यांच्या मनात कारवाईची कसलीही भीतीच उरणार नाही.एसआरएच्या योजना मुंबई, पुणे, ठाणे, पिंपरी चिंचवड आणि नागपूरमध्ये राबवली जाते. आहे. नव्या आदेशानुसार चार शहरे वगळून नागपूरला वेगळा न्याय लावला आहे. अन्य चार शहरांमध्ये एसआरएद्वारे झोपडपट्यांचा विकास करण्यात येत असल्याने त्या शहरांना हा आदेश लागू नसला तरी त्यांच्याबाबत यथावकाश उचित निर्णय घेतला जाईल असेही म्हटल्याने एसआरऐत सहभागी होणाऱ्यांच्या मनात संभ्रम निर्माण होईल.जागा मालकीची करून देताना, त्याचे शुल्क झोपडपट्टीवासियांकडून न घेता, स्थानिक स्वराज्य संस्था, प्राधिकरण यांना भरावे लागणार आहे. पुनर्वसन झाल्यानंतर शुल्काची वसुली झोपडपट्टीधारकांकडून करावी, असे सांगत सध्या चक्क मोफत जागा दिली जाणार आहे. नागपुरात एसआरए लागू असली तरी तिथे योजनेला प्रतिसादच नव्हता. आमची ५०० ते एक हजार चौरस फुटाची जागा सोडून आम्ही छोटे फ्लॅट का घ्यायचे, असा त्यांचा सवाल होता, अशा शब्दांत गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांनी नागपूर योजनेचे समर्थन केले.