शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

भीक मागणारी मुले केली गायब!

By admin | Updated: January 11, 2016 00:45 IST

सांगली, मिरजेत छापे : ‘आॅपरेशन स्माईल’चा परिणाम; तीन मुली सापडल्या

सचिन लाड -- सांगली वाट चुकलेल्या मुलांना पुन्हा त्यांच्या घरी पोहोचविण्यासाठी पोलिसांनी सुरू केलेल्या ‘आॅपरेशन स्माईल’ या मोहिमेचा चांगलाच परिणाम झाला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शहरात भीक मागण्यासाठी लहान मुलांचा वापर करणाऱ्या टोळीने या कारवाईचा चांगलाच धसका घेतला आहे. मुलांमार्फत पोलीस आपल्यापर्यंत पोहोचू नयेत, यासाठी या टोळीने मुलांनाच गायब केले आहे. त्यामुळे गेल्या चार दिवसात सांगली, मिरजेत भीक मागणाऱ्या एकाही मुलाचे दर्शन झालेले नाही. खेळण्या-बागडण्याचं, शाळेत जाण्याचं त्यांचं वय. या वयात त्यांना भीक मागण्यासाठी रस्त्यावर फिरविले जात असल्याचे चित्र शहरात दररोज पाहायला मिळते. चार ते बारा वयोगटातील ही मुले हातात ताट व ताटात देवीची मूर्ती ठेवून रस्त्यावर दिसेल त्या व्यक्तीकडे भीक मागताना दिसतात. ही मुले कुणाची? त्यांना ज्यांनी जन्माला घातले ते कुठे आहेत? ते काय करतात? असे प्रश्न या मुलांना पाहिल्यानंतर पडल्याशिवाय राहत नाहीत. ही मुले स्वत:च्या चैनीसाठी किंवा कुटुंब चालविण्याची जबाबदारी म्हणून भीक मागतात असे नाही, तर त्यांच्या माध्यमातून भीक मागणे सुलभ होते म्हणून त्यांचा वापर केला जात आहे. सांगली, मिरजेत अनेक सामाजिक संस्था आहेत. राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आहेत. तसेच शासनाचे विविध सामाजिक उपक्रम आहेत. मात्र तरीही बालभिकाऱ्यांच्या प्रश्नावर वाचा फोडण्यास कुणाला वेळ नाही.भीक मागणाऱ्या मुलांना रिक्षातून सांगलीतील राम मंदिर व मिरजेतील रेल्वे स्टेशन परिसरात सकाळी अकराला सोडले जाते. त्यानंतर त्यांना दुपारी एक वाजता नेण्यासाठी पुन्हा रिक्षा येते. दोन तासात भीक मागून वीस रुपयेही गोळा होत नाहीत. थंडीचा कडाका वाढला असताना मुलांच्या अंगावर स्वेटरही नसतो. या मुलांची भेट घेऊन चौकशी केली, तर ते शिकवल्यासारखे ठराविक उत्तर देतात. यामध्ये ते शाळेला जातोय, पण आज सुट्टी असल्याने भीक मागायला आलो आहे, आई किंवा वडील या दोघांपैकी एकाचे निधन झाले आहे, असे सांगतात. ही मुले एकमेकांची फार काळजी घेतात. चार वर्षाचं लेकरू सोबत असेल तर त्याची आपुलकीने काळजी घेतात.‘आॅपरेशन स्माईल’ ही मोहीम राबविणाऱ्या पथकातील सहायक पोलीस निरीक्षक संजय मेंढे यांच्या पथकाने गेल्या चार दिवसांपासून अशा मुलांवर वॉच ठेवला आहे. मुले गेली कुठे?‘आॅपरेशन स्माईल’ या मोहिमेंतर्गत वाट हरविलेल्या मुलांचा शोध घेतला जातो. पण भिकेसाठी त्यांचा वापर केला जात असेल, तर त्याचीही दखल घेतली जाते. त्यानुसार सांगली व मिरजेत मुलांचा शोध सुरू आहे. पोलीस आपल्यापर्यंत पोहोचू नयेत, यासाठी भीक मागणाऱ्या मुलांना रातोरात गायब करण्यात आले आहे. सांगलीत काँग्रेस भवन परिसरात केवळ तीन मुली सापडल्या. या मुलींना बालसुधारगृहात ठेवण्यात आले आहे. त्यांचे पालक अद्याप पुढे आलेले नाहीत. यावरुन या मुली अनाथ असून, त्यांचा भिकेसाठी वापर केला असण्याची शक्यता आहे. पण अन्य मुले गेली कुठे? असा प्रश्न पोलिसांना पडला आहे. दयेसाठी दयनीय अवस्था भीक मागण्यासाठी ज्या लहान मुलांचा वापर आणि उपयोग केला जातो, त्यांना पुरेसे खाण्यास दिले नसल्याचे त्यांच्या तब्येतीवरुन दिसून येते. या मुलांकडे पाहून कुणालाही दया आली पाहिजे, अशाच अवस्थेत त्यांना ठेवले जातेडोळ्यात तरळतात अश्रू...भीक मागणाऱ्या मुलांकडे पाहिले तर, डोळ्यात अश्रू उभारतात. अंगावर धड कपडे नाहीत, केस वाढलेले, पायात चप्पल नाही. शर्टाची बटणे तुटलेली, डोळ्यावर प्रचंड ताण, पोट खपाटीला गेलेले असते. या मुलांना पाहून अनेकांना दया येते. यामुळे काहीजण भीक देतात, तर काहीजण भिकेचा फंडा म्हणून त्यांना झिडकारतात. या कोवळ्या मुलांना भीक मागायला कोण लावतो, यामागचे अर्थकारण काय, याचा विचार करायला कुणालाही वेळ नाही.