शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

बीडच्या आनंदवनात जुळणार एचआयव्हीबाधितांच्या रेशिमगाठी

By admin | Updated: April 28, 2017 14:10 IST

एचआयव्हीसारखा दुर्धर आजार जडल्याने नातेवाईकांसह समाजाने झिडकारलेल्या मुलीला बीडच्या इन्फंट इंडियाने आधार दिला.

ऑनलाइन लोकमत 

औरंगाबाद, दि. 28 -  एचआयव्हीसारखा दुर्धर आजार जडल्याने नातेवाईकांसह समाजाने झिडकारलेल्या मुलीला बीडच्या इन्फंट इंडियाने आधार दिला. पोटच्या लेकारांप्रमाणे सांभाळले. एचआयव्हीबाधित असलेलाच जीवनसाथी तिच्यासाठी शोधला. या बाधितांचा विवाह सोहळा महाराष्ट्रदिनी १ मे रोजी आनंदवनात होणार आहे. 

आई-वडिलांच्या निधनानंतर समाजासह नातेवाईकांनी झिडकारलेल्या मानसी व सुप्रिया (नाव बदललेले) दोन सख्ख्या बहिणी साधारण दहा वर्षांपूर्वी बीडच्या आनंदवनात दाखल झाल्या. अशा परिस्थितीत त्यांना ‘इन्फंट इंडिया’ने मायेची ऊब दिली. संचालक संध्या बारगजे व दत्ता बारगजे यांनी या दोघींना आई-वडिलांचे प्रेम दिले. त्यांना शाळेत पाठविले. आता मानसीला १८ वर्षे पूर्ण झाली असून, तिचे दहावीपर्यंत शिक्षणही झाले आहे. सुप्रिया आजही शाळेत जाऊन अधिकारी बनण्याचे स्वप्न पाहत आहे. 

मानसीचे लग्नाचे वय झाल्याने तिचे हात पिवळे करण्याची जबाबदारी बारगजे दाम्पत्यावर होती. त्याप्रमाणे त्यांनी मुलाचा शोध घेतला आणि एक चांगला जीवनसाथी शोधून त्याच्याशी विवाह लावण्याचा निर्णय घेतला. मानसी ही १ मे रोजी बोहल्यावर चढणार आहे. तिला एक चांगला जीवनसाथी मिळाला असून, तो अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी येथील रहिवासी आहे. त्याचे बी.ए.पर्यंत शिक्षण पूर्ण झालेले आहे. या दोघांना आशीर्वाद देण्यासाठी मंत्री, माजी मंत्री, प्रशासकीय अधिकारी, राज्यातील सामाजिक कार्यकर्त्यांना लग्नाचे निमंत्रण दिले असल्याचे दत्ता बारगजे यांनी सांगितले.

संसारोपयोगी साहित्य देणार भेटविविध क्षेत्रांतील मान्यवर, ग्रामस्थ, सामाजिक कार्यकर्ते हे मानसीला संसारोपयोगी साहित्य भेट देणार आहेत. वऱ्हाडींसाठी चटणी-भाकर हा जेवणाचा मेन्यू असणार आहे. लग्नाचा सर्व खर्च सामाजिक बांधिलकी असणारे लोक उचलणार आहेत.

यापूर्वी चौघींचे कन्यादानयापूर्वी इन्फंट इंडियातील चार मुलींचा विवाह सोहळा आनंदवनात पार पडला आहे. त्यांचे विवाह समाजातील लोकांनी केलेल्या मदतीवरच झालेले आहेत. सध्या या चौघींचे संसार सुखाने सुरू आहेत. यापैकी एका जोडप्याच्या घरी पाळणा हलला आहे. विशेष म्हणजे जन्मलेले हे मूल एचआयव्ही पॉझिटिव्ह नाही. 

कोठे आहे हे आनंदवन?सोलापूर-धुळे या राष्ट्रीय महामार्गावर बीडपासून दहा कि.मी. अंतरावर पालीजवळील बिंदुसरा धरणाच्या उंच टेकडीवर हे आनंदवन उभारलेले आहे. येथे लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत एचआयव्हीबाधित लोक वास्तव्यास आहेत. यामध्ये चार महिला, २७ मुली व २८ मुलांचा समावेश आहे. येथे मुलांसाठी शाळा आहे. महाविद्यालयीन शिक्षणासाठी मुले रोज बीड शहरात येतात.