शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

महासत्ता बनण्यासाठी शिक्षण तळागाळापर्यंत पोहोचायला हवे

By admin | Updated: June 2, 2014 22:59 IST

आपला देश महासत्ता बनण्याकडे वाटचाल करीत आहे. यामध्ये शिक्षणाची भूमिका महत्वाची आहे.

राज्यपाल के. शंकरनारायणन यांचे मत : रायन इंटरनॅशनल स्कूलचे उद्घाटनपुणे : आपला देश महासत्ता बनण्याकडे वाटचाल करीत आहे. यामध्ये शिक्षणाची भूमिका महत्वाची आहे. आजही तळागाळापर्यंत शिक्षण पोहोचलेले नाही. गरीब लोक, आदिवासी, जाती-जमाती शिक्षणापासून वंचित आहे. जोपर्यंत शिक्षण त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही, तोपर्यंत भारत खर्‍याअर्थाने महासत्ता होणार नाही, असे मत राज्यपाल के. शंकरनारायणन यांनी व्यक्त केले.रेयान इंटरनॅशनल स्कूलच्या उद्घाटन कार्यक्रम ते बोलत होते. याप्रसंगी पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे, प्रसिध्द अभिनेता जॉनी लिव्हर, रेयान इंटरनॅशनल ग्रुपचे अध्यक्ष डॉ. ए. एफ. पिन्टो व्यासपीठावर उपस्थित होते. खासदार संजय काकडे, उषा काकडे, ग्रुपच्या व्यवस्थापकीय संचालिका ग्रेस पिन्टो, मुख्य कार्यकारी अधिकारी रेयान पिन्टो कार्यक्रमास उपस्थित होते. राज्यपाल म्हणाले, भारत महासत्ता बानण्याच्या मार्गावर आहे. आजची मुले हिच देशाचे उद्याचे भविष्य असणार आहे आणि तेच वेगवेगळया क्षेत्रात देशाचे नेतृत्व करणार आहे. हे साध्य करण्यासाठी आपली शिक्षण पध्दतीत बदल करून नवकल्पनांना वाव दिला पाहिजे आणि सर्वसमावेशक शिक्षण पध्दती अवलंबली पाहिजे. पूर्ण जग आता एक कुटुंब होत आहे. अशात आपल्या मुलाला चांगला नागरिक बनविण्याची जबाबदारी आई-वडील व शिक्षकांवर आहे. त्यामुळे लहानपणापासूनच त्यांचे चारित्र्य घडविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. माहिती, ज्ञान सर्वांपर्यंत पोहोचविण्यात माहिती तंत्रज्ञान, आयसीटी हे आजच्या काळात महत्वाची भूमिका बजावत आहे. त्याचा वापर शाळांनी केला पाहिजे. पुणे हे एक महत्वाचे शहर असून त्याला एक ऐतिहासिक परंपरा आहे. ऑस्क्सफर्ड ऑफ द ईस्ट अशी ओळख असलेल्या पुणे विद्यापीठात २० हजाराहून अधिक परदेशी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, ही गौरवाची बाब आहे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.डॉ. पिन्टो यांनी मनोगत व्यक्त केले.