शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

जलसाक्षर बनू या!

By admin | Updated: July 20, 2016 05:20 IST

माणसाला पाण्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.

माणसाला पाण्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे, सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेस्तवर त्याचा पाण्याशी संबंध येतो. एवढेच नव्हे, तर रात्री झोपेतून जाग आल्यावरसुद्धा त्याला आठवणे येते ती पाण्याचीच. झोप चाळवली की तो उठतो, एक ग्लास पाणी पितो व पुन्हा निद्रेच्या आधीन होतो. सकाळी मुखमार्जन करणे, अंघोळ करणे, कपडे धुणे, स्वयंपाक करणे, भांडी घासणे, अंगणात सडा संमार्जन करणे, घर साफ करणे, बगीचाला पाणी देणे, वाहने साफ करणे या सर्व कामांसाठी पाणी लागते.शेती तर पाण्याशिवाय होऊच शकत नाही. शेती कसण्याच्या कोरडवाहू शेती व बागायत शेती अशा दोन पद्धती आहेत. कोरडवाहू शेती पूर्णपणे पावसावर अवलंबून असते. जर पिकांना देण्यासाठी पाणी असेल, तर शेती उत्पादनात दुपटीने वा तिपटीने वाढ होऊ शकते. याचा अर्थ असा की, शेती कसणे कोरडवाहू असो वा बागायती असो, पाण्याशिवाय शेती होऊच शकत नाही. आपण दररोज वीज वापरतो, ती कशी निर्माण होते हो? ती अणुशक्तीपासून, कोळशापासून, हवेपासून, सूर्यशक्तीपासून वा पाण्यापासून निर्माण केली जाते. अणुशक्तीपासून निर्माण होणारी वीज बरीच महाग असते. त्यापेक्षा स्वस्त वीज कोळशापासून तर सर्वात स्वस्त वीज पाण्यापासून निर्माण होते. अजून आपल्या देशात बाकीच्या स्रोतांपासून म्हणावी तेवढी वीज निर्माण होत नाही. देशात नद्यांवर धरणे बांधून त्या ठिकाणी वीजनिर्मिती प्रकल्प उभारले जातात व तिथे वीज निर्माण करून ती सर्वत्र वितरित केली जाते.आज कारखानदारी सर्वत्र आपल्या जीवनाचा एक आवश्यक भाग बनला आहे. ती तरी पाण्याशिवाय चालू शकते काय? मुळीच नाही. कारखान्यातील यंत्रे थंड ठेवण्यासाठी, कारखान्याचा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी, मजुरांसाठी बांधलेली स्वच्छतागृहे साफ ठेवण्यासाठी, उपहारगृहातील अन्न शिजवण्यासाठी, एअर कंडिशनिंगची यंत्रे चालवण्यासाठी पाणी आवश्यकच ठरते. सर्वसामान्य जीवन असो, शेती असो, शक्ती असो, कारखानदारी असो वा प्रवास असो सर्वांना पाणी हा आधार असतो व त्याचेमुळेच आपले जीवन सुसह्य होते.सध्या पाण्यासाठी जी मारामार चालू आहे, त्यामुळे नागरी जीवन विस्कळीत झाले आहे. शहरातले अनेक नागरिक पाण्याशिवाय हवालदिल झाले आहेत. मनमाडला महिन्यातून एकदा, धुळ्याला आठवड्यातून एकदा, औरंगाबादला तीन दिवसांतून एकदा, तर पुण्याला दिवसाआड पाणी पुरविले जाते. ही पाळी आपल्यावर येऊ नये असे वाटत असेल, तर पाण्याबाबत आपण जास्त जागरूक असले पाहिजे. सर्व समाज जलसाक्षर झाला, तर ही वेळ आपल्यावर येणार नाही. चला तर मग, आपणही जल साक्षर बनू या. - डॉ. दत्ता देशकर