शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

आम आदमी बनून बघा

By admin | Updated: April 26, 2016 06:14 IST

आम आदमी बना म्हणजे सामान्यांना कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागते याची कल्पना येईल, अशा शब्दांत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी बँकांच्या अधिकाऱ्यांना कानपिचक्या दिल्या.

मुंबई : शासकीय अधिकारीपदाची झुल बाजूला ठेवून काही क्षणांसाठी आम आदमी बना म्हणजे सामान्यांना कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागते याची आपल्याला कल्पना येईल, अशा शब्दांत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी शासकीय आणि बँकांच्या अधिकाऱ्यांना कानपिचक्या दिल्या. इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ पब्लिक अ‍ॅडमिनिस्ट्रेशन (आयआयपीए) आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने यशवंतराव चव्हाण स्मृती व्याखानमालेंतर्गत राजन यांचे, ‘स्टार्टअप इंडिया’ विषयावर मंत्रालयात व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी ते म्हणाले की, स्टार्ट अप इंडियांतर्गत अतिशय लहानलहान व्यावसायिकांना विकासाच्या प्रक्रियेत सामावून घेण्यावर भर द्यायचा उद्देश समोर ठेवून अधिकाऱ्यांनी वागणे अपेक्षित आहे. त्यासाठी त्यांना येणाऱ्या अडचणी स्वत:ला त्यांच्या जागी ठेवून समजवून घ्याव्या लागतील. स्टार्ट अप इंडियासाठी पोषक वातावरणाची निर्मिती करणे आवश्यक असून त्यासाठी वेगेवेगळ्या नियमनांची संख्या कमीत कमी करणे, करपद्धती अधिक पारदर्शक करणे, शिक्षण, आरोग्य आणि विम्याची व्याप्ती वाढविणे गरजेचे आहे. यासाठी सरकारी अधिकाऱ्यांची भूमिका महत्त्वाची आहे. छोट्या उद्योजकांना व्यवसायासाठी कर्ज देण्याची पद्धत सुलभ करणे, बँकेच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्याशी उत्तम समन्वयाचे आणि विश्वासाचे नाते जपणे यावर भर दिला पाहिजे. कारण या उद्योजकांभोवतीच स्टार्ट अप इंडियाची संकल्पना केंद्रित आहे. आयआयपीएचे अध्यक्ष आणि राज्याचे मुख्य सचिव स्वाधिन क्षत्रिय यांनी राजन यांचे स्वागत केले. सचिव विजय सतबिर सिंग यांनी प्रास्ताविक केले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे सचिव शरद काळे यांनीही विचार व्यक्त केले. (विशेष प्रतिनिधी)