शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
3
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
4
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
5
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
6
मेहुण्याचा जाच आणि भावाचा राग! दारू पाजली अन् सपासप केले वार; वादाचं कारण ऐकून होईल संताप
7
घटस्फोटानंतर मुलांपासून दूर झाली अभिनेत्री, पतीने ख्रिसमसलाही भेटू दिलं नाही; म्हणाली...
8
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
9
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
10
'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर स्वत:च्याच लग्नात नाचला मराठी अभिनेता, सगळे बघतच राहिले, व्हिडीओ व्हायरल
11
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
12
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
13
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
14
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
15
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
16
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
18
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
19
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
20
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
Daily Top 2Weekly Top 5

आम आदमी बनून बघा

By admin | Updated: April 26, 2016 06:14 IST

आम आदमी बना म्हणजे सामान्यांना कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागते याची कल्पना येईल, अशा शब्दांत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी बँकांच्या अधिकाऱ्यांना कानपिचक्या दिल्या.

मुंबई : शासकीय अधिकारीपदाची झुल बाजूला ठेवून काही क्षणांसाठी आम आदमी बना म्हणजे सामान्यांना कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागते याची आपल्याला कल्पना येईल, अशा शब्दांत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी शासकीय आणि बँकांच्या अधिकाऱ्यांना कानपिचक्या दिल्या. इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ पब्लिक अ‍ॅडमिनिस्ट्रेशन (आयआयपीए) आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने यशवंतराव चव्हाण स्मृती व्याखानमालेंतर्गत राजन यांचे, ‘स्टार्टअप इंडिया’ विषयावर मंत्रालयात व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी ते म्हणाले की, स्टार्ट अप इंडियांतर्गत अतिशय लहानलहान व्यावसायिकांना विकासाच्या प्रक्रियेत सामावून घेण्यावर भर द्यायचा उद्देश समोर ठेवून अधिकाऱ्यांनी वागणे अपेक्षित आहे. त्यासाठी त्यांना येणाऱ्या अडचणी स्वत:ला त्यांच्या जागी ठेवून समजवून घ्याव्या लागतील. स्टार्ट अप इंडियासाठी पोषक वातावरणाची निर्मिती करणे आवश्यक असून त्यासाठी वेगेवेगळ्या नियमनांची संख्या कमीत कमी करणे, करपद्धती अधिक पारदर्शक करणे, शिक्षण, आरोग्य आणि विम्याची व्याप्ती वाढविणे गरजेचे आहे. यासाठी सरकारी अधिकाऱ्यांची भूमिका महत्त्वाची आहे. छोट्या उद्योजकांना व्यवसायासाठी कर्ज देण्याची पद्धत सुलभ करणे, बँकेच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्याशी उत्तम समन्वयाचे आणि विश्वासाचे नाते जपणे यावर भर दिला पाहिजे. कारण या उद्योजकांभोवतीच स्टार्ट अप इंडियाची संकल्पना केंद्रित आहे. आयआयपीएचे अध्यक्ष आणि राज्याचे मुख्य सचिव स्वाधिन क्षत्रिय यांनी राजन यांचे स्वागत केले. सचिव विजय सतबिर सिंग यांनी प्रास्ताविक केले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे सचिव शरद काळे यांनीही विचार व्यक्त केले. (विशेष प्रतिनिधी)