शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
3
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
4
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
5
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
6
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
7
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
8
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
9
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
10
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
11
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
12
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
13
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
14
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
15
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
16
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
17
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
18
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
19
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?

महाराष्ट्राच्या प्रगतीमुळेच मोदींची प्रचारात पायपीट

By admin | Updated: October 12, 2014 23:30 IST

सुप्रिया सुळे : मानसिंगराव नाईक यांच्या प्रचारार्थ शिराळ्यात सभा

शिराळा : प्रत्येक गावात रस्ते, प्रत्येकाच्या हातात मोबाईल, प्रत्येकाच्या घरात पाणी, एवढ्या सुविधा दिल्या आहेत. या मतदारसंघात येऊन विश्वास कारखान्यावर जा, म्हणजे तुम्हाला समजेल कोठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र! महिला असुरक्षित आहेत म्हणता, म्हणजे येथील पुरुषांवर ठपका ठेवता? येथील पुरुष सुसंस्कृत आहेत. त्यांना महिलांबाबत आदर आहे. ही आमची संस्कृती आहे. या सर्व प्रगतीमुळेच नरेंद्र मोदींना २५-२५ सभा घ्याव्या लागतात, अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.येथील सोमवार पेठेत राष्ट्रवादीचे उमेदवार आमदार मानसिंगराव नाईक यांच्या प्रचार सभेत त्या बोलत होत्या.खा. सुळे म्हणाल्या की, महागाई कमी करण्याचे आश्वासन मोदी सरकारने पाळले नाही. शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. जे मोदींबरोबर गेले, त्यांनाही आता शेतकऱ्यांचा विसर पडला आहे. शरद पवार यांनी प्रत्येकवेळी शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. मोदी सरकार या महाराष्ट्राची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करीत आहे. येथील प्रगती पाहून मोदी २५-२५ सभा घेतात. त्यांना येथील निवडणुकीचीच जास्त काळजी वाटते. तिकडे पाकिस्तान-चीन यांच्या अतिक्रमणाबाबत त्यांनी पूर्ण दुर्लक्ष केले आहे. या मतदारसंघात दरवेळी पक्ष बदलणारे विरोधक आहेत. दरवेळी भूमिका बदलणारे या मतदारसंघाचे भवितव्य कसे सुधारणार? याउलट मानसिंगराव नाईक यांनी राज्यात सर्वात उच्चांकी ऊसदर दिला. मतदारसंघातील प्रत्येक गावात विकास केला. महाराष्ट्र कोठे नेऊन ठेवला हे पाहायचे असेल, तर शिराळा मतदारसंघातील विश्वास उद्योग पहा. काळ्या मातीशी, शेतकऱ्यांच्या रक्ताशी इमान राखणारा, न्याय देणारा आमचा उमेदवार आहे. खासदार पवार यांना चांगल्या आणि वाईट दिवसांत या तालुक्याने सतत साथ दिली आहे, असेही खा. सुळे यांनी सांगितले.यावेळी माजी ग्रामविकासमंत्री जयंत पाटील म्हणाले की, १५ वर्षांत येथील विरोधकांनी वारणा नदीचे पाणी पात्राबाहेर नेले नाही, मात्र पाच वर्षांत मानसिंगरावांनी वाकुर्डे आणून वारणा नदीचे पाणी उत्तर भागात आणले. राजकारणात नात्यांचा संबंध नसतो. नात्यावरून राजकारण बदलू शकत नाही. आता वाळवा तालुक्यातील २८ ऐवजी ४८ गावे या मतदारसंघात आहेत. त्यामुळे आता २६ हजार नाही, तर ५० हजाराने मानसिंगरावांना विजयी करणार आहे.आमदार नाईक म्हणाले की, शेतकरी महिला, युवक यांना समान न्याय देऊन समतोल विकासाची भूमिका ठेवली. विरोधकांनी १५ वर्षे फक्त भाषणेच केली आणि वाकुर्डेवर केवळ २० कोटीचा खर्च केला. मात्र आपणपाच वर्षात १६५ कोटींची कामे या योजनेची केली. गिरजवडे मध्यम प्रकल्पाचे २५ वर्षे रेंगाळलेले काम सुरू झाले आहे. यावेळी विजयराव नलवडे, भीमराव गायकवाड, सम्राटसिंह नाईक, अ‍ॅड. भगतसिंग नाईक यांनी मनोगत व्यक्त केली. डॉ. प्रतापराव पाटील, रवींद्र बर्डे, हंबीरराव नाईक, उदयसिंगराव नाईक, सुरेश चव्हाण, डॉ. उषाताई दशवंत, सौ. सुनीतादेवी नाईक, वैशाली नाईक, रणजितसिंह नाईक आदी उपस्थित होते. (वार्ताहर)उल्लू मत बनाओ...एन. डी. पाटील, शरद पवार तत्त्वाशी एकनिष्ठ आहेत. त्याच तालमीत जयंतराव तयार झाले आहेत. त्यामुळे राजकारणात ते नातीगोती बाजूला ठेवतात. मोदींना येथे २५-२५ सभा घ्याव्या लागतात. नरेंद्रभैय्या, उल्लू मत बनाओ, येथे साधे लोक राहतात, असा टोला सुळे यांनी लगावला.