शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
3
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
4
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
5
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
8
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
9
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
10
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
11
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
12
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
13
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
14
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
15
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
16
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
17
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
18
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
19
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
20
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्राच्या प्रगतीमुळेच मोदींची प्रचारात पायपीट

By admin | Updated: October 12, 2014 23:30 IST

सुप्रिया सुळे : मानसिंगराव नाईक यांच्या प्रचारार्थ शिराळ्यात सभा

शिराळा : प्रत्येक गावात रस्ते, प्रत्येकाच्या हातात मोबाईल, प्रत्येकाच्या घरात पाणी, एवढ्या सुविधा दिल्या आहेत. या मतदारसंघात येऊन विश्वास कारखान्यावर जा, म्हणजे तुम्हाला समजेल कोठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र! महिला असुरक्षित आहेत म्हणता, म्हणजे येथील पुरुषांवर ठपका ठेवता? येथील पुरुष सुसंस्कृत आहेत. त्यांना महिलांबाबत आदर आहे. ही आमची संस्कृती आहे. या सर्व प्रगतीमुळेच नरेंद्र मोदींना २५-२५ सभा घ्याव्या लागतात, अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.येथील सोमवार पेठेत राष्ट्रवादीचे उमेदवार आमदार मानसिंगराव नाईक यांच्या प्रचार सभेत त्या बोलत होत्या.खा. सुळे म्हणाल्या की, महागाई कमी करण्याचे आश्वासन मोदी सरकारने पाळले नाही. शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. जे मोदींबरोबर गेले, त्यांनाही आता शेतकऱ्यांचा विसर पडला आहे. शरद पवार यांनी प्रत्येकवेळी शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. मोदी सरकार या महाराष्ट्राची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करीत आहे. येथील प्रगती पाहून मोदी २५-२५ सभा घेतात. त्यांना येथील निवडणुकीचीच जास्त काळजी वाटते. तिकडे पाकिस्तान-चीन यांच्या अतिक्रमणाबाबत त्यांनी पूर्ण दुर्लक्ष केले आहे. या मतदारसंघात दरवेळी पक्ष बदलणारे विरोधक आहेत. दरवेळी भूमिका बदलणारे या मतदारसंघाचे भवितव्य कसे सुधारणार? याउलट मानसिंगराव नाईक यांनी राज्यात सर्वात उच्चांकी ऊसदर दिला. मतदारसंघातील प्रत्येक गावात विकास केला. महाराष्ट्र कोठे नेऊन ठेवला हे पाहायचे असेल, तर शिराळा मतदारसंघातील विश्वास उद्योग पहा. काळ्या मातीशी, शेतकऱ्यांच्या रक्ताशी इमान राखणारा, न्याय देणारा आमचा उमेदवार आहे. खासदार पवार यांना चांगल्या आणि वाईट दिवसांत या तालुक्याने सतत साथ दिली आहे, असेही खा. सुळे यांनी सांगितले.यावेळी माजी ग्रामविकासमंत्री जयंत पाटील म्हणाले की, १५ वर्षांत येथील विरोधकांनी वारणा नदीचे पाणी पात्राबाहेर नेले नाही, मात्र पाच वर्षांत मानसिंगरावांनी वाकुर्डे आणून वारणा नदीचे पाणी उत्तर भागात आणले. राजकारणात नात्यांचा संबंध नसतो. नात्यावरून राजकारण बदलू शकत नाही. आता वाळवा तालुक्यातील २८ ऐवजी ४८ गावे या मतदारसंघात आहेत. त्यामुळे आता २६ हजार नाही, तर ५० हजाराने मानसिंगरावांना विजयी करणार आहे.आमदार नाईक म्हणाले की, शेतकरी महिला, युवक यांना समान न्याय देऊन समतोल विकासाची भूमिका ठेवली. विरोधकांनी १५ वर्षे फक्त भाषणेच केली आणि वाकुर्डेवर केवळ २० कोटीचा खर्च केला. मात्र आपणपाच वर्षात १६५ कोटींची कामे या योजनेची केली. गिरजवडे मध्यम प्रकल्पाचे २५ वर्षे रेंगाळलेले काम सुरू झाले आहे. यावेळी विजयराव नलवडे, भीमराव गायकवाड, सम्राटसिंह नाईक, अ‍ॅड. भगतसिंग नाईक यांनी मनोगत व्यक्त केली. डॉ. प्रतापराव पाटील, रवींद्र बर्डे, हंबीरराव नाईक, उदयसिंगराव नाईक, सुरेश चव्हाण, डॉ. उषाताई दशवंत, सौ. सुनीतादेवी नाईक, वैशाली नाईक, रणजितसिंह नाईक आदी उपस्थित होते. (वार्ताहर)उल्लू मत बनाओ...एन. डी. पाटील, शरद पवार तत्त्वाशी एकनिष्ठ आहेत. त्याच तालमीत जयंतराव तयार झाले आहेत. त्यामुळे राजकारणात ते नातीगोती बाजूला ठेवतात. मोदींना येथे २५-२५ सभा घ्याव्या लागतात. नरेंद्रभैय्या, उल्लू मत बनाओ, येथे साधे लोक राहतात, असा टोला सुळे यांनी लगावला.