शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
2
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
3
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
4
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
5
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
6
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
7
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
8
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
9
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
10
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
11
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
12
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
13
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
14
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
15
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
16
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
17
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
18
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
19
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
20
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ

मी आव्हान दिल्यामुळेच मोदींनी कऱ्हाड टाळलं!

By admin | Updated: October 13, 2014 23:06 IST

पृृथ्वीराज चव्हाण : गुजरातचे महत्त्व वाढविण्यासाठी महाराष्ट्रावर अन्याय सहन करणार नाही

कऱ्हाड : ‘गुजरात मॉडेलची टीमकी वाजविणाऱ्या नरेंद्र मोदींना लोकसभा निवडणुकीपूर्वीपासून एकाच व्यासपीठावर येण्याचे आव्हान देतोय; पण त्यांनी ते अद्याप स्वीकारलेले नाही़ कऱ्हाडला गेलो तर माझ्याशी सामना होईल़ म्हणूनच त्यांनी कऱ्हाडला येण्याचे टाळले,’ असा टोला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी लगावला़ कऱ्हाड येथे आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते़ यावेळी सत्त्वशीला चव्हाण, व्यंकटराव घोरपडे, प्रदेश काँग्रसचे प्रवक्ते अ‍ॅड़ महादेव शेलार, आमदार आनंदराव पाटील, ज्येष्ठ नेते मदनराव मोहिते, सुभाषराव जोशी, डॉ़ इंद्रजित मोहिते, उपनगराध्यक्ष राजेंद्र यादव, अरुण जाधव, ‘एनएसयूआय’चे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे, माजी नगराध्यक्षा शारदा जाधव, अर्चना पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती़ पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ‘गेले काही दिवस पंतप्रधान नरेंद्र मोदी कऱ्हाडला येणार येणार, असे ऐकत होतो़ मोदींचे सभेचे राजकारण झाले. पंतप्रधान तिथे जातात, जिथे विजयाची थोडीशी तरी खात्री असते. यातून तुम्ही काय ओळखायचं ते ओळखलं असेलच! नरेंद्र मोदींची सभा स्टेडियमवर आयोजित केल्याने आम्हाला नाईलाजास्तव मुख्य बाजारपेठेत सभा घ्यावी लागली़ परिणामी व्यापाऱ्यांना झालेल्या त्रासाबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो़ खरंतर मोदी कऱ्हाडात येऊन काय बोलतात, याची मला उत्सुकता होती़ मला त्यांना उत्तरं द्यायची होती; पण ती संधी मला मिळाली नाही़ त्यांची मी जरूर वाट पाहीऩ गुजरात आमचा छोटा भाऊ आह़े़ त्यानं प्रगती केली तर आम्हाला आनंदच वाटेल; पण गुजरातचे महत्त्व वाढविण्यासाठी महाराष्ट्रावर अन्याय करायचा प्रयत्न केला तर ते आम्ही सहन करणार नाही़ महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून भाजपकडे चेहरा नाही़ मुख्यमंत्रिपदावरून त्यांच्यात वाद आहे़ हा वाद असाच कायम ठेवत मोदी आणि शहांना दिल्लीतून रिमोटद्वारे महाराष्ट्र चालवायचा आहे़ ‘आरएसएस’च्या तालावर नाचणारे भाजप ताकाला जाऊन मोगा लपविण्याचा प्रयत्न करीत आहे़ तो महाराष्ट्रातील जनता हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही़’ (प्रतिनिधी) ते दुसऱ्याला काय मंत्री करणार ? भाजपचे नेते राजीवप्रताप रुडी यांची आज कऱ्हाडात सभा झाली म्हणे! त्यांनी इथल्या भाजपच्या उमेदवाराला साथ द्या, त्यांना मंत्री करतो, असे सांगितले; पण ज्या रुडींना केंद्रात मोदींनी मंत्री केले नाही, ते दुसऱ्यांना काय मंत्री करणार? - पृथ्वीराज चव्हाण पृथ्वीराज चव्हाणांच्या रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसादकाँग्रेसचे उमेदवार व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची प्रचार रॅली दुपारी तीनच्या सुमारास आझाद चौकातून निघालेली ही रॅली दीड तासांनी दत्त चौकामध्ये पोहोचली.मी महाराष्ट्राचेच नेतृत्व करणार !निवडणुकीनंतर मी दिल्लीला जाऊन बसणार, अशी टीका आज काही उमेदवार करत आहेत; पण मी आता महाराष्ट्रात रमलोय. यापुढे मी कऱ्हाडातच राहणार असून, महाराष्ट्राचे राजकारण करणार आहे़ महाराष्ट्राला विकासाच्या सर्वोच्च शिखरावर नेऊन ठेवण्यासाठी माझा प्रयत्न राहील, असे सांगत चव्हाणांनी आपण मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असल्याचे स्पष्ट केले़ काँग्रेस-सेना आमने-सामनेकाँग्रेसने पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रचारार्थ शहरात दुपारी भव्य पदयात्रा काढली़ त्याचवेळी शिवसेनेच्या आदित्य ठाकरे यांची रॅली निघाली होती़ शनिवार पेठेत त्या दोन्ही रॅली आमने-सामने आल्या. मात्र, पोलीस निरीक्षक बी़ आऱ पाटील यांनी प्रसंगावधान राखत ठाकरेंची रॅली अन्य मार्गाने पुढे काढली़