शहरं
Join us  
Trending Stories
1
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
2
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
3
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
4
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
5
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
6
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?
7
"माझं घर वाचवा...", कवी सौमित्र यांची मुख्यमंत्र्यांना कळकळीची विनंती, बिल्डरकडून फसवणुकीचा आरोप
8
Uddhav Thackeray: निवडणूक आयोग हे राष्ट्रपतींपेक्षाही मोठे झाले का? उद्धव ठाकरेंचा कडवट सवाल!
9
दिवसाढवळ्या बँकेवर दरोडा, बंदुकीच्या धाकावर हिसकावू लागला पैसे, पण कर्मचाऱ्यांनी हिंमत दाखवली आणि...  
10
राहुल गांधींविरोधात वक्तव्य भोवले; काँग्रेसच्या मंत्र्याला द्यावा लागला राजीनामा, नेमकं काय म्हणाले?
11
अमानुष! "आजीला सोडून दे", सुनेची वृद्ध सासूला बेदम मारहाण; वाचवण्यासाठी चिमुकल्याची धडपड
12
एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...
13
'एका व्यक्तीच्या मूर्खपणामुळे देशाचे नुकसान..; केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूंचा काँग्रेसवर घणाघात
14
मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा
15
अंगारक संकष्ट चतुर्थीच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status शेअर करा; गणेशभक्तांना द्या शुभेच्छा!
16
बँका मिनिमम बॅलन्स का ठेवतात? 'या' कारणामुळे तुमच्या खात्यातून कापले जातात पैसे!
17
Bigg Boss 19: सलमानच्या शोची उपेंद्र लिमयेंना ऑफर? अभिनेता म्हणाला- "मला अनेकांनी विचारलं..."
18
'भारतात शिक्षण, आरोग्य सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलंय'; सरसंघचालक भागवतांनी व्यक्त केली चिंता
19
एअर इंडियामागची पीडा काही संपेना! आता लँडिंगनंतर दरवाजेच उघडले नाही; तासभर अडकून राहिले प्रवासी
20
भाजपाकडून विधानसभा निवडणूक लढवलेला नेता चकमकीत ठार, अनेक गुन्ह्यांत होता वाँटेड

भुईमुगाला भाव नसल्याने शेतकर्‍यांचा अपेक्षाभंग

By admin | Updated: May 12, 2014 19:43 IST

बीजवाई २० किलोची बॅग २४०० रुपयाला, तर भुईमूग १ क्विंटल २००० रु.

सौंदळा: परिसरातील वारखेड, वारी, पिंपरखेड, बादखेड या शिवारातील शेतकर्‍यांनी उन्हाळी भुईमुगाचा पेरा केला; परंतु भुईमुगाला भाव नसल्याने शेतकर्‍यांचा अपेक्षाभंग झाल्याचे दिसत आहे. सौंदळा परिसरातील वारखेड, वारी, पिंपरखेड, बादखेड या शिवारातील शेतकर्‍यांनी उन्हाळी भुईमुगाचा पेरा केला. जानेवारी ते मे महिन्यापर्यंत अहोरात्र भुईमूग पिकाची मशागत केली. भुईमूग काढणीला आला असताना परप्रांतातून पोटाची खळगी भरण्यसाठी आदिवासी हजारो मजूर सौंदळ्यात दाखल झाले. भुईमूग काढणीला मजुरांचे जथ्थेच्या जथ्थे वाहनाद्वारे सौंदळ्यात आले. बर्‍याचशा मजुरांना काम न मिळाल्याने ते रिकाम्या हातानेच गावी परत गेले. भुईमूग काढणी सुरू असतानाच भुईमुगाचे पीक एकरी ८ क्विंटलपासून ते २० क्विंटलपर्यंत कमी-जास्त प्रमाणात होत आहे. मार्केटमध्ये १५०० पासून तर ३३०० रुपयापर्यंत भुईमुगाला भाव मिळत आहे. मागील वर्षीच्या तुलनेत १२०० ते १४०० रुपये भाव कमी असल्याने शेतकर्‍यांच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखे झाले आहे. भुईमुगाची बीजवाई २० किलोची बॅग २४०० रुपयाला, तर भुईमूग १ क्विंटल २००० रु. ही कोणती तफावत आहे, असा प्रश्न उपस्थित करीत शासनाने भुईमूग पिकाला हमी हमीभाव देऊन शेतकर्‍यांची होणारी पिळवणूक थांबवावी, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून करण्यात येत आहे.