शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
2
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
3
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
4
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: ईश्वरपूरमध्ये जयंत पाटलांचा महायुतीला मोठा धक्का; एका क्लिकवर वाचा निकाल
5
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
6
Jawhar Nagar Parishad Election Result 2025: जव्हार नगरपरिषदेवर भाजपचा भगवा, १४ जागांवर उधळला गुलाल, पूजा उदावंत नगरध्यक्ष; शिंदे सेनेला फक्त एवढ्या जागा
7
बँका तुम्हाला क्रेडिट कार्ड घेण्यासाठी का आग्रह धरतात? कुठून होते त्यांची खरी कमाई?
8
Newasa Nagar Panchayat Elections Results 2025 : नेवासामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा नगराध्यक्ष, तर शंकरराव गडाखांचा दबदबा कायम
9
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
10
Vengurla Nagar Parishad Election Result 2025: दीपक केसरकरांना धक्का, वेंगुर्ल्यात भाजपाचा ७ जागांवर विजय; शिंदेसेनेला मिळाली १ जागा
11
'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!
12
इराणवर मोठ्या हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल? नेतन्याहू घेणार डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; इराणी अधिकारी म्हणतात...
13
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
14
Video - फिरायला निघाले, ट्रेनमध्ये भांडले अन् साता जन्माची साथ २ महिन्यांत सुटली, कपलसोबत काय घडलं?
15
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
16
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
17
BSF काँस्टेबल भरतीत माजी अग्निवीरांना 50% आरक्षण; वयोमर्यादेतही मोठी सवलत, केंद्राचा निर्णय
18
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
19
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
20
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
Daily Top 2Weekly Top 5

अस्मानी संकटामुळे शेतकरी हतबल

By admin | Updated: March 3, 2015 02:08 IST

मध्य भारतावर अजूनही पश्चिमी प्रकोपाचा(वेस्टर्न डिस्टर्बन्स) प्रभाव कायम असल्याने ३ आणि ४ मार्च रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस कोसळेल,

मुंबई : मध्य भारतावर अजूनही पश्चिमी प्रकोपाचा(वेस्टर्न डिस्टर्बन्स) प्रभाव कायम असल्याने ३ आणि ४ मार्च रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस कोसळेल, असा इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागातर्फे दिला आहे. त्याचप्रमाणे कोकण, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रासह पुणे आणि मुंबईत हवामान ढगाळ राहील, असा अंदाजही हवामान खात्यातर्फे वर्तविण्यात आला आहे.उत्तर भारतात निर्माण झालेल्या वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे तेथील पावसाचे ढग मध्य भारतावर सरकले आहेत. परिणामी गेल्या तीन दिवसांपासून राज्यासह मुंबईत अवकाळी पाऊस पडत आहे. पुढील ४८ तास हीच परिस्थिती राहणार आहे. हवामान खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात आणि विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय घट झाली आहे. गेल्या तीन दिवसांपासून राज्यात सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे विजेची मागणी घटली असून, या तीन दिवसांच्या काळात राज्यात सरासरी दिवसागणिक ६० मेगावॅट विजेचे भारनियमन करण्यात आल्याची माहिती महावितरणच्या सूत्रांनी दिली.या अवकाळी पावसादरम्यान २७ फेब्रुवारी रोजी सकाळी विजेची मागणी १६ हजार ११४ मेगावॅट होती़ या वेळी करण्यात आलेल्या विजेच्या भारनियमनाचे प्रमाण ९९ मेगावॅट होते. त्याच दिवशी सायंकाळी विजेची मागणी १३ हजार ६३६ मेगावॅट एवढी होती़ या वेळी करण्यात आलेल्या विजेच्या भारनियमनाचे प्रमाण ६४ मेगावॅट होते. (प्रतिनिधी)च्ठाणे : गेल्या दोन-तीन दिवसांपासून पडलेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील आंब्याच्याबागांचे प्रचंड नुकसान झाले आहे. ठाणे, पालघर या दोन जिल्ह्यांमधील सुमारे ७१० हेक्टर क्षेत्रावर आंब्याच्या बागा आहेत. यापैकी बहुतांश् आंब्याचा मोहोर आणि फळे गळून पडली. त्यामुळे बागायतदार हवालदिल झाले आहेत.च्जिल्ह्यात दोन दिवसांच्या कालावधीत सुमारे १६५.२० मिमी पाऊस पडला. या पावसामुळे भाजीपाला आणि कडधान्याचे काहीअंशी नुकसान झाले आहे. वाल, हरबरा या कडधान्यासह काही प्रमाणात भेंडी, मिरची, गवार आदी भाजीपाल्याचे नुकसान झाले असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले. दरम्यान, या नुकसानाचे सर्वेक्षण करण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या दोन दिवसांच्या कालावधीत सर्वाधिक पाऊस मुरबाड, अंबरनाथ, भिवंडी आदी तालुक्यांमध्ये झाला. यात अनेक ठिकाणी घरांचे नुकसान झाले असून वीटभट्ट्या आणि गुरांच्या चाऱ्याचे नुकसान झाले आहे़ अलिबाग : रायगड जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे आंबा, काजू, वाल आणि भाजीपाल्याचे अतोनात नुकसान झाले आहे. पिक हातचे गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. जिल्ह्यात १६ हजार ८२४ हेक्टर आंबाक्षेत्रापैकी ६ हजार ७१२ हेक्टरवरील आंबा पिकास पावसाचा फटका बसला आहे. त्याचप्रमाणे ३ हजार ७७६ हेक्टर काजू क्षेत्रापैकी २ हजार ४५६ हेक्टरातील काजू पिक बाधीत झाले आहे. याशिवाय वाल, पांढरे कांदे, तोंडली अशा ७०७ हेक्टर क्षेत्रातील भाजीपाला क्षेत्रासही या पावसाचा मोठा फटका बसल्याची माहिती रायगड जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी के.बी. तरकसे यांनी दिली आहे.शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाण्यासाठी शासनाकडून पंचनामा करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. रायगड जिल्हा परिषदेतर्फे नुकसान भरपाईपोटी एक कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार असल्याचे रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सुरेश टोकरे यांनी आज जाहीर केले.विजेची मागणी घटली२८ फेब्रुवारी रोजी सकाळी विजेची मागणी १६ हजार २०९ मेगावॅट होती़ या वेळी करण्यात आलेल्या विजेच्या भारनियमनाचे प्रमाण ६२ मेगावॅट होते. त्याचदिवशी सायंकाळी विजेची मागणी ११ हजार ८११ मेगावॅट एवढी होती़ या वेळी करण्यात आलेल्या विजेच्या भारनियमनाचे प्रमाण ६१ मेगावॅट होते.१ मार्च रोजी सकाळी विजेची मागणी ११ हजार २१९ मेगावॅट होती़ या वेळी करण्यात आलेल्या विजेच्या भारनियमनाचे प्रमाण ५८ मेगावॅट होते. त्याच दिवशी सायंकाळी विजेची मागणी ८ हजार १२९ मेगावॅट एवढी होती़ या वेळी करण्यात आलेल्या विजेच्या भारनियमनाचे प्रमाण ५६ मेगावॅट होते. दिवसागणिक राज्याला १५ हजार ५०० मेगावॅट विजेची मागणी असते आणि त्या तुलनेत तेवढ्याच विजेचा पुरवठा करण्यात येत असल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आली.