शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईकरांनो, दूषित पाण्यापासून सावधान!

By admin | Updated: July 2, 2016 02:40 IST

पावसाच्या सुरुवातीलाच दूषित पाण्यामुळे मुंबईकर आजारी पडल्याचे दिसून आले आहे.

मुंबई : पावसाच्या सुरुवातीलाच दूषित पाण्यामुळे मुंबईकर आजारी पडल्याचे दिसून आले आहे. काविळीमुळे वडाळा येथील पाच वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. तर, दूषित पाण्यामुळे होणाऱ्या कॉलरा, गॅस्ट्रोच्या आजाराचे रुग्णही जून महिन्यात आढळून आले. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे होणाऱ्या आजारांवर विशेष लक्ष द्या, असे आवाहन महापालिकेने केले आहे. वडाळा येथील ५ वर्षांच्या मुलाला काविळीच्या उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने या मुलाला १७ जून रोजी कस्तुरबा रुग्णालयात हलविण्यात आले. २२ जून रोजी या मुलाचा मृत्यू झाला. जून महिन्यात कावीळचे एकूण १६६ रुग्ण आढळून आले आहेत. तर, जून २०१५मध्ये कावीळचे ९९ रुग्ण होते. गॅस्ट्रोचे जून महिन्यात ९७९ रुग्ण आढळून आले आहेत. तर कॉलराचा १ रुग्ण आढळून आला आहे. त्यामुळे पावसाच्या सुरुवातीलाच साथीच्या आजारांचा आलेख चढता असल्यामुळे काळजी घ्यावी असे आवाहन पालिकेने केला आहे.(प्रतिनिधी) >हेपिटायटिसचा असा होतो संसर्ग हेपिटायटिस विषाणूंमुळे होतो. पण, त्याचबरोबर संसर्ग आणि टॉक्सीकमुळेही हेपिटायटिस होऊ शकतो. हेपिटायटिसचे ‘ए’, ‘बी’, ‘सी’, ‘डी’ आणि ‘ई’ हे प्रमुख पाच विषाणू आहेत. ‘ए’ आणि ‘ई’ विषाणूचा संसर्ग हा दूषित पाणी आणि अन्नामुळे होतो. अस्वच्छतेमुळे या विषाणूंचा संसर्ग होतो. हेपिटायटिय ‘बी’, ‘सी’ आणि ‘डी’ या विषाणूंचा संसर्ग रक्त आणि रक्तातील घटकांमधून संक्रमित होतो. वापरलेल्या सुईचा पुन्हा वापर करणे, शरीरसंबंधातून हे विषाणू संक्रमित होतात. हेपिटायटिसपासून बचाव करण्यासाठी हे उपाय करा शारीरिक स्वच्छता राखा, शौचालयात जाऊन आल्यावर हात स्वच्छ धुवा, जेवण तयार करण्याआधी, जेवण्याआधी हात स्वच्छ धुवा, स्वच्छ पाणी प्या, उघड्यावरचे अथवा अन्य कोणत्याही ठिकाणी साठवून ठेवलेले पाणी पिणे टाळाअन्न शिजवल्यावर झाकून, स्वच्छ जागी ठेवा, पालेभाज्या, सलाड स्वच्छ धुऊन घ्या, घरी शिजवलेले अन्न खा, रस्त्यावरील उघडे अन्नपदार्थ खाणे टाळा (चायनीज भेळ, पाणीपुरी इत्यादी.)गर्भवती महिलांनी विशेष काळजी घ्यावीपावसाळ्यात दूषित पाण्यामुळे कावीळ होण्याचा धोका सर्वाधिक असतो. त्यामुळे पावसाळ्यात गर्भवती महिलांनी स्वच्छता राखणे अत्यंत आवश्यक आहे. त्याचबरोबर खाण्याच्या सवयींवर विशेष लक्ष दिले पाहिजे. नॉशिया, उलट्या अशी लक्षणे आढळून आल्यास तत्काळ डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून घ्या.