शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

संघर्षासाठी तयार राहा!

By admin | Updated: June 6, 2014 11:36 IST

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले पक्षनेते व सर्व उमेदवारांना पत्र पाठविले असून पक्षासाठी सध्या कठीण काळ असल्याचा उल्लेख केला आहे.

पराभूत उमेदवारांना सोनिया गांधींचे पत्र
शीलेश शर्मा - नवी दिल्ली
काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले पक्षनेते व सर्व उमेदवारांना पत्र पाठविले असून पक्षासाठी सध्या कठीण काळ असल्याचा उल्लेख केला आहे. या स्थितीतून बाहेर येण्यासाठी आपापल्या मतदारसंघात कठोर परिश्रम घ्या. लोकांचा पुन्हा विश्वास जिंका. त्यासाठी संघर्ष करा, पण हिंमत हरू नका, असा धीर त्यांनी दिला आहे. 
 काँग्रेसचे पराभूत नेते व उमेदवारांशी चर्चा करण्याचीही योजना त्यांनी आखली असून त्याचे संकेत पत्रत दिले आहेत. मी, या संघर्षात तुमच्या सोबत असेल असेही त्यांनी म्हटले आहे. 
काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी पक्षाच्या मानहानीकारक पराभवातून अद्यापही सावरलेल्या नाहीत. पक्षाची घडी नीट बसविण्याची चिंता सतावत असतानाच त्यांनी काँग्रेसच्या सर्व पराभूत उमेदवारांना हे भावनिक पत्र पाठविले आहे. 
राहुल गांधी यांची कमकुवत राजकीय रणनीती सुधारण्यासह पुढील पावले टाकण्याला त्या अग्रक्रम देणार आहेत. घाईगडबडीत कोणतेही प्यादे पुढे करत नंतर कमकुवतपणा सिद्ध होऊ नये यासाठी त्या खबरदारी घेत आहेत. मोदी सरकारविरुद्ध लगेच आक्रमक धोरण अवलंबण्याची त्यांना घाई नाही. त्यांना प्रथम पक्षाची घडी व्यवस्थित बसवायची आहे. त्यानंतरच त्या मोदी सरकारविरुद्ध आघाडी उघडण्याच्या मन:स्थितीत आहेत. मोदी सरकार स्वत:ची प्रतिमा चांगली दाखविण्यासाठी खूपच घाई करत असून ‘अच्छे दिन आले वाले’च्या आश्वासनांबाबत लोकांचा भ्रमनिरास होणो सुरू होईल. तेव्हा सरकारच्या चुका लोकांसमोर मांडाव्यात, असे सोनिया गांधी यांना वाटते.
राहुल गांधींबद्दल असलेली नाराजी दूर करण्यासाठी त्यांनी लिहिलेले हे पत्र भावनिक असून त्याचा पराभूत उमेदवारांवर थेट प्रभाव पडू शकतो.
16 व्या लोकसभेतील पराभवामुळे सभागृहात मला आपली उणीव जाणवत आहे. आपण पूर्ण शक्तिनिशी निवडणूक लढायला हवी होती. आता या धक्क्यातून सावरण्याची आणि संघर्षासाठी तयार राहण्याची वेळ आली आहे,  असे आवाहन त्यांनी केले आहे.
 
च्रणनीती सुधारण्यासह पुढील पावले टाकण्याला त्या अग्रक्रम देणार 
च्लोकांचा भ्रमनिरास होणो सुरू होईल. तेव्हा सरकारच्या चुका लोकांसमोर मांडाव्यात.
च्लोकांचा पुन्हा विश्वास जिंका. त्यासाठी संघर्ष करा, पण हिंमत हरू नका, असा धीर त्यांनी दिला.
 
विरोधाचा सूर
च्काँग्रेसमध्ये राहुल गांधींविरुद्ध विरोधाचा सूर वाढत आहे. केरळ, राजस्थान, हरियाणा आणि आसाममध्ये असंतोष वाढत असल्याची माहिती सोनिया गांधींना मिळाली आहे. राहुल गांधी आणि त्यांच्या टीममुळेच काँग्रेसचा पराभव झाल्याचे मानले जाते.
च्मानहानीकारक पराभवानंतरही राहुल गांधी यांच्या कार्यशैलीत कोणताही बदल झालेला दिसत नाही. मधुसुदन मिस्त्री हे अजूनही ज्येष्ठ नेत्यांना कनिष्ठपणाची वागणूक देत असून त्याबाबत सोनिया गांधींकडे तक्रार आली आहे. त्यांनी या कार्यपद्धतीवर नियंत्रण आणण्याची तयारी सुरू केली आहे.  त्या पूर्वीप्रमाणोच पक्षनेत्यांशी थेट संवाद साधत राहतील, असे सूत्रंनी सांगितले.