शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
2
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
3
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
4
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
5
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
6
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
7
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
8
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
9
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
10
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
11
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
12
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
13
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
14
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
15
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
16
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
17
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
18
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस
19
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
20
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

संघर्षासाठी तयार राहा!

By admin | Updated: June 6, 2014 11:36 IST

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले पक्षनेते व सर्व उमेदवारांना पत्र पाठविले असून पक्षासाठी सध्या कठीण काळ असल्याचा उल्लेख केला आहे.

पराभूत उमेदवारांना सोनिया गांधींचे पत्र
शीलेश शर्मा - नवी दिल्ली
काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले पक्षनेते व सर्व उमेदवारांना पत्र पाठविले असून पक्षासाठी सध्या कठीण काळ असल्याचा उल्लेख केला आहे. या स्थितीतून बाहेर येण्यासाठी आपापल्या मतदारसंघात कठोर परिश्रम घ्या. लोकांचा पुन्हा विश्वास जिंका. त्यासाठी संघर्ष करा, पण हिंमत हरू नका, असा धीर त्यांनी दिला आहे. 
 काँग्रेसचे पराभूत नेते व उमेदवारांशी चर्चा करण्याचीही योजना त्यांनी आखली असून त्याचे संकेत पत्रत दिले आहेत. मी, या संघर्षात तुमच्या सोबत असेल असेही त्यांनी म्हटले आहे. 
काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी पक्षाच्या मानहानीकारक पराभवातून अद्यापही सावरलेल्या नाहीत. पक्षाची घडी नीट बसविण्याची चिंता सतावत असतानाच त्यांनी काँग्रेसच्या सर्व पराभूत उमेदवारांना हे भावनिक पत्र पाठविले आहे. 
राहुल गांधी यांची कमकुवत राजकीय रणनीती सुधारण्यासह पुढील पावले टाकण्याला त्या अग्रक्रम देणार आहेत. घाईगडबडीत कोणतेही प्यादे पुढे करत नंतर कमकुवतपणा सिद्ध होऊ नये यासाठी त्या खबरदारी घेत आहेत. मोदी सरकारविरुद्ध लगेच आक्रमक धोरण अवलंबण्याची त्यांना घाई नाही. त्यांना प्रथम पक्षाची घडी व्यवस्थित बसवायची आहे. त्यानंतरच त्या मोदी सरकारविरुद्ध आघाडी उघडण्याच्या मन:स्थितीत आहेत. मोदी सरकार स्वत:ची प्रतिमा चांगली दाखविण्यासाठी खूपच घाई करत असून ‘अच्छे दिन आले वाले’च्या आश्वासनांबाबत लोकांचा भ्रमनिरास होणो सुरू होईल. तेव्हा सरकारच्या चुका लोकांसमोर मांडाव्यात, असे सोनिया गांधी यांना वाटते.
राहुल गांधींबद्दल असलेली नाराजी दूर करण्यासाठी त्यांनी लिहिलेले हे पत्र भावनिक असून त्याचा पराभूत उमेदवारांवर थेट प्रभाव पडू शकतो.
16 व्या लोकसभेतील पराभवामुळे सभागृहात मला आपली उणीव जाणवत आहे. आपण पूर्ण शक्तिनिशी निवडणूक लढायला हवी होती. आता या धक्क्यातून सावरण्याची आणि संघर्षासाठी तयार राहण्याची वेळ आली आहे,  असे आवाहन त्यांनी केले आहे.
 
च्रणनीती सुधारण्यासह पुढील पावले टाकण्याला त्या अग्रक्रम देणार 
च्लोकांचा भ्रमनिरास होणो सुरू होईल. तेव्हा सरकारच्या चुका लोकांसमोर मांडाव्यात.
च्लोकांचा पुन्हा विश्वास जिंका. त्यासाठी संघर्ष करा, पण हिंमत हरू नका, असा धीर त्यांनी दिला.
 
विरोधाचा सूर
च्काँग्रेसमध्ये राहुल गांधींविरुद्ध विरोधाचा सूर वाढत आहे. केरळ, राजस्थान, हरियाणा आणि आसाममध्ये असंतोष वाढत असल्याची माहिती सोनिया गांधींना मिळाली आहे. राहुल गांधी आणि त्यांच्या टीममुळेच काँग्रेसचा पराभव झाल्याचे मानले जाते.
च्मानहानीकारक पराभवानंतरही राहुल गांधी यांच्या कार्यशैलीत कोणताही बदल झालेला दिसत नाही. मधुसुदन मिस्त्री हे अजूनही ज्येष्ठ नेत्यांना कनिष्ठपणाची वागणूक देत असून त्याबाबत सोनिया गांधींकडे तक्रार आली आहे. त्यांनी या कार्यपद्धतीवर नियंत्रण आणण्याची तयारी सुरू केली आहे.  त्या पूर्वीप्रमाणोच पक्षनेत्यांशी थेट संवाद साधत राहतील, असे सूत्रंनी सांगितले.