शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

अभिनिवेश न बाळगता अभिव्यक्त व्हावे

By admin | Updated: October 17, 2016 01:03 IST

उपरेपणाचे वाटू लागले असून सध्याचा तरुणवर्ग कलाकृतींच्या माध्यमातून मोकळेपणाने बोलू लागला आहे.

पुणे : अलीकडच्या काळात कविता समजणे, साहित्याचे वाचन करणे, उपरेपणाचे वाटू लागले असून सध्याचा तरुणवर्ग कलाकृतींच्या माध्यमातून मोकळेपणाने बोलू लागला आहे. कोणताही अभिनिवेश न बाळगता, पळवाट न शोधता लेखकाने अभिव्यक्त झाले पाहिजे, असे मत दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी रविवारी व्यक्त केले.श्रीरंजन आवटे लिखित ‘सिंगल मिंगल’ या कादंबरीच्या प्रकाशन सोहळ््यात मंजुळे बोलत होते. कार्यक्रमास ज्येष्ठ कथाकार व नाटककार जयंत पवार, राजहंस प्रकाशनच्या विनया खरपेकर उपस्थित होते. या वेळी कादंबरीतील निवडक भागांचे अभिवाचन करण्यात आले.मंजुळे म्हणाले, ‘‘साहित्य कलाकृतीतून आरसा दाखविण्याचा प्रयत्न होतो. मात्र, अनेकांना त्यातून चेहऱ्यावरची घाण दिसत असते. त्यामुळे आरसा तोडण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु, हा आरसा टिकवण्यावर भर द्यायला हवा. माणसांना एकाकीपणाने ग्रासले असून हे थांबविता येणार नाही. चांगल्या अभिव्यक्तीतून माणूसपण चांगल्या पद्धतीने सांगता येते. क्रांतीच्या आणि दगडफेकीच्या काळात कविता सुचणे ही चांगली गोष्ट आहे. तसेच काही माणसांना आपल्याला नेमके काय हवे आहे, हे सांगता येत नाही. परंतु, अशाच गोष्टी श्रीरंजन आवटे यांनी कादंबरीच्या माध्यमातून सांगितल्या आहेत.’’ आपल्याला काय हवे आहे, आपली मागणी काय आहे, हेच माहित नाही तरी आपण गडबड करतो. इतरांवर राग काढतो, असे सूचक वक्तव्य मंजुळे यांनी केले. श्रीरंजन आवटे यांनी कादंबरी लेखनामागची भूमिका सांगितली. विनया खरपेकर यांनी प्रास्ताविक केले. (प्रतिनिधी)>साहित्य हा समाजाचा आरसा दाखवत असतो. तेच या कादंबरीतून दिसते. ‘सिंगल मिंगल’मध्ये तरुण पिढीच्या मनात सुरू असलेले कलह चित्रित केले आहेत. कादंबरीमधील पात्र पूर्वीच्या रिलेशनशिपच्या आठवणी विसरत नवनवीन रिलेशनशिप शोधत आहेत. ही भारतीय मानसिकता आहे. जागतिकीकरणानंतरच्या तरुण पिढीचे प्रतिबिंब या कादंबरीत दिसून येते.- जयंत पवार