शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
3
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
4
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
5
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
6
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
7
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
10
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
11
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
12
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
13
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
14
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
15
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
16
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
17
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
18
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
19
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
20
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
Daily Top 2Weekly Top 5

सावधान! हे लोक आत्महत्या करू शकतात

By admin | Updated: January 4, 2017 01:51 IST

काम होत नाही म्हणून तुम्ही सरकारला आंदोलनाचा इशारा दिला असेल, तर तुमचे नाव मंत्रालयाबाहेरच्या लिस्टमध्ये लागू शकते. गृहविभागाने सध्या ३७ जणांची यादी लावली आहे.

मुंबई : काम होत नाही म्हणून तुम्ही सरकारला आंदोलनाचा इशारा दिला असेल, तर तुमचे नाव मंत्रालयाबाहेरच्या लिस्टमध्ये लागू शकते. गृहविभागाने सध्या ३७ जणांची यादी लावली आहे.‘सावधान! हे लोक इथे येऊन आत्महत्येचा वा आत्मदहनाचा प्रयत्न करू शकतात,’ अशी इशारावजा सूचना देत मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर ३७ जणांच्या नावांची यादी लावून पास काउंटरवर पोलीस यंत्रणेला सतर्क करण्यात आले आहे. मंत्रालय परिसरात लावण्यात आलेल्या यादीमध्ये महिलांचाही समावेश आहे. शिवाय, काही जणांचे फोटोही लावले आहेत. गेल्या वर्षी मार्चमध्ये माधव कदम या शेतकऱ्याने मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर आत्महत्या केल्यानंतर आता पुन्हा असे प्रकार घडू नयेत म्हणून मंत्रालय पोलीस कक्षाने सतर्कतेचा हा नवा फंडा काढला आहे. आत्महत्या / आत्मदहनाचा प्रयत्न करण्याची मनोवृत्ती असलेल्या काही व्यक्तींची नावे या मुख्य प्रवेशद्वारावर लावण्यात आलेली आहेत. प्रवेश पास तयार करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडेही ती यादी देण्यात आली आहे. या यादीतील कोणीही पास घ्यायला आले तर सतर्क व्हा, त्यांचे काय काम आहे, त्यांना कोणाला भेटायचे आहे याचा बारीकसारीक तपशील घ्या आणि त्यांना पोलिसांच्या स्वाधीन करा, असे बजावण्यात आले आहे. ‘आम्ही आत्महत्येचा कोणताही प्रयत्न करणार नाही,’ असे लिहून देणाऱ्यांना आत सोडले जाते. राज्य गुप्तचर विभाग, विविध जिल्ह्यांची पोलीस अधीक्षक कार्यालये आदी यंत्रणांकडून मंत्रालय पोलीस कक्षाने मंत्रालयात येऊ शकतील आणि ज्यांच्यामध्ये आत्महत्येची प्रवृत्ती आहे अशा व्यक्तींची नावे मागविली आणि अशा ३७ नावांची यादी लावली आहे. (विशेष प्रतिनिधी) आंदोलकांचा बंदोबस्त!- काम होत नाही म्हणून अनेक जण सरकारला आत्मदहनाचा इशारा देत असतात. मार्च २०१६ मध्ये नांदेडच्या माधव कदम या शेतकऱ्याने मंत्रालय परिसरात विष पिऊन आत्महत्या केली होती. त्यानंतर फडणवीस सरकारवर जोरदार टीका झाली. आता मंत्रालय परिसरात पुन्हा अशी घटना होऊ नये आणि सरकार टीकेचे धनी होऊ नये, यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे.सेवाहमी कागदावरच! फडणवीस सरकारने ‘आपलं सरकार’च्या माध्यमातून नागरिकांना सेवाहमीचा (राइट टू सर्व्हिस) अधिकार दिला असला तरी तो कागदावरच आहे. लोकांची कामे होण्यास अजूनही तितकाच वेळ लागतो. त्यामुळे वैतागून लोक आंदोलनाचे हत्यार उपसतात. अशा नागरिकांना अशी गुन्हेगारासारखी वागणूक देणे, त्यांचे फोटो जाहीरपणे गेटवर लावणे कितपत योग्य आहे, असा सवाल केला जात आहे.