शहरं
Join us  
Trending Stories
1
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज
2
"मी प्रदेशाध्यक्ष आहे, भाजपमध्ये जाण्यासाठी मला..."; भाजप प्रवेशावर जयंत पाटलांनी सोडलं मौन
3
IND vs ENG : जड्डू -ब्रायडन कार्स यांच्यात टक्कर! मग वातावरण चांगलेच तापलं! नेमकं काय घडलं?
4
"तुला पक्षात यावं लागेल"; उद्धव ठाकरेंच्या ऑफरवर प्रवीण दरेकर म्हणाले, "मी बाळासाहेबांचा शिवसैनिक"
5
अस्तित्वातच नसलेला माणूस बनला जगातील बारावी सर्वात श्रीमंत व्यक्ती, कोण आहे तो? एवढी आहे एकूण संपत्ती
6
विमानांच्या इंजिन फ्यूल स्विचची तात्काळ तपासणी करावी; DGCA चा सर्व कंपन्यांना आदेश
7
याला म्हणतात ढासू शेअर...! 1 लाखाचे केले 3.7 कोटी, 5 वर्षांत दिला 36900% चा बंपर परतावा; करतोय मालामाल
8
7 रुपयांच्या शेअरची कमाल, 480% नं वाढलाय भाव; 19 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल
9
IND vs ENG: लॉर्ड्सवर अक्षय कुमारसोबत मॅच बघायला आली 'ही' अभिनेत्री, एकेकाळी गाजवलंय बॉलिवूड
10
जिममध्ये चोरी करणं महागात पडलं, ट्रेनरनं अशी शिक्षा दिली की...; आता चोर कधी मनात चोरीचा विचारही आणणार नाही!
11
हिंदी-मराठी वादामुळे वाढलेला तणाव कमी करण्यासाठी काँग्रेसकडून आम्ही मराठी, आम्ही भारतीय भाषा, कार्यक्रमाचं मिरारोड येथे आयोजन
12
काव्या मारनचा अजब निर्णय ! ५० विकेट्सही न घेता आलेल्या गोलंदाजाला केलं SRH 'बॉलिंग कोच'
13
"सरकार आणि उद्योगपतींच्या फायद्यासाठी जनसुरक्षा कायदा, काँग्रेस त्याची प्रत्येक जिल्ह्यात होळी करणार”, हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा
14
पाकिस्तान जय श्रीरामच्या घोषणेने दुमदुमले; कराचीत मुस्लिम कलाकारांकडून रामलीलेचे सादरीकरण
15
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
16
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
17
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
18
नो टॅक्स, नो टेन्शन! 'या' देशांमध्ये श्रीमंत लोकही भरत नाहीत एक रुपयाही कर, मग पैसा कुठून येतो?
19
खऱ्या आयुष्यातही सचिवजी अन् रिंकी प्रेमात? सानविकाच्या 'त्या' उत्तरावर जितेंद्र लाजला
20
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा जास्त उकळणं आरोग्यासाठी हानिकारक, कारण...

दास्यमुक्तीसाठी रणरागिणींचा लढा

By admin | Updated: January 3, 2015 01:28 IST

नगर जिल्ह्यात २०१४मध्ये ७५७ महिलांनी पोलीस प्रशासनाच्या मदतीने स्वत:ची कौटुंबिक छळातून मुक्तता व्हावी, यासाठी यशस्वी लढा दिला़ त्यांच्या संघर्षाची सर्वत्र प्रशंसा होत आहे.

साहेबराव नरसाळे - अहमदनगरस्त्री दास्यमुक्तीसाठी महिलांना शिक्षित करण्याचा आग्रह धरणाऱ्या सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस आज महिला मुक्ती दिन म्हणून साजरा होत असताना नगर जिल्ह्यात २०१४मध्ये ७५७ महिलांनी पोलीस प्रशासनाच्या मदतीने स्वत:ची कौटुंबिक छळातून मुक्तता व्हावी, यासाठी यशस्वी लढा दिला़ त्यांच्या संघर्षाची सर्वत्र प्रशंसा होत आहे.महिलांना सामाजिक प्रतिष्ठा मिळावी व त्यांचे हक्क मिळावेत, यासाठी सावित्रीबार्इंनी शिक्षणाची कवाडे खुली करून दिली़ मात्र, पुरुषप्रधान व्यवस्थेत आजही ग्रामीण भागात ‘चूल आणि मूल’ एवढ्याच मर्यादित कक्षेत महिलांना वागविले जाते़ त्यामुळे त्यांना हक्कापासून वंचित राहावे लागते़ अनेक महिला वर्षानुवर्षे कौटुंबिक छळ मुकाट्याने सहन करतात़ पीडित महिलांना न्याय देण्यासाठी सरकारने महिला सुरक्षा कायदा लागू केला़ त्याअंतर्गत तक्रार करणाऱ्यांमध्ये शिक्षित महिलांचे प्रमाण अधिक आहे़ या कायद्यांतर्गत २० हजार रुपये दंड आणि एक वर्षाचा कारावास, अशा शिक्षेची तरतूद आहे.या कायद्यामुळे महिलांचा छळ होण्याचे प्रमाण सुमारे २़१३ टक्क्यांनी घटल्याचे महिला सहायता केंद्रातून सांगण्यात आले़सासू-सासऱ्यांची सेवा न केल्यामुळे, इतर कारणातून, चांगला स्वयंपाक न बनविता येणे, विविध कारणांसाठी पैशांची मागणी करणे आदी कारणांतून महिलांचा छळ केला जातो़ त्यास कंटाळून अनेक महिला पोलीस ठाण्याचा दरवाजा ठोठावतात़ एप्रिल २०१४पासून डिसेंबर २०१४ अखेरपर्यंत ७५७ महिलांनी वेळेवर जेवायला न देणे, मारहाण करणे, जास्त काम करण्यास सांगणे, हक्क नाकारणे, अपमानास्पद बोलणे आदी कारणांद्वारे छळ होत असल्याच्या तक्रारी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील महिला सहायता कक्षाकडे केल्या आहेत़ च्२८२ महिलांचे पती, सासू-सासरे व अन्य नातेवाईक यांचे समुपदेशन करून महिला सहायता कक्षाच्या सहायक पोलीस निरीक्षक माधवी राजेकुंभार यांनी पीडित महिलांना न्याय मिळवून दिला. तर २०५ महिलांनी कोर्टाच्या माध्यमातून कौटुंबिक छळातून मुक्तता करून घेतली. एप्रिल २०१४ ते डिसेंबर २०१४ या कालावधीत महिला सहायता कक्षाकडे आलेल्या तक्रारींपैकी ३५ प्रकरणांमध्ये तडजोड होऊ शकली नाही़ त्यामुळे पोलीस ठाण्यात ३५ कौटुंबिक छळाचे गुन्हे नोंदविण्यात आले.