शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

सत्य समोर आणण्याकरिता लढाई - राहुल गांधी

By admin | Updated: January 31, 2017 02:25 IST

‘आपली लढाई ही सत्याची लढाई असून सत्य जगासमोर आले पाहिजे, याकरिता माझ्या विरोधातील खटला ठामपणे लढवत आहे. त्यासाठी आवश्यक असेल तेव्हा मी कोर्टात

भिवंडी : ‘आपली लढाई ही सत्याची लढाई असून सत्य जगासमोर आले पाहिजे, याकरिता माझ्या विरोधातील खटला ठामपणे लढवत आहे. त्यासाठी आवश्यक असेल तेव्हा मी कोर्टात हजेरी लावणार आहे’, असे उद्गार काँग्रेस उपाध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी सोमवारी पत्रकारांकडे काढले.लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराकरिता तालुक्यातील सोनाळे गावातील मैदानात राहुल गांधी यांची सभा झाली होती. त्या वेळी यांनी महात्मा गांधी यांच्या हत्येमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हात असल्याचा आरोप केला होता. या वक्तव्याकरिता भिवंडी दिवाणी आणि फौजदारी न्यायालयात त्यांच्याविरोधात दावा सुरू असून सुनावणीकरिता गांधी न्यायालयात आले होते. सकाळी साडेदहा वाजता गांधी न्यायालयात येणार म्हणून शहरातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी सकाळी ९ वाजता गर्दी केली होती. कार्यकर्त्यांमध्ये जोश व उत्साहाचे वातावरण होते. परंतु, दिल्लीमध्ये दाट धुके असल्याने त्यांचे विमान ठरलेल्या वेळी उडू शकले नाही. भिवंडीतील न्यायालयात १२.५० वाजता राहुल यांचे आगमन झाले. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण त्यांच्यासोबत होते. राहुल यांची भेट घेण्याकरिता, त्यांच्याशी हस्तांदोलन करण्याकरिता कार्यकर्ते उत्सुक होते. राहुल यांनी हात उंचावून त्यांना अभिवादन केले.भिवंडी दिवाणी व फौजदारी न्यायालयातील न्यायाधीश तुषार वाजे यांच्या कोर्टात अन्य एका खटल्यातील निकालपत्राचे वाचन सुरू असल्याने राहुल गांधी आपल्या समर्थकांसह कोर्टाबाहेर उभे होते. गांधी यांच्यावर सोमवारी आरोपनिश्चिती होणार होती. परंतु, फिर्यादी पक्षाने आपल्या दाव्यासोबत वृत्तवाहिनीची सीडी व तीन वर्तमानपत्रांतील बातम्यांची कात्रणे जोडली आहेत. वर्तमानपत्रांची स्थळप्रत त्यांनी न दिल्याचा युक्तिवाद गांधी यांच्या वकिलांनी केला. त्यामुळे कोर्टाने फिर्यादीस दाव्यासोबत जोडलेल्या कात्रणांच्या तीन वर्तमानपत्रांच्या स्थळप्रती देण्याचे आदेश दिले. तसेच ३ मार्च २०१७ रोजी पुढील सुनावणी निश्चित केली आहे, अशी माहिती गांधी यांचे स्थानिक वकील नारायण अय्यर यांनी दिली. या वेळी त्यांच्यासोबत ख्यातनाम विधिज्ञ अशोक मुंदरगी व दिल्लीच्या तरन्नुम चिम्मा उपस्थित होत्या. फिर्यादी राजेश कुंटे यांच्या वतीने पुण्याचे वकील नंदू फडके यांनी बाजू मांडली.या वेळी मुंबई विभागीय काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम, भाई जगताप, आरीफ नसीम खान, माजी खासदार सुरेश टावरे, माजी आमदार रशीद ताहीर व मोहम्मद अली खान आदी मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)