शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
2
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
3
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
4
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
5
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
6
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
7
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
8
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
9
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
10
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
11
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
12
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
13
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
14
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
15
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
16
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
17
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
18
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
19
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
20
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका

स्टार्ट-अप उद्योगासाठीबळ, पण अपुरे!!

By admin | Updated: February 1, 2017 19:37 IST

अवघे एक वर्षाचे वय असलेल्या ‘स्टार्ट अप इंडिया’ या बहुचर्चित अभियानासाठी यावर्षीचा अर्थसंकल्प काहीसा कडू-गोड ठरला आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 1 - अवघे एक वर्षाचे वय असलेल्या ‘स्टार्ट अप इंडिया’ या बहुचर्चित अभियानासाठी यावर्षीचा अर्थसंकल्प काहीसा कडू-गोड ठरला आहे.

बदलत्या बाजारपेठेच्या गरजा ओळखून त्याभोवती अभिनव उपायांच्या आधारावर नव्या उद्योगाची उभारणी करणारे ते तरुण आणि प्रयोगशील क्षेत्र निश्चलीकरणानंतर आर्थिक संकटात सापडले आहे. यातून तरण्यासाठी यावर्षीचा अर्थसंकल्प वाढीव करसवलतींचा हात देईल असा या क्षेत्राचा अंदाज होता. तसेच पंतप्रधानांच्या आश्वासनानंतरही स्टार्ट-अपच्या स्थापनेसाठी न आलेली प्रक्रियात्मक सुलभता या अर्थसंकल्पात साधली जावी, अशीही अपेक्षा होती. पण या दोन्हीही आघाड्यांवर नवउद्यमींच्या पदरी निराशा पडली आहे.

31 मार्च 2016 नंतर स्थापन झालेल्या स्टार्ट-अप कंपन्यांसाठी असलेली करातून सूट पहिल्या सात वर्षांपैकी तीन वर्षात घेता येईल, हा एकमात्र बदल या क्षेत्रासाठी संजीवक ठरणारा आहे. याआधी हा कालावधी ‘स्थापनेनंतर पहिली पाच वर्षे’ असा होता.त्यामुळे स्टार्ट-अप कंपन्यांना भांडवलाची उपलब्धता वाढेल.

मिनिमम अल्टरनेट टेक्स ‘कैरी फॉर्वर्ड’ करण्याची मुदतही दहा वर्षांवरून पंधरा वर्षांपर्यंत वाढवण्यात आली आहे.50 कोटी रुपयांच्या आतली उलाढाल असलेल्या मध्यम आणि लघु उद्योगांसाठी कंपनी कराचे प्रमाण 30 वरून 25 टक्कयांवर आणण्याच्या निर्णयाचा या क्षेत्राला फायदा होणार आहे.

‘डिजिटल इंडिया’ योजनेला या अर्थसंकल्पात मिळालेली बळकटी मात्र स्टार्ट-अप कंपन्यांच्या क्षेत्राला उमेद देणारी ठरली आहे. तीन लाखांवरचा कोणताही व्यवहार रोखीत न करण्याच्या अर्थमर्यांच्या घोषणेमुळे डिजिटल तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील विस्तारलेल्या शक्यता नव-उद्यम जगतासाठीच्या व्यवसायसंधी ठरणार आहेत.