शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

पादुकांना टँकरच्याच पाण्याने स्नान

By admin | Updated: July 11, 2016 00:28 IST

श्री संत जगद्गुरू तुकाराम महाराज पालखीतील पादुकांना आज सराटी (ता. इंदापूर) येथील नीरा नदीमध्ये अखेर टँकरच्या पाण्यानेच स्नान घालावे लागले.

बावडा : श्री संत जगद्गुरू तुकाराम महाराज पालखीतील पादुकांना आज सराटी (ता. इंदापूर) येथील नीरा नदीमध्ये अखेर टँकरच्या पाण्यानेच स्नान घालावे लागले.शनिवारी (दि. ९) रात्री पालखी मुक्कामासाठी सराटी गावात विसावली. या वेळी रात्री या ठिकाणी कीर्तन, भारूड अशा कार्यक्रमाने सराटीला प्रतिपंढरीचे स्वरूप आले होते. बावडा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कपिल वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य सहायक ईश्वर कट्टी, पी. व्ही. गायकवाड, श्रीमती मुलाणी, औषधनिर्माण अधिकारी रमाकांत म्हसवडकर, प्रदीप पवार आदींनी वैद्यकीय सेवा व्यवस्थितरीत्या पुरवली. सकाळी सात वाजता तुतारीच्या निनादात व हरिनामाचा जागर करीत पादुका नीरा नदीमध्ये स्नानासाठी नेण्यात आल्या. त्या ठिकाणी टँकरच्या पाण्याने स्नान घालण्यात आले. त्यानंतर पुष्पहार अर्पण करून आरती घेण्यात आली. या वेळी असंख्य भाविकांनी पादुकास्नानाचा सोहळा टिपला. त्यानंतर पालखी पूर्ववत विश्रांती ठिकाणी ठेवण्यात आली. गावकऱ्यांनी विधिवत पूजा केली. त्यानंतर पालखीने पुणे जिल्ह्यातील शेवटचा मुक्काम आटोपून अकलूजकडे सोलापूर जिल्ह्यात प्रयाण केले. पुण्य उभे राहो आता, संताचे या कारणे ।पंढरीचे लागा वाटे सखा भेटे विठ्ठल ॥विठुरायाच्या ओढीने व पंढरपूर जवळ आल्याने वारकऱ्यांचा उत्साह द्विगुणित होत होता. ‘ग्यानबा तुकाराम’चा गजर करीत आनंदाने वैष्णव मार्गस्थ झाले. जिल्हा बँकेचे संचालक अप्पासाहेब जगदाळे यांच्यासह नागरिकांनी निरोप दिला. या वेळी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दौलतराव देसाई, जिल्हा आरोग्य अधीक्षक संजीवकुमार जाधव, अपर पोलीस अधीक्षक तानाजी चिखले, पोलीस निरीक्षक मधुकर शिंदे, सहायक पोलीस निरीक्षक निळकंठ राठोड, गटविकास अधिकारी लहू वडापुरे आदी उपस्थित होते. पालखी पुणे-सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवरून नीरा नदीवरील पुलावरून मार्गस्थ झाली.पालखीने रविवारी (दि. १०) पुणे जिल्ह्यातील प्रवास संपवून सोलापूर जिल्ह्याकडे प्रवेश केला. या वेळी पलीकडील बाजूस पालखीचे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख, सहकारमंत्री सुभाष देशमुख, आमदार हनुमंत डोळस आदींनी स्वागत केले. २७ जूनपासून आजपर्यंत पोलीस बंदोबस्तात असणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तसेच आरोग्य विभागाने आपली जबाबदारी व्यवस्थितरीत्या पार पाडली. तसेच या काळात पालखीचा सहवास लाभल्याने आनंदी वातावरणात आज परतीचा प्रवास केला.(वार्ताहर)