शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
2
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्त्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
3
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
4
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
5
युद्धाच्या भीतीदरम्यान शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १२० अंकांनी घसरला, IT Stocks वर दबाव
6
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
7
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
8
Ganeshotsav 2025: मोठ्या पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा पेच?
9
गलवान घाटी संघर्षावर आधारित सिनेमात सलमान खानसोबत 'ही' अभिनेत्री दिसणार
10
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
11
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
12
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?
13
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
14
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
15
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
16
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
17
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
18
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
19
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
20
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं

सामाजिक आधारावर ठरणार निवडणुकीचे समीकरण!

By admin | Updated: August 31, 2014 00:17 IST

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत प्रत्येकच राजकीय पक्षाचे सामाजिक आधार अत्यंत महत्त्वाचे ठरणार

पुणो : यंदाच्या विधानसभा निवडणुकीत प्रत्येकच राजकीय पक्षाचे सामाजिक आधार अत्यंत महत्त्वाचे ठरणार असून, हा बदलणारा सामाजिक आधार आणि तो समजावून घेऊन आपला पारंपरिक मतदार टिकवून ठेवण्यात आलेल्या यशावरच निवडणुकीचे समीकरण ठरणार असल्याचे मत राजकीय विेषकांनी व्यक्त केले आहे. 
महाराष्ट्रातील राजकीय पक्षांचे सामाजिक आधार झपाटय़ाने बदलत आहेत़ आजवर दुर्लक्षित असलेल्या समाजघटकातील जातींच्या राजकीय आकांक्षा वाढू लागल्या आहेत़ त्यांच्या आकांक्षाना नवे धुमारे आणण्याचा प्रयत्न वेगवेगळ्या पक्षांकडून होत आह़े 
राज्यशास्त्र विश्लेषक प्रा़ प्रकाश पवार यांच्या मते, ‘काँग्रेसचे स्वत:चे असे व्होटबँकेचे (मतपेटीचे) मॉडेल होत़े त्यात दलित, आदिवासी 25 टक्के, अल्पसंख्याक 15 टक्के आणि प्रबळ जात 1क् ते 12 टक्के यांचा समावेश होता़ या पारंपरिक व्होटबँकेकडे शेती, उद्योग आणि मोठी संख्या एकवटली होती़ 1984च्या सुमारास उत्तर भारतात दलितांचा स्वतंत्र पक्ष अस्तित्वात आला़ 
रिपब्लिकन पक्षाचे स्वतंत्र राजकारण सुरू झाल़े त्यातून काँग्रेसचा सामाजिक जनाधार कमी होत गेला़ जेव्हा व्होटबँक हलते तेव्हा नवे समाज घटक जोडणो आवश्यक असते, ते न केल्यास पराभव होण्याची शक्यता असत़े’ 
राज्यशास्त्रचे अभ्यासक प्रा़ यशवंत सुमंत म्हणतात, ‘राजकीय पक्षांचा जनाधार बदलला की जागे झालेले समाज घटक निर्माण झालेली पोकळी भरून काढतात़ याचे प्रत्यंतर नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये दिसून आल़े पक्ष संघटना, नेतृत्वाचे व्हिजन, विविध पातळीवर दाखवत नाही़ समाज घटकातील संघर्षाकडे काळजीपूर्वक पाहिले पाहिज़े समाजाची गरज ओळखून नेता, पक्ष आपल्याला काहीना काही दिशा देऊ शकतात, हा विश्वास जेव्हा समाजात निर्माण होतो, त्या वेळी जनता त्या पक्षाकडे, नेत्याकडे वळत़े’
 
मराठा, धनगर आणि बडय़ा बागायतदारांची व्होटबॅँक 
1राज्यातील शिवसेना-भाजपा युतीने यंदाच्या निवडणुकीत केलेली महायुती ही केवळ नावापुरती नव्हती तर त्यांनी शिवसंग्राम संघटनेच्या माध्यमातून  मराठा, राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून धनगर, रिपब्लिकन पक्षाला सोबत घेऊन दलित आणि कॉँग्रेसची ताकद असलेले बडे बागायतदार आपल्याकडे खेचण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोबत घेतले. 
 
2त्यामुळे त्यांची व्होटबँक तयार होत गेली़ याला उत्तर देण्यासाठी कॉँग्रेस आघाडीने कोणतीही पावले 
उचलली नाहीत. त्यामुळे सत्तारूढ पक्ष आपल्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा समज या छोटय़ा-छोटय़ा समाज घटकांमध्ये बिंबविला गेला़ 
3त्याचे प्रतिबिंब लोकसभेच्या निवडणुकीत उमटल्याचे दिसून आल़े हे समाज घटक आता कोणाला साथ देणार यावर आगामी विधानसभा निवडणुकीचे यशापयश अवलंबून असेल़  
 
काँग्रेसने राज्यात मराठा जाती व प्रत्येक जातीचा एक अभिजन बनविला़ त्याला सत्ता दिली़ जाती समूहांना बांधून ठेवायचा प्रयत्न केला गेला़ जातीचे समीकरण आणि आर्थिक हितसंबंध जेव्हा जोपासले गेले नाहीत तेव्हा या जाती सत्ताधा:यांना सोडून विरोधकांकडे गेल्या़  लोकसभा निवडणुकीला काँग्रेस आक्रमकपणो सामोरे गेली नाही़ त्याचबरोबर निवडणुकीचे मॅकेनिझम समजून घेण्यास कमी पडल़े भाजपाने हे मॅकेनिझम समजून घेऊन कृती केल्याने त्यांना यश मिळाले.’
- प्रा. प्रकाश पवार, राजकीय विेषक 
 
लोकसभा निवडणुकीनंतर आरक्षणाद्वारे सामाजिक न्याय देण्याचा प्रयत्न केला जात आह़े या समाजासाठी काहीना काही करतोय हे दाखविण्याचा प्रयत्न होतोय़ आपल्याकडील निवडणुकांमधील अनेक समाज घटक हे ऐनवेळी कार्यरत होतात़ बिहारमधील पोटनिवडणुकीत वेगळे फोर्सेस कामाला लागल़े आगामी निवडणुकीतही असे अनेक घटक ऐनवेळी आपल्या भूमिका बदलू शकतील़
-प्रा. यशवंत सुमंत, राजकीय अभ्यासक