शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

बदल्यांना भाजपाच्या बड्या नेत्यांचा आधार

By admin | Updated: June 26, 2016 02:43 IST

भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्याकडे कृषी खात्याचे मंत्रीपद असताना भाजपा-शिवसेनेचे मंत्री, नेत्यांनी आपला राजकीय प्रभाव वापरून नियमबाह्य बदल्या करून घेतल्या.

- यदु जोशी,  मुंबईभाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्याकडे कृषी खात्याचे मंत्रीपद असताना भाजपा-शिवसेनेचे मंत्री, नेत्यांनी आपला राजकीय प्रभाव वापरून नियमबाह्य बदल्या करून घेतल्या. बदलीच्या कायद्याची राज्यकर्तेच कशी पार मोडतोड करतात याचे ‘उत्तम’ उदाहरण त्यांनी घालून दिले. या नियमबाह्य बदल्यांची शिफारस करून अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट, सहकार मंत्री चंद्रकांत पाटील, खा. आनंदराव अडसूळ, आ. भाऊसाहेब फुंडकर यांच्यासह काही आमदारांनी कायद्याची ऐशीतैशी करण्यास हातभार लावल्याचे समोर आले आहे. अकोला येथील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रमोद लहाळे हे बदलीपात्र नसतानाही आणि त्यांचे कोणतेही निवेदन नसताना फुंडकर यांनी १७ जानेवारी २०१५ रोजी एकनाथ खडसे यांना लहाळेंची बदली बुलडाणा येथे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पदावर करण्याची विनंती केली. बुलडाणा येथे या पदावर असलेले विवेक सोनवणे हेही बदलीस अपात्र असताना त्यांना बुलडाण्यातच प्रकल्प संचालक (आत्मा) या पदावर पाठविण्यात आले. त्यानंतर दोनच महिन्यांच्या आत सोनवणेंना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पदावर जळगाव येथे नियमबाह्य पाठविण्यात आले. खा. रक्षा खडसे यांनी सोनावणेंना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पदावरून हटवू नये, असे पत्र दिले होते. त्यांच्या पत्रावर, ‘सोनवणेंना एक वर्ष मुदतवाढ द्यावी’ असा शेरा खडसेंनी दिला; पण पुढे सोनवणेंची बदली केली. सुभाष एस. काटकर हे महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ पुणे येथे विशेष कार्यकारी अधिकारी होते. ते बदलीला अपात्र असताना आणि त्यांचे कुठलेही निवेदन नव्हते, सार्वत्रिक बदल्यांचा काळही नव्हता तरीही मंत्री गिरीश बापट यांनी त्यांची बदली जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी; पुणे या पदावर करण्याची शिफारस केली. त्यावर, विनंतीप्रमाणे बदली करावी, असा शेरा खडसे यांनी दिला. अधीक्षक पदावर असलेले ज्ञानेश्वर बोटे हेही बदलीस पात्र नव्हते. हे दोघेही बदलीस पात्र नसल्याचा शेरा कृषी विभाग प्रशासनाने दिला. तो डावलून काटकर आणि बोटेंची बदली करण्यात आली. त्यानंतर काहीच दिवसांत बोटे यांची नियमबाह्यरीत्या बदली राज्य फलोत्पादन व औषधी वनस्पती मंडळ; पुणेच्या प्रकल्प व्यवस्थापकपदी करण्यात आली. काटकर आणि बोटे अनेक वर्षे मलाईदार पदांवरच राहतात, असा दावा स्वामी विवेकानंद प्रेरित समग्र सुधार मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रशांत कायंदे यांनी राज्यपालांकडे केलेल्या तक्रारीत केला असून, दोघांच्याही संपत्तीची चौकशी करण्याची मागणी केली आहे. उपसंचालक (आत्मा) पुणे या पदावर प्रतापसिंह शंकरराव कदम यांनी २२ जानेवारी २०१५ रोजी बदली करण्यात आली. ते त्या पदावर रुजू झाल्यानंतर अवघ्या दहा दिवसांनी सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ८ फेब्रुवारी रोजी खडसे यांना पत्र देऊन कदम यांची बदली जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी; लातूर या पदावर करण्याची शिफारस केली. विनंतीनुसार बदली करावी, असे लेखी आदेश खडसेंनी दिले आणि ही बदली नियमानुसार नसल्याचा विभागाचा अभिप्राय डावलून कदम यांची लातूरला बदली करण्यात आली. त्याला आपापसातील (म्युच्युअल) बदलीचा मुलामा देण्यात आला. ही बदली कशी नियमबाह्य होती याचा खुलासा राज्यपालांना दिलेल्या तक्रारीत केला आहे. (क्रमश:)खडसेंच्या कारभारावर टीकेची झोड उठवित असलेले विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा, भाजपाचे आमदार जयकुमार रावल, आ. योगेश टिळेकर, शिवसेनेचे खासदार आनंदराव अडसूळ, आ. बाबूराव पाचर्णे यांनी नियमबाह्य बदल्यांच्या शिफारशी केल्या आणि त्यानुसार बदल्याही करण्यात आल्या. पांडुरंग दिनकरराव शिंगेदार हे प्रकल्प संचालक (आत्मा); ठाणे या पदावर प्रतिनियुक्तीने गेले होते. प्रतिनियुक्तीचा कार्यकाळ पाच वर्षांचा असला तरी नियुक्ती अधिकारी एक महिन्याची नोटीस देऊन त्यांना परत बोलावू शकतो. मात्र असे काहीही न होता, सार्वत्रिक बदल्यांचा काळ नसतानाही शिंगेदार यांची खोपोली येथे उपविभागीय कृषी अधिकारी या पदावर बदली करण्यात आली. मुख्यमंत्र्यांची त्यास मान्यताही घेण्यात आली नाही. विभागाच्या वेबसाईटवर हा आदेश टाकण्यात आला नव्हता. काही नियमबाह्य बदल्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मान्यता दिली, असे तक्रारीत म्हटले आहे.