शहरं
Join us  
Trending Stories
1
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
2
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
3
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
4
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
5
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
6
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
7
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
8
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
9
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
10
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
11
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
12
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
13
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
14
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
15
ज्या घटनेमुळे बापाने केली हत्या, त्यात आईचा होता सहभाग; कोल्हापुरातील प्रकरणात काय आले समोर?
16
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
17
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
18
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
19
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
20
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?

दुष्काळग्रस्तांना ‘रोटी बँक’चा आधार

By admin | Updated: April 30, 2016 02:22 IST

पाण्याअभावी संपूर्ण राज्यालाच दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत आहेत. यामुळे सर्व स्तरातून पाणी वाचविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

मुंबई : पाण्याअभावी संपूर्ण राज्यालाच दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत आहेत. यामुळे सर्व स्तरातून पाणी वाचविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. येत्या काही काळात मुंबईवर पाणीटंचाईची परिस्थिती ओढावू नये, याकरिता गेल्या काही दिवसांत समाजातील सर्व घटकांद्वारे प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच भाग म्हणून मुंबईच्या डबेवाल्यांनीही यासाठी पुढाकार घ्यायचे ठरविले आहे.१ मे रोजी कामगार दिनाचे निमित्त साधून डबेवाले घरोघरी पाणी वाचविण्याचा संदेश देणार आहेत. यात डबेवाले मुंबईकरांना ‘पाणी कमी वापरा’, ‘पाण्याचा अपव्यय टाळा’ असे आवाहन करणार आहेत. डब्याच्या माध्यमातून २ लाख ग्राहकांच्या घराघरांत पोहोचणारे डबेवाले ही मोहीम एक आठवडा राबविणार आहेत.अन्न-पाण्याच्या शोधात मुंबईत विसाव्याला आलेल्या दुष्काळग्रस्तांनाही डबेवाल्यांनी आधार द्यायचे ठरविले आहे. ‘रोटी बँक’च्या माध्यमातून दररोज शेकडो भुकेलेल्यांना ते अन्न देतात. याच रोटी बँकच्या माध्यमातून दुष्काळग्रस्तांना ‘मायेचा घास’ डबेवाले देणार आहेत. याविषयी मुंबई जेवण डबे वाहतूक मंडळाचे प्रवक्ते सुभाष तळेकर यांनी सांगितले की, समाजातील समस्यांवर मात करण्यासाठी डबेवाल्यांनी नेहमीच सामाजिक बांधिलकी जपली आहे. याच सामाजिक जाणिवेतून डबेवाल्यांनी ही अभिनव मोहीम हाती घेतली असून, या माध्यमातून जास्तीत जास्त दुष्काळग्रस्तांना आधार देण्याचा मानस आहे. (प्रतिनिधी)