शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या...
2
जीएसटीने आणखी अवघड केले...! पार्ले-जी बिस्कीट पुडा ५ रुपयांचा आता ४.४५ ला, १ रुपयाचे चॉकलेट ८८ पैशांना...
3
Gold Silver Price Today: आजही सोन्या-चांदीचे भाव नव्या विक्रमी पातळीवर; सोन्याच्या दरात प्रति तोळा ₹१,३४३ तर चांदी ₹१,१८१ ने महागली
4
...म्हणून डोंबिवलीत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याला भाजपाच्या कार्यकर्त्यांनी नेसवली साडी, व्हिडीओ व्हायरल
5
"निरपराध लोकांची काय चूक होती? आम्ही निषेध करणार"; हवाई हल्ल्यात ३० जणांचा मृत्यू, पाकिस्तानमधील जनता संतापली
6
GST कपातीनंतर सरकारची आणखी एक गुड न्यूज! २५ लाख महिलांना मिळणार मोफत गॅस कनेक्शन
7
ओला दुष्काळ जाहीर करणार का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'त्याकरिता जेवढ्या पद्धतीची..."
8
"...ही चांगली गोष्ट नाही!"; राहुल गांधी यांच्या 'मत चोरी' संदर्भातील आरोपांवरून शरद पवार यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
9
Maharashtra Rain Alert: नवरात्रोत्सवात पावसाचाच 'गरबा', जाता जाता तडाखा देणार; IMD कडून सतर्कतेचा इशारा
10
Viral Video : घर नव्हे हा तर अजूबा! अवघ्या ५२ इंचांच्या दोन मजली घरात डोकावून बघाल, तर हादरून जाल!
11
उडणाऱ्या कारचा जगातील पहिलाच अपघात; दोन फ्लाइंग कार एकमेकांवर आदळल्या, एक बनली आगीचा गोळा...
12
बिहारमध्ये NDAचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, हा पक्ष लढवणार सर्वाधिक जागा
13
अतूट बंध! महागडे गिफ्टस नको तर 'या' ८ गोष्टींनी फुलवा नातं, आयुष्यभर राहा एकमेकांचे सोबती
14
Maharashtra Rain: संपूर्ण आठवडा पावसाचा, शुक्रवारनंतर मुसळधार पावसाची शक्यता, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र
15
नवरात्री २०२५: विनायक चतुर्थी कधी? व्रताचा संकल्प करा; गणपती पूजन ठरेल वरदान, कायम कृपा-लाभ!
16
USA Hanuman Statue: आता अमेरिकेचा हनुमानावरही आक्षेप; म्हणाले, 'खोट्या देवांची मूर्ती....'
17
Navratri 2025: नवरात्रीत लावलेला अखंड दिवा घालवतो 'अकाल मृत्यू'ची भीती; मात्र... 
18
"आधी नवरा गेला, आता मुलगी..."; विद्यार्थिनीचा शाळेत संशयास्पद मृत्यू, आईने फोडला टाहो
19
नवरात्री २०२५: अखंड ज्योत संकल्प केला, अचानक दिवा विझला तर...; देवी कोप-अशुभ-अवकृपा होईल का?
20
आर अश्विन पुन्हा मैदानात दिसणार; निवृत्तीनंतर परदेशातील ४ संघाकडून खेळण्याची ऑफर!

बीआरटीचे गुडघ्याला ‘बाशिंग’

By admin | Updated: April 27, 2016 00:57 IST

बीआरटीची सेवा देण्यासाठी पालिका प्रशासनाकडून कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले आहेत.

पुणे : सध्या जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून, १५ मेनंतर दौंड तालुक्यात पिण्याच्या पाण्याचे गंभीर संकट उभे राहण्याची शक्यता आहे. पुणेकरांनी पाण्याची थोडीशी बचत केल्यास दौंडसाठी ०.५० टीएमसी पाणी सोडणे शक्य आहे. याबाबत पालकमंत्र्यांसह शहर आणि जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी यांच्यासोबत चर्चा करून पाणी सोडण्याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी सांगितले.पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पांतील चार धरणांमध्ये आजअखेर ५.५० टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. यामध्ये पुणे शहराला १५ जुलैपर्यंत पुरेल यासाठी ३.८० टीएमसी पाणी, बाष्पीभवन ०.९० टीएमसी, ग्रामपंचायती, एनडीए व अन्य संस्था ०.२७ टीएमसी व पुणे महापालिकेला पाईपलाईनचे प्रेशर टिकवण्यासाठी ०.३० टीएमसी पाणी लागणार आहे. त्यानंतर प्रकल्पात ०.४० टीएमसी पाणी शिल्लक राहते. दौंड शहराला पाणी सोडण्यासाठी ०.५० टीएमसी पाणी आवश्यक आहे. महापालिकेला ठरलेल्या कोट्यानुसार पाणी देऊन प्रशासनाकडे ०.४० टीएमसी पाणी शिल्लक आहे. दौंड शहराला पाणी सोडण्यासाठी ०.१० टीएमसी अधिक पाण्याची आवश्यकता आहे. पुणेकरांनी आठ-दहा दिवस पाण्याची किमान दहा-बारा टक्के बचत केल्यास दौंडला पुढील अडीच महिने पुरेल एवढे पाणी देता येईल, असे राव यांनी स्पष्ट केले.(प्रतिनिधी)>इंदापूरला पाणी देणे शक्य नाहीदरम्यान, खडकवासला प्रकल्पातून इंदापूरला पाणीपुरवठा करण्यासाठी तब्बल १.६५ टीएमसी पाणी सोडावे लागणार आहे. १.६५ टीएमसी पाणी सोडले, तरी प्रत्यक्ष इंदापूरपर्यंत केवळ ०.४० टीएमसीच पाणी पोहोचेल. त्यामुळे धरणांमध्ये शिल्लक असलेला पाणीसाठा आणि पाणी सोडल्यानंतर पाण्याचा होणारा प्रचंड अपव्यय विचारात घेऊन इंदापूर तालुक्यासाठी पाणी सोडणे शक्य नसल्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी स्पष्ट केले.>पालकमंत्री करणार खडकवासला कालव्याची पाहणीशहराला पाणीपुरवठा करताना होणारी पाणी गळतीची पाहणी करणे व त्यावर उपाय-योजना करण्यासाठी पालकमंत्री गिरीश बापट बुधवारी (दि.२७) पर्वती जलशुद्धीकरण केंद्र, वारजे पंपिंग स्टेशन, खडकवासला धरण आणि कालवा याची पाहणी करणार आहे. त्यानंतर संबंधित सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन पाणीगळती रोखण्यासाठी काय उपाय-योजना कराव्या लागणार आहेत, याबाबत चर्चा करणार आहेत.>पाणीबचत करण्यासाठी पालिकेकडून आवश्यक उपाययोजना नाहीमहापालिकेने सप्टेंबरपासून पाणीकपात केली असल्याचे सांगितले जात असले, तरी सध्या पाणी पुरवठा करताना होणारा पाण्याचा प्रचंड अपव्यय थांबविण्यासाठी आवश्यक उपयायोजना केल्या नसल्याचे मत जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी व्यक्त केले. अनेक वर्षांपासून कॅनॉलची गळतीची दुरुस्ती करण्याची मागणी केली जात असताना यासाठी किमान सात-आठ दिवस कॅनॉल बंद ठेवण्यासंदर्भातदेखील सकारात्मक विचार करण्याची गरज असल्याचे राव यांनी सांगितले.