शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
2
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
3
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
4
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
5
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
6
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
7
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
8
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
9
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी
10
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
11
१० हजारांत भारतीय थायलंडमध्ये काय काय करू शकतात? भारताच्या रुपयाची 'बाथ'मध्ये किती किंमत?
12
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
13
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
14
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
15
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
16
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
17
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
18
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
19
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
20
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली

बीआरटीचे गुडघ्याला ‘बाशिंग’

By admin | Updated: April 27, 2016 00:57 IST

बीआरटीची सेवा देण्यासाठी पालिका प्रशासनाकडून कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले आहेत.

पुणे : सध्या जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून, १५ मेनंतर दौंड तालुक्यात पिण्याच्या पाण्याचे गंभीर संकट उभे राहण्याची शक्यता आहे. पुणेकरांनी पाण्याची थोडीशी बचत केल्यास दौंडसाठी ०.५० टीएमसी पाणी सोडणे शक्य आहे. याबाबत पालकमंत्र्यांसह शहर आणि जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी यांच्यासोबत चर्चा करून पाणी सोडण्याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी सांगितले.पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पांतील चार धरणांमध्ये आजअखेर ५.५० टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. यामध्ये पुणे शहराला १५ जुलैपर्यंत पुरेल यासाठी ३.८० टीएमसी पाणी, बाष्पीभवन ०.९० टीएमसी, ग्रामपंचायती, एनडीए व अन्य संस्था ०.२७ टीएमसी व पुणे महापालिकेला पाईपलाईनचे प्रेशर टिकवण्यासाठी ०.३० टीएमसी पाणी लागणार आहे. त्यानंतर प्रकल्पात ०.४० टीएमसी पाणी शिल्लक राहते. दौंड शहराला पाणी सोडण्यासाठी ०.५० टीएमसी पाणी आवश्यक आहे. महापालिकेला ठरलेल्या कोट्यानुसार पाणी देऊन प्रशासनाकडे ०.४० टीएमसी पाणी शिल्लक आहे. दौंड शहराला पाणी सोडण्यासाठी ०.१० टीएमसी अधिक पाण्याची आवश्यकता आहे. पुणेकरांनी आठ-दहा दिवस पाण्याची किमान दहा-बारा टक्के बचत केल्यास दौंडला पुढील अडीच महिने पुरेल एवढे पाणी देता येईल, असे राव यांनी स्पष्ट केले.(प्रतिनिधी)>इंदापूरला पाणी देणे शक्य नाहीदरम्यान, खडकवासला प्रकल्पातून इंदापूरला पाणीपुरवठा करण्यासाठी तब्बल १.६५ टीएमसी पाणी सोडावे लागणार आहे. १.६५ टीएमसी पाणी सोडले, तरी प्रत्यक्ष इंदापूरपर्यंत केवळ ०.४० टीएमसीच पाणी पोहोचेल. त्यामुळे धरणांमध्ये शिल्लक असलेला पाणीसाठा आणि पाणी सोडल्यानंतर पाण्याचा होणारा प्रचंड अपव्यय विचारात घेऊन इंदापूर तालुक्यासाठी पाणी सोडणे शक्य नसल्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी स्पष्ट केले.>पालकमंत्री करणार खडकवासला कालव्याची पाहणीशहराला पाणीपुरवठा करताना होणारी पाणी गळतीची पाहणी करणे व त्यावर उपाय-योजना करण्यासाठी पालकमंत्री गिरीश बापट बुधवारी (दि.२७) पर्वती जलशुद्धीकरण केंद्र, वारजे पंपिंग स्टेशन, खडकवासला धरण आणि कालवा याची पाहणी करणार आहे. त्यानंतर संबंधित सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन पाणीगळती रोखण्यासाठी काय उपाय-योजना कराव्या लागणार आहेत, याबाबत चर्चा करणार आहेत.>पाणीबचत करण्यासाठी पालिकेकडून आवश्यक उपाययोजना नाहीमहापालिकेने सप्टेंबरपासून पाणीकपात केली असल्याचे सांगितले जात असले, तरी सध्या पाणी पुरवठा करताना होणारा पाण्याचा प्रचंड अपव्यय थांबविण्यासाठी आवश्यक उपयायोजना केल्या नसल्याचे मत जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी व्यक्त केले. अनेक वर्षांपासून कॅनॉलची गळतीची दुरुस्ती करण्याची मागणी केली जात असताना यासाठी किमान सात-आठ दिवस कॅनॉल बंद ठेवण्यासंदर्भातदेखील सकारात्मक विचार करण्याची गरज असल्याचे राव यांनी सांगितले.