शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
2
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
3
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
4
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
5
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
6
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
7
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
8
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
9
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
10
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
11
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
12
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
13
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
14
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
15
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
16
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
17
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
18
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
19
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
20
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
Daily Top 2Weekly Top 5

बीआरटीचे गुडघ्याला ‘बाशिंग’

By admin | Updated: April 27, 2016 00:57 IST

बीआरटीची सेवा देण्यासाठी पालिका प्रशासनाकडून कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले आहेत.

पुणे : सध्या जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून, १५ मेनंतर दौंड तालुक्यात पिण्याच्या पाण्याचे गंभीर संकट उभे राहण्याची शक्यता आहे. पुणेकरांनी पाण्याची थोडीशी बचत केल्यास दौंडसाठी ०.५० टीएमसी पाणी सोडणे शक्य आहे. याबाबत पालकमंत्र्यांसह शहर आणि जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी यांच्यासोबत चर्चा करून पाणी सोडण्याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी सांगितले.पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पांतील चार धरणांमध्ये आजअखेर ५.५० टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. यामध्ये पुणे शहराला १५ जुलैपर्यंत पुरेल यासाठी ३.८० टीएमसी पाणी, बाष्पीभवन ०.९० टीएमसी, ग्रामपंचायती, एनडीए व अन्य संस्था ०.२७ टीएमसी व पुणे महापालिकेला पाईपलाईनचे प्रेशर टिकवण्यासाठी ०.३० टीएमसी पाणी लागणार आहे. त्यानंतर प्रकल्पात ०.४० टीएमसी पाणी शिल्लक राहते. दौंड शहराला पाणी सोडण्यासाठी ०.५० टीएमसी पाणी आवश्यक आहे. महापालिकेला ठरलेल्या कोट्यानुसार पाणी देऊन प्रशासनाकडे ०.४० टीएमसी पाणी शिल्लक आहे. दौंड शहराला पाणी सोडण्यासाठी ०.१० टीएमसी अधिक पाण्याची आवश्यकता आहे. पुणेकरांनी आठ-दहा दिवस पाण्याची किमान दहा-बारा टक्के बचत केल्यास दौंडला पुढील अडीच महिने पुरेल एवढे पाणी देता येईल, असे राव यांनी स्पष्ट केले.(प्रतिनिधी)>इंदापूरला पाणी देणे शक्य नाहीदरम्यान, खडकवासला प्रकल्पातून इंदापूरला पाणीपुरवठा करण्यासाठी तब्बल १.६५ टीएमसी पाणी सोडावे लागणार आहे. १.६५ टीएमसी पाणी सोडले, तरी प्रत्यक्ष इंदापूरपर्यंत केवळ ०.४० टीएमसीच पाणी पोहोचेल. त्यामुळे धरणांमध्ये शिल्लक असलेला पाणीसाठा आणि पाणी सोडल्यानंतर पाण्याचा होणारा प्रचंड अपव्यय विचारात घेऊन इंदापूर तालुक्यासाठी पाणी सोडणे शक्य नसल्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी स्पष्ट केले.>पालकमंत्री करणार खडकवासला कालव्याची पाहणीशहराला पाणीपुरवठा करताना होणारी पाणी गळतीची पाहणी करणे व त्यावर उपाय-योजना करण्यासाठी पालकमंत्री गिरीश बापट बुधवारी (दि.२७) पर्वती जलशुद्धीकरण केंद्र, वारजे पंपिंग स्टेशन, खडकवासला धरण आणि कालवा याची पाहणी करणार आहे. त्यानंतर संबंधित सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन पाणीगळती रोखण्यासाठी काय उपाय-योजना कराव्या लागणार आहेत, याबाबत चर्चा करणार आहेत.>पाणीबचत करण्यासाठी पालिकेकडून आवश्यक उपाययोजना नाहीमहापालिकेने सप्टेंबरपासून पाणीकपात केली असल्याचे सांगितले जात असले, तरी सध्या पाणी पुरवठा करताना होणारा पाण्याचा प्रचंड अपव्यय थांबविण्यासाठी आवश्यक उपयायोजना केल्या नसल्याचे मत जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी व्यक्त केले. अनेक वर्षांपासून कॅनॉलची गळतीची दुरुस्ती करण्याची मागणी केली जात असताना यासाठी किमान सात-आठ दिवस कॅनॉल बंद ठेवण्यासंदर्भातदेखील सकारात्मक विचार करण्याची गरज असल्याचे राव यांनी सांगितले.