शहरं
Join us  
Trending Stories
1
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
2
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
3
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
4
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
5
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
6
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
7
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
8
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
9
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
10
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
11
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
12
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
13
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
14
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
15
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
16
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
17
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
18
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
19
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
20
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू

भंडारदरा, मुळा, निळवंडे धरणांनी गाठला तळ

By admin | Updated: July 7, 2014 03:14 IST

कोकणच्या सहा जिल्ह्यांपैकी एकट्या ठाणे जिल्ह्याचे पर्जन्यमान सरासरी दोन हजार ४०० मिमी आहे.

सुरेश लोखंडे, ठाणेकोकणच्या सहा जिल्ह्यांपैकी एकट्या ठाणे जिल्ह्याचे पर्जन्यमान सरासरी दोन हजार ४०० मिमी आहे. जून महिन्यात सुमारे ४०० ते ५५० मिमी सरासरी पाऊस पडणाऱ्या या जिल्ह्यात आजपर्यंत सरासरी केवळ १५९.६७ मिमी पाऊस पडला आहे. या वर्षी पावसाला सुमारे २४ दिवसांचा उशीर झाल्याने जिल्ह्यातील १९८ गावांना जवळपास अतिरिक्त २७ दिवस पाणीटंचाईला तोंड द्यावे लागले. तर भातलागवड एक ते दोन आठवडे लांबणीवर गेली आहे.उन्हाळ्यात २०० गावांना ३७ टँकरने पाणीपुरवठा करून टंचाईवर मात करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पावसाने ओढ घेतली असती तर, टंचाईदेखील वाढत गेली. मात्र, मागील तीन दिवसांपासून कमी-अधिक प्रमाणात पाऊस पडत असल्यामुळे टँकरचा पाणीपुरवठा थांबविण्यात आला आहे. पावसाचा लहरीपणा लक्षात घेऊन फेबु्रवारीत १४ टक्के पाणीकपात महापालिकांना लावण्यात आली होती. ती आजतागायत आहे. १५ जुलैपर्यंत धरण क्षेत्रात पावसाचे प्रमाण न वाढल्यास त्यानंतर मात्र जास्त पाणीकपातीला तोंड द्यावे लागणार आहे. एक कोटी २० लाख लोकसंख्या असलेल्या जिल्ह्यातील सर्व महापालिका क्षेत्रात दररोज एक हजार ६२१ दशलक्ष लीटर पाण्याचा वापर होत आहे. गावपाड्यांना दररोज ७.४६ दशलक्ष घनमीटर पाणी लागत आहे. २४ लघुपाटबंधारे आणि सहा केटी बंधाऱ्यांद्वारे पाणीपुरवठा होत आहे. तर ५० दशलक्ष घनमीटर पाणी जिल्ह्यातील उद्योगांमध्ये वापरले जात आहे. तर ३०८ दशलक्ष घनमीटर पाण्याचा वापर या उद्योगधंद्यांमधील कामगारांसाठी केला जात आहे. पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये आजपर्यंत एक हजार १७७.८ मिमी पाऊस पडल्याची नोंद करण्यात आली आहे. आज भातसा धरणात २७.४७ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. याशिवाय, मोडकसागरमध्ये ४५.०५ टक्के, आंध्रात २१.३० टक्के बारवी धरणात ११.६६ टक्के सूर्याच्या कवडास व धामणीमध्ये अनुक्रमे ९७.९९ व ४५.७७ टक्के आणि तानसामध्ये ९.८० टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. २ जुलैपर्यंत सरासरी ९२० मिमी पाऊस जिल्ह्यात झाला आहे. प्रारंभीच्या पावसात शेतकऱ्यांनी भातरोपांसाठी सुमारे ७० टक्के पेरण्या पूर्ण झाल्या असता उर्वरित ३० टक्के पेरण्यांचे काम संपण्याच्या उंबरठ्यावर आहे. जुलैच्या पहिल्या व दुसऱ्या आठवड्यात भाताची लागवड पूर्णत्वास येणे अपेक्षित आहे. जिल्ह्यातील एक लाख ७७ हजार हेक्टर क्षेत्र या वर्षी खरिपाखाली येणार आहे. यामध्ये सर्वाधिक क्षेत्रावर भाताची लागवड आहे. नागली १५ हजार ९०५ हेक्टर क्षेत्रावर तर वरी ११ हजार ३२० हेक्टर क्षेत्रात घेतली जात आहे. उर्वरितक्षेत्रावर तूर, मूग, उडीद आणि तीळ, सोयाबीन आदी पिके घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. उत्पादनवाढीसाठी ३४ हजार मेट्रीक टन खताचा वापर केला जाणार आहे. लांबलेल्या पावसावर मात करण्यासाठी शेतकऱ्यांनी भातपेरणीवर टँकरद्वारे पाणी फवारणी करून भाताची रोपे वाचवली आहेत.