शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
2
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
3
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
4
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
5
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
6
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
7
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
8
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
9
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
10
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
11
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
12
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
13
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
14
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
15
मुत्सद्देगिरी हेच औषध! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'ने भारतीय फार्मा कंपन्यांचे काय होणार?
16
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
17
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
18
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
19
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
20
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत

१४८ विद्यार्थ्यांना ओसरीचा आधार

By admin | Updated: November 19, 2016 03:25 IST

तालुक्यातील कासपाडा येथील दहवर्षापूर्वी बांधलेली आंगणवाडी केंद्राची इमारतीची दैनी आवस्था झाली

विक्रमगड : तालुक्यातील कासपाडा येथील दहवर्षापूर्वी बांधलेली आंगणवाडी केंद्राची इमारतीची दैनी आवस्था झाली असून. आंगणवाडी केंद्राच्या वर्ती टाकलेले पत्रे फुटले आहेत. भिंतीला तडे पडले आसून, बाल विद्यार्थ्यांना खाली बसण्यासाठीचे फरशा उखडला असल्या कारणाने या ही इमारत बंद करुन कासपाडा परीसरातील पाटिलपाडा, कलमपाडा, कासपाडा, आलिवपाडा या चार पाडातील १४८ बाल विद्यार्थ्यांना एका घराच्या ओसरीचा आसरा घेत दाटी-वाटीने बाल संस्काराचे शिक्षण घ्यावे लागत आहे. बालकांमध्ये शालेय शिक्षणाची आवड निर्माण व्हावी, बालके कुपोषित राहू नयेत; तसेच प्राथमिकपूर्व शिक्षण देण्याच्या उद्देशाने अनौपचारिकशिक्षण देण्यासाठी केंद्र शासनाने अंगणवाड्यांची निर्मिती केली आहे. खोडो-पाडी मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना संस्काराचे बालकडू देण्याचे मुख्य उद्देश समोर ठेवून आंगणवाडी केंद्र सुरु करण्यात आली मात्र योग्य सुविधा नसल्याने व धोकादायक इमारतीमुळे तालुक्यातील कासपाडा परिसरातील १४८ बालकांना एका घराबाहेरील ओट्यावर दाटी वाटीने शिक्षणाचे धडे घ्यावे लागत आहे. त्यात बालकांना या ओट्याची जागा कमी पडत असल्याने. खेळण्या-बागडण्यासाठी बाहेरचा आसरा घ्यावा लागतोय. त्यांना बसण्यासाठी, बागडण्यासाठी, शिक्षणाचे प्राथमिक धडे प्रसन्न वातावरणात मिळण्यासाठी होत नाही या परिस्थितीमुळे बाल मनावर कसे संस्कार होणार असा प्रश्न विचारला जात आहे.(वार्ताहर)>जिल्हा विभाजनात नवीन इमारतीचा प्रस्ताव रखडलाकासपाडा इमारत अंत्यत धोकादायक आहे. इमारत दहा वर्षापूर्वीची जुनी आहे. त्यामुळे येथील ही इमारत बंद करून याच पाड्यातील एका घराचा ओट्यावर आंगणवाडी भरत आहे. जिल्हा विभाजनापूर्वी नविन इमारतीचा प्रस्ताव विक्र मगड पंचायत समितीचा बाल विकास विभागाने ठाणे जिल्हा परीषदे कडे तीन वर्षा पूर्वी पाठवला होता. मात्र जिल्हा विभाजन झाल्याने हा प्रस्ताव धूलखात पडून होता. या वर्षी पुन्हा कासपाडातील नविन इमारतीसाठी नविन प्रस्ताव पालघर जिल्हा परिषदेकडे पाठवला असल्याची माहिती विक्र मगड पंचायत समितीचा बालविकास विभागातील आधिकार्यनी दिली.कासपाडा परिसरातील पाटीलपाडा, कलमपाडा, कासपाडा, अलीवपाडा, या चार पाड्यातील १४८ बाल विद्यार्थी कासपाडा आंगणवाडी केंद्रावर शिक्षणासाठी येतात यातील सॅम-मॅमचे एकूण ४२ बालविद्यार्थी कुपोषित असून त्याच्यावर प्राथमिक आरोग्य केंद्र तलवाडा येथे उपचार सुरु असल्याची माहिती आंगणवाडी पर्यवेक्षिका जे.जे.किरकीरा यानी दिली.>या आंगणवाडी केंद्रातील कुपोषित बालकांवर प्राथमिक आरोग्य केंद्र तलवाडा येथे उपचार सुरु आहेत. तसेच कासपाडा आंगणवाडीचा केंद्राचा प्रस्ताव नव्याने पालघर जिल्हा परिषदेकडे पाठवला आहे.- जे.जे. किरकीरा(आंगणवाडी पर्यवेक्षिका, पंचायत समिती, विक्रमगड)