शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

वाठोड्याला विषाचा विळखा

By admin | Updated: July 21, 2014 01:00 IST

बुटीबोरी परिसरातील वाठोडा या गावाशेजारच्या एका नाल्यात कंपनीतील भयंकर घातक विषारी केमिकल टाकले जात असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. ते केमिकल एवढे भयंकर आहे,

कारखान्यातील केमिकल नाल्यात : गावकऱ्यांचा जीव धोक्यात जीवन रामावत - नागपूरबुटीबोरी परिसरातील वाठोडा या गावाशेजारच्या एका नाल्यात कंपनीतील भयंकर घातक विषारी केमिकल टाकले जात असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. ते केमिकल एवढे भयंकर आहे, की त्यामुळे परिसरातील हजारो गावकऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. सोबतच परिसरातील शेकडो एकर सुपीक शेतीचे पोत खराब होऊन व विहिरींचे पाणी विषारी झाले आहे. विशेष म्हणजे, गत चार वर्षांपासून येथे हा प्रकार सुरू असताना, त्याची स्थानिक प्रशासनाने अजूनपर्यंत कोणतीही दखल घेतलेली नाही. शिवाय ते केमिकल कुठून येते व कोण टाकतो, याचाही अजूनपर्यंत सुगावा लागलेला नाही. गावकऱ्यांच्या मते, मध्यरात्रीच्या अंधारात टॅँकर येतो, आणि केमिकल नाल्यात टाकून निघून जातो. मागील चार वर्षांपासून प्रत्येक आठवड्यात दोन ते तीन वेळा हा प्रकार घडतो. त्याचा दुष्परिणाम आता परिसरातील नागरिकांना भोगावा लागत आहे. अनेकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. यासंबंधी वाठोडा या गावातील नागरिक अशोक भापकर, किशोर बावनकुळे व संजय ठाकरे यांच्यासह अनेकांनी जिल्हाधिकाऱ्यांसह, मंत्री, आमदार, पोलीस, नीरी, कृषी विभाग व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे लेखी तक्रारी दिल्या आहेत. मात्र त्या तक्रारींची कुणीही दखल घेतली नाही. ‘वेणा डॅम’ही दूषित चार वर्षांपासून केमिकल टाकले जात असलेल्या नाल्यापासून केवळ चार किलोमीटर अंतरावर ‘वेणा डॅम’ आहे. उन्हाळ्यात या नाल्याला पाणी नसते. परंतु पावसाळा सुरू होताच, या नाल्यातील संपूर्ण पाणी वेणा डॅममध्ये जाते. त्यामुळे वर्षभर त्या नाल्यात टाकल्या जात असलेले विषारी केमिकल पावसाच्या पाण्यासोबत डॅममध्ये पोहोचते. त्यानुसार नुकताच पाऊस पडला असून, त्या पाण्यासोबत नाल्यातील विषारी केमिकल थेट वेणा डॅममध्ये पोहोचले आहे. विशेष म्हणजे, या वेणा डॅममधील पाण्याचा परिसरातील अनेक गावांमध्ये पिण्यासाठी पुरवठा केला जातो. अशा स्थितीत प्रशासनाने वेळीच खबरदारी घेतली नाही, तर फार मोठी हानी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. हजारो गावकऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. सोबतच नाल्यातील पाणी परिसरातील जनावरे पित असल्याने त्यांच्याही जीवन-मरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे.