शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

वाठोड्याला विषाचा विळखा

By admin | Updated: July 21, 2014 01:00 IST

बुटीबोरी परिसरातील वाठोडा या गावाशेजारच्या एका नाल्यात कंपनीतील भयंकर घातक विषारी केमिकल टाकले जात असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. ते केमिकल एवढे भयंकर आहे,

कारखान्यातील केमिकल नाल्यात : गावकऱ्यांचा जीव धोक्यात जीवन रामावत - नागपूरबुटीबोरी परिसरातील वाठोडा या गावाशेजारच्या एका नाल्यात कंपनीतील भयंकर घातक विषारी केमिकल टाकले जात असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. ते केमिकल एवढे भयंकर आहे, की त्यामुळे परिसरातील हजारो गावकऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. सोबतच परिसरातील शेकडो एकर सुपीक शेतीचे पोत खराब होऊन व विहिरींचे पाणी विषारी झाले आहे. विशेष म्हणजे, गत चार वर्षांपासून येथे हा प्रकार सुरू असताना, त्याची स्थानिक प्रशासनाने अजूनपर्यंत कोणतीही दखल घेतलेली नाही. शिवाय ते केमिकल कुठून येते व कोण टाकतो, याचाही अजूनपर्यंत सुगावा लागलेला नाही. गावकऱ्यांच्या मते, मध्यरात्रीच्या अंधारात टॅँकर येतो, आणि केमिकल नाल्यात टाकून निघून जातो. मागील चार वर्षांपासून प्रत्येक आठवड्यात दोन ते तीन वेळा हा प्रकार घडतो. त्याचा दुष्परिणाम आता परिसरातील नागरिकांना भोगावा लागत आहे. अनेकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. यासंबंधी वाठोडा या गावातील नागरिक अशोक भापकर, किशोर बावनकुळे व संजय ठाकरे यांच्यासह अनेकांनी जिल्हाधिकाऱ्यांसह, मंत्री, आमदार, पोलीस, नीरी, कृषी विभाग व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे लेखी तक्रारी दिल्या आहेत. मात्र त्या तक्रारींची कुणीही दखल घेतली नाही. ‘वेणा डॅम’ही दूषित चार वर्षांपासून केमिकल टाकले जात असलेल्या नाल्यापासून केवळ चार किलोमीटर अंतरावर ‘वेणा डॅम’ आहे. उन्हाळ्यात या नाल्याला पाणी नसते. परंतु पावसाळा सुरू होताच, या नाल्यातील संपूर्ण पाणी वेणा डॅममध्ये जाते. त्यामुळे वर्षभर त्या नाल्यात टाकल्या जात असलेले विषारी केमिकल पावसाच्या पाण्यासोबत डॅममध्ये पोहोचते. त्यानुसार नुकताच पाऊस पडला असून, त्या पाण्यासोबत नाल्यातील विषारी केमिकल थेट वेणा डॅममध्ये पोहोचले आहे. विशेष म्हणजे, या वेणा डॅममधील पाण्याचा परिसरातील अनेक गावांमध्ये पिण्यासाठी पुरवठा केला जातो. अशा स्थितीत प्रशासनाने वेळीच खबरदारी घेतली नाही, तर फार मोठी हानी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. हजारो गावकऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. सोबतच नाल्यातील पाणी परिसरातील जनावरे पित असल्याने त्यांच्याही जीवन-मरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे.