शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

बारामतीकरांचा ‘ताप’ उतरेना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2016 01:29 IST

यंदा याच आरोग्यदायी ऋतूमध्ये गोचीडताप, चिकुनगुनिया, विषाणुजन्य तापाचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळत आहेत.

बारामती : थंडीचा कालावधी आरोग्यदायी समजला जातो. मात्र, यंदा याच आरोग्यदायी ऋतूमध्ये गोचीडताप, चिकुनगुनिया, विषाणुजन्य तापाचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळत आहेत. डासांच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे या आजारांच्या रुग्णांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. अनेकांची दिवाळी आजारपणाला तोंड देण्यातच गेल्याचे चित्र आहे.शहरातील डासांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. डासांचे वाढते प्रमाण रोखण्यास नगरपालिका प्रशासन अपयशी ठरत आहे. परिणामी विविध आजारांचे प्रमाण वाढत आहे. यामध्ये डेंगीसदृश रुग्णदेखील आढळत आहेत. बारामती शहरातील डॉ. आर. डी. वाबळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले, की गेल्या दोन-तीन वर्षांच्या तुलनेने चिकुनगुनियाच्या रुग्णांचे प्रमाण अधिक वाढलेले आहे. यंदा या आजारासह डेंगीसदृश आजाराचे गतवर्षीच्या तुलनेने रुग्ण जास्त आहेत. त्यामध्ये सांधेदुखीसह थंडीताप, उलटी, मळमळणे ही लक्षणे आढळून येत आहेत. तसेच शहरातील डॉ. पे्रमेंद्र देवकाते यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले, की चिकुनगुनिया, चिकुन गुनियासदृश आजारांच्या रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. अनेकांची दिवाळी साजरी झालीच नाही. दिवाळी आजारपणातच गेली. सांधेदुखी, ताप, अंगदुखी, डोकेदुखीची लक्षणे आढळणारे रुग्ण दवाखान्यात येतच आहेत. यासाठी डासांची उत्पत्ती रोखणे आवश्यक आहे. पाऊस थांबल्यावरच त्या दृष्टीने दक्षता घेणे आवश्यक आहे. तर, नागरिकांनी डासांपासून स्वत:चा बचाव करण्याचा प्रयत्न करावा.भवानीनगर येथील डॉ. राकेश मेहता यांनी सांगितले, की काटेवाडी (ता. बारामती) परिसरात अद्यापही डेेंगीचे रुग्ण आढळत आहेत. त्यासाठी कारणीभूत ठरणाऱ्या डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबविण्याची गरज आहे. तर, गोचीडतापाचे रुग्ण अधिक संख्येने आढळत आहेत. याशिवाय, विषाणुजन्य तापाचे रुग्णांची संख्या मोठी आहे. यासाठी रुग्णांची प्रतिकारक्षमतादेखील महत्त्वपूर्ण ठरत आहे. परिपूर्ण आहार, कडधान्ये, पालेभाज्यांचा आहारात समावेश प्राधान्याने करायला हवा. प्रतिकारक्षमता विकसित केल्यास विविध आजाराच्ंया रुग्णांचे प्रमाण घटण्यास मदत होईल. लहान मुलांमध्ये सर्दी, तापाचे रुग्ण आहेत. सध्या दिवाळीच्या फराळाचा आग्रह सर्वत्र होताना दिसतो. त्यामुळे जुलाब, पोटदुखीचा त्रास होतो. त्यामुळे अति तेलकट पदार्थ टाळावेत. थंडीचा काळ खरे तर आरोग्यदायी मानला जातो; मात्र यंदा हा काळ आरोग्यदायी व अनुकूल नसल्याचे चित्र आहे. विविध आजारांच्या रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. (प्रतिनिधी)सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षिका डॉ. मीरा चिंचोलीकर यांनी चिकुनगुनिया, गोचीडतापाच्या रुग्णांचे प्रमाण तुलनेने शहरात कमी आहे. प्रशासनाच्या वतीने जनजागृती कार्यक्रम राबविण्यात आला आहे. नागरिकांनी पाणी साठविताना दक्षता घ्यावी. कोरडा दिवस पाळावा. या आजारांचे प्रमुख कारण डासांची उत्पत्ती हेच आहे. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. महेश जगताप यांनी तालुक्याच्या ग्रामीण भागात चिकुनगुनिया, गोचीडताप या आजारांचे प्रमाण तुरळक असल्याचा दावा केला आहे. प्रशासनाने वेळेत याबाबत दक्षता घेतली; त्यामुळे या रुग्णांचे प्रमाण तुरळक आहे.नारळाच्या करवंट्या, रिकामे टायर नष्ट करावेत. नागरिकांनी आजाराची लक्षणे आढळल्यास सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयाशी संपर्क साधावा. त्यासाठी रुग्णालयात पुरेसा औषधसाठा आहे.शहरातील खासगी रुग्णालयांत उपचार घेणाऱ्या विविध आजारांच्या रुग्णांचा अहवाल गुरुवारी (दि. ३) मिळणार आहे. त्यानंतर गरज पडल्यास उपाययोजना, जनजागृती कार्यक्रम हाती घेण्यात येईल.