शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
3
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
4
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
5
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
6
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
7
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
8
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
9
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
10
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
11
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
12
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
13
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
14
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
15
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
16
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
17
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
18
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
19
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
20
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले

बारामतीकरांचा ‘ताप’ उतरेना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2016 01:29 IST

यंदा याच आरोग्यदायी ऋतूमध्ये गोचीडताप, चिकुनगुनिया, विषाणुजन्य तापाचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळत आहेत.

बारामती : थंडीचा कालावधी आरोग्यदायी समजला जातो. मात्र, यंदा याच आरोग्यदायी ऋतूमध्ये गोचीडताप, चिकुनगुनिया, विषाणुजन्य तापाचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळत आहेत. डासांच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे या आजारांच्या रुग्णांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. अनेकांची दिवाळी आजारपणाला तोंड देण्यातच गेल्याचे चित्र आहे.शहरातील डासांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. डासांचे वाढते प्रमाण रोखण्यास नगरपालिका प्रशासन अपयशी ठरत आहे. परिणामी विविध आजारांचे प्रमाण वाढत आहे. यामध्ये डेंगीसदृश रुग्णदेखील आढळत आहेत. बारामती शहरातील डॉ. आर. डी. वाबळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले, की गेल्या दोन-तीन वर्षांच्या तुलनेने चिकुनगुनियाच्या रुग्णांचे प्रमाण अधिक वाढलेले आहे. यंदा या आजारासह डेंगीसदृश आजाराचे गतवर्षीच्या तुलनेने रुग्ण जास्त आहेत. त्यामध्ये सांधेदुखीसह थंडीताप, उलटी, मळमळणे ही लक्षणे आढळून येत आहेत. तसेच शहरातील डॉ. पे्रमेंद्र देवकाते यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले, की चिकुनगुनिया, चिकुन गुनियासदृश आजारांच्या रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. अनेकांची दिवाळी साजरी झालीच नाही. दिवाळी आजारपणातच गेली. सांधेदुखी, ताप, अंगदुखी, डोकेदुखीची लक्षणे आढळणारे रुग्ण दवाखान्यात येतच आहेत. यासाठी डासांची उत्पत्ती रोखणे आवश्यक आहे. पाऊस थांबल्यावरच त्या दृष्टीने दक्षता घेणे आवश्यक आहे. तर, नागरिकांनी डासांपासून स्वत:चा बचाव करण्याचा प्रयत्न करावा.भवानीनगर येथील डॉ. राकेश मेहता यांनी सांगितले, की काटेवाडी (ता. बारामती) परिसरात अद्यापही डेेंगीचे रुग्ण आढळत आहेत. त्यासाठी कारणीभूत ठरणाऱ्या डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबविण्याची गरज आहे. तर, गोचीडतापाचे रुग्ण अधिक संख्येने आढळत आहेत. याशिवाय, विषाणुजन्य तापाचे रुग्णांची संख्या मोठी आहे. यासाठी रुग्णांची प्रतिकारक्षमतादेखील महत्त्वपूर्ण ठरत आहे. परिपूर्ण आहार, कडधान्ये, पालेभाज्यांचा आहारात समावेश प्राधान्याने करायला हवा. प्रतिकारक्षमता विकसित केल्यास विविध आजाराच्ंया रुग्णांचे प्रमाण घटण्यास मदत होईल. लहान मुलांमध्ये सर्दी, तापाचे रुग्ण आहेत. सध्या दिवाळीच्या फराळाचा आग्रह सर्वत्र होताना दिसतो. त्यामुळे जुलाब, पोटदुखीचा त्रास होतो. त्यामुळे अति तेलकट पदार्थ टाळावेत. थंडीचा काळ खरे तर आरोग्यदायी मानला जातो; मात्र यंदा हा काळ आरोग्यदायी व अनुकूल नसल्याचे चित्र आहे. विविध आजारांच्या रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. (प्रतिनिधी)सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षिका डॉ. मीरा चिंचोलीकर यांनी चिकुनगुनिया, गोचीडतापाच्या रुग्णांचे प्रमाण तुलनेने शहरात कमी आहे. प्रशासनाच्या वतीने जनजागृती कार्यक्रम राबविण्यात आला आहे. नागरिकांनी पाणी साठविताना दक्षता घ्यावी. कोरडा दिवस पाळावा. या आजारांचे प्रमुख कारण डासांची उत्पत्ती हेच आहे. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. महेश जगताप यांनी तालुक्याच्या ग्रामीण भागात चिकुनगुनिया, गोचीडताप या आजारांचे प्रमाण तुरळक असल्याचा दावा केला आहे. प्रशासनाने वेळेत याबाबत दक्षता घेतली; त्यामुळे या रुग्णांचे प्रमाण तुरळक आहे.नारळाच्या करवंट्या, रिकामे टायर नष्ट करावेत. नागरिकांनी आजाराची लक्षणे आढळल्यास सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयाशी संपर्क साधावा. त्यासाठी रुग्णालयात पुरेसा औषधसाठा आहे.शहरातील खासगी रुग्णालयांत उपचार घेणाऱ्या विविध आजारांच्या रुग्णांचा अहवाल गुरुवारी (दि. ३) मिळणार आहे. त्यानंतर गरज पडल्यास उपाययोजना, जनजागृती कार्यक्रम हाती घेण्यात येईल.