शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
3
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
4
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
5
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
6
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
7
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
8
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
9
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
10
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
11
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
12
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
13
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
14
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
15
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
16
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
17
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
18
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
19
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
20
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?

बारामतीतील टँकर कमी होईनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2016 01:25 IST

२२ गावांसह त्यांच्याशी संलग्न असणाऱ्या २५५ वाड्या-वस्त्यांतील ७० हजार ४२२ लोकसंख्येला टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे

बारामती : तालुक्यातील २२ गावांसह त्यांच्याशी संलग्न असणाऱ्या २५५ वाड्या-वस्त्यांतील ७० हजार ४२२ लोकसंख्येला टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. इंदापूर तालुक्यातील २५ गावांसह त्यांच्याशी संलग्न असणाऱ्या ९७ वाड्या-वस्त्यांतील ७४ हजार २४ एवढ्या लोकसंख्येला टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. दोन्ही तालुक्यांतील १ लाख ४४ हजार ४४६ लोकांना शासनाच्या वतीने ५७ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.बारामती उपविभागात या वर्षी पाणीटंचाईची मोठी समस्या निर्माण झाली होती. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात उपविभागातील बारामती तालुक्यात ३४, तर इंदापूर तालुक्यात २३ अशा एकूण ५७ टँकरनी दोन्ही तालुक्यांतील मिळून एकूण १ लाख ४४ हजार ४४६ लोकसंख्येला शासनाच्या वतीने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. बारामती तालुक्यातील २२ गावांसह त्यांच्याशी संलग्न असणाऱ्या २५५ वाड्या-वस्त्यांना, तर इंदापूर तालुक्यातील २५ गावांसह त्यांच्याशी संलग्न असणाऱ्या ९७ वाड्या-वस्त्यांवर टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. सलग तीन वर्षे सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला. मागील आठवड्यात मॉन्सूनपूर्व पावसाने सलग तीन दिवस हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह पडलेल्या पावसाने फळबागांचे नुकसान झाले. मात्र, सध्या ओढा, नाले खोलीकरणाची कामे मोठ्या प्रमाणात झाली आहेत. ज्या भागात पाऊस पडला, तेथे पाणी साठून राहण्यास मदत झाली. मात्र, टँकरची संख्या अद्याप कमी झालेली नाही. या वर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्याने जिल्ह्यातील अनेक गावांना त्याचा फटका बसत आहे. बारामती तालुक्यातील बाबुर्डी, काळखैरेवाडी, देऊळगाव रसाळ, जळगाव सुपे, पानसरेवाडी, कारखेल, जराडवाडी, खराडेवाडी, कोळोली, उंडवडी सुपे, उंडवडी क.प., मोराळवाडी, वाकी, कुतवळवाडी, दंडवाडी, साबळेवाडी, निंबोडी, कटफळ, सोनवडी सुपे, गोजुबावी, भोंडवेवाडी, आंबी खुर्द, नारोळी, अंजनगाव, सायबाचीवाडी, भिलारवाडी, वाढाणे, तरडोली, मासाळवाडी, लोणी भापकर, शिर्सुफळ, काऱ्हाटी, मुर्टी, मुढाळे, गाडीखेल, मोढवे, मोरगाव, पारवडी, जैनकवाडी, सावळ या गावांसह त्यांच्याशी संलग्न असणाऱ्या २५५ वाड्या-वस्त्यांना ३४ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. टंचाईच्या गावातील एकूण लोकसंख्या ७० हजार ४२२ इतकी आहे.इंदापूर तालुक्यातील कळंब, वडापुरी, गलांडवाडी - २, विठ्ठलवाडी, गोखळी, झगडेवाडी, खोरोची, वकीलवस्ती, भोडणी, कौटळी, शेटफळगढे, रुई, कळस, व्याहळी, घोरपडवाडी, कचरवाडी, निमगाव केतकी, कडबनवाडी, अकोले, निरनिमगाव, काटी, लामजेवाडी, भादलवाडी, पिटकेश्वर या गावांसह त्यांच्याशी संलग्न असणाऱ्या ९७ वाड्या-वस्त्यांना २३ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. तालुक्यातील टंचाईच्या गावांतील एकूण लोकसंख्या ७४ हजार ०२४ इतकी आहे. या भागातील खासगी ९, तर २ शासकीय बोअर अधिग्रहण करण्यात आल्या आहेत.