शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
2
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
3
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
4
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
5
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
6
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
7
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
8
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
9
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
10
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
11
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
12
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
13
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
14
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
15
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
16
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
17
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
18
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
19
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
20
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
Daily Top 2Weekly Top 5

बारामतीकरांमुळेच यशाच्या शिखरावर!

By admin | Updated: April 15, 2017 01:48 IST

विधानसभेची पहिली निवडणूक बारामतीतून १९६७ साली लढविली. त्यावेळी काँग्रेसमधून ११ जण इच्छुक होते. त्यापैकी दहा जणांनी मला तिकीट न देता कोणालाही

बारामती : विधानसभेची पहिली निवडणूक बारामतीतून १९६७ साली लढविली. त्यावेळी काँग्रेसमधून ११ जण इच्छुक होते. त्यापैकी दहा जणांनी मला तिकीट न देता कोणालाही द्यावे, असा ठराव केला. मुंबईत यशवंतराव चव्हाण यांच्याकडेदेखील दहा जणांनी हाच प्रस्ताव मांडला. परंतु चव्हाण यांनी, ‘एक जागा गेली तरी चालेल’, असे सांगून मला तिकीट दिले. ती निवडणूक मी जिंकली. त्यावेळेपासून आजपर्यंत बारामतीकरांनी विजयाची परंपरा कायम ठेवत मला यशाच्या शिखरावर नेऊन ठेवले, असे भावपूर्ण उद्गार राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष, माजी कृषीमंत्री खा. शरद पवार यांनी काढले. बारामती तालुका शहर नागरी गौरव समारंभ समितीच्या वतीने शरद पवार यांचा गुरुवारी गौरव करण्यात आला. केंद्र सरकारने पवार यांना पद्मविभूषण पुरस्काराने गौरविले आहे. यानिमित्त हे आयोजन करण्यात आले होते. बारामतीत घरच्या लोकांकडून होत असणाऱ्या या सोहळ्यासाठी प्रतिभाताई पवार, खा. सुप्रिया सुळे, अजित पवार, विधान परिषदेचे अध्यक्ष रामराजे नाईक निंबाळकर, आमदार हेमंत टकले आदी मान्यवर उपस्थित होते.प्रचाराला न येता बारामतीकरांनी प्रत्येक निवडणुकीत भरघोस मतांनी निवडून दिले. ज्या हेतूने त्यांनी ताकद दिली, तो हेतू साध्य करण्यासाठी, देशहितासाठी शेवटच्या श्वासापर्यंत प्रयत्नांची पराकाष्ठा करू, अशा शब्दात पवार यांनी कृतज्ञता व्यक्त केली. बारामतीकरांनी राजकारणात मला ५० वर्षे स्थिरता दिली. आजवर दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी ते विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माझ्याविरोधात सभा झाल्या. परंतु बारामतीकरांनी करायचे ते केले. हे भाग्याचे स्थान बारामतीकरांनी दिले. आज मी जो काही आहे, तो बारामतीकरांमुळे. त्यामुळेच शेवटच्या श्वासापर्यंत मी बारामती आणि देशाच्या विकासासाठी झटत राहील, असेही पवार यांनी सांगितले. (वार्ताहर)भाग्याचे स्थान दिले...मी अतिशयोक्ती करीत नाही. देशात केवळ एक ते दोन जण अजिबात प्रचाराला येत नाहीत. बारामतीत १४ निवडणुका केल्या. शेवटची निवडणूकही फलटणमधून चांगल्या मताने निवडून दिली. हे भाग्याचे स्थान बारामतीकरांनी दिले.- शरद पवार, माजी केंद्रीय मंत्री.