शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
2
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
3
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
4
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
5
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
6
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
7
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
8
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
9
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
10
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
11
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
12
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
13
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
14
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
15
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
16
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
17
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
18
पंकज भोयर वर्धेबरोबरच भंडाऱ्याचेही पालकमंत्री, सावकारे यांची बुलढाण्याचे सहपालकमंत्रीपदी नियुक्ती
19
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
20
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 

बराखीतला कांदा गेला सडून

By admin | Updated: February 27, 2017 01:00 IST

कांद्याला बाजारभाव नसल्याने शेतकऱ्यांनी कांदा बराखीत तसाच सोडून दिला आहे.

मंचर : कांद्याला बाजारभाव नसल्याने शेतकऱ्यांनी कांदा बराखीत तसाच सोडून दिला आहे. कांदा बराखीत सडून गेला असून, कांद्याला कोंब आले आहेत. सडलेल्या कांद्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. मोठ्या कष्टाने आणि भांडवल गुंतवून घेतलेले कांदा पीक डोळ्यांसमोर नष्ट होताना शेतकऱ्यांना पाहावे लागत आहे.कांदा पिकाला यावर्षी अपेक्षित बाजारभाव मिळाला नाही. कांद्याच्या लागवड क्षेत्रात वाढ झाली आहे. बारमाही पाण्याची उपलब्धता असल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणावर कांदा पीक घेतो. सुरुवातीपासून कांद्याला बाजारभाव नव्हता, त्यामुळे शेतकऱ्यांनी तो साठवून ठेवण्याचा निर्णय घेतला. बहुतेक शेतकऱ्यांनी कांदा बराखी बनवून ठेवल्या आहेत. या बराखीसाठी त्यांना बराच खर्च यापूर्वीच करावा लागला आहे. बराखीत कांदा साठविण्यासाठी शेतकऱ्यांना खर्च करावा लागला. कांद्याचा बाजारभाव वाढल्यावर शेतकरी बराखीतील कांदा विक्रीसाठी बाहेर काढणार होता. वर्षभर कांद्याचे बाजारभाव वाढलेच नाहीत. आधीच कांदा पिकाला मोठा खर्च करावा लागला होता. आता मिळणाऱ्या बाजारभावाने भांडवलही वसूल होणार नव्हते. त्यामुळे बराखीतील कांदा बाहेर काढून तो बाजारात विक्रीसाठी नेण्यास शेतकरी उत्सुक नव्हता. बाजारभावाअभावी कांदा शेतकऱ्यांनी बराखीतच सोडून दिला आहे. बराखीतील कांद्याला सुरुवातीला कोंब आले. हळूहळू तो सडू लागला आहे. कांद्याच्या बराखीतून दुर्गंधीयुक्त पाणी वाहात आहे. सडलेल्या कांद्याची दुर्गंधी पसरू लागली आहे. (वार्ताहर) >सध्या नवीन कांदा बाजारात विक्रीसाठी आला आहे. कांद्याला १० किलोला ५० ते ७० रुपये बाजारभाव मिळतोय. गुलटी २५ ते ४०, तर बदला कांदा १५ ते २५ रुपये १० किलो या भावाने विकला जातोय. हा भाव शेतकऱ्यांना परवडणारा नाही. शिवाय यावर्षीचे वातावरण कांदा पिकासाठी पोषक आहे. त्यामुळे भविष्यात कांदा पिकाचे बाजारभाव वाढण्याची शक्यता कमी आहे.