शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

बाप्पांचे आगमन झाले सुखावह

By admin | Updated: September 2, 2014 00:07 IST

गणपती बाप्पांचे आगमन म्हणजे ढोल, ताशांचा दणदणाट आणि त्याला मिळणा:या कानठळ्या बसवेल अशा बॅन्जोची जोड हे समीकरण ठरलेले होते.

ठाणो : गणपती बाप्पांचे आगमन म्हणजे ढोल, ताशांचा दणदणाट आणि त्याला मिळणा:या कानठळ्या बसवेल अशा बॅन्जोची जोड हे समीकरण ठरलेले होते. बाप्पा जरी मनोवेधक, आकर्षक असले, त्यांचे आगमन सुखावह वाटत असले तरी त्यांच्यासोबत असलेला हा वाद्यांचा दणदणाट आणि खणखणाट मात्र भक्तांना असह्य व्हायचा. परंतु, या वेळी मात्र कायद्याच्या बडग्यामुळे व पोलिसांच्या जागरूकतेमुळे हे प्रकार यंदा ब:याच अंशी टाळता आलेत. त्याला अनेक मंडळांच्या सुजाण पदाधिका:यांनी दिलेली साथदेखील कारणीभूत ठरली, त्यामुळेच यंदाचे बाप्पांचे आगमन जोषात परंतु शांततेत घडून आले. त्याबद्दल गणोशभक्तही समाधान व्यक्त करीत आहेत. 
गणोशोत्सव मंडळांमध्ये जशी मूर्तीच्या उंचीची, सजावटीची व मंडपाच्या भव्यतेची स्पर्धा असते. तशीच स्पर्धा त्यांच्या बाप्पाचे आगमन जास्तीतजास्त दणदणाटात करण्याची असते. मग, त्यासाठी एकाने नाशिकचा प्रसिद्ध ढोल मागविला की, दुसरे मंडळ कर्णकर्कश ताशा मागवायचे तर कुणी जबरदस्त दणदणाट करणारे डीजे आणून त्याला बॅन्जोची जोड द्यायचे. 45 डेसिबल ही मानवी श्रवणशक्तीची कमाल मर्यादा असतानाही 3क्क् ते 4क्क् कधी-कधी त्यापेक्षाही अधिक डेसिबल्सचा दणदणाट घडवणारे डीजे असह्य व्हायचे. ज्या परिसरातून अशी मिरवणूक जायची, तेथील घरांच्या काचा, भांडी, इतर सामान व्हायब्रेट व्हायचे, कधी पडायचे तर ज्यांना ते असह्य व्हायचे, असे भक्त मिरवणुकीतील मूर्तीचे दर्शन होताच दारे, खिडक्या बंद करून घेणो अधिक पसंत करायचे. ज्या ठिकाणी मिरवणूक थांबायची, तिथल्या दुकानदार आणि रहिवाशांवर तसेच पादचा:यांवर कानात कापसाचे बोळे किंवा हाताची बोटे घालण्याची वेळ यायची. या सगळ्या धांगडधिंग्याला कोण आणि कधी आळा घालणार, हा प्रश्न नागरिकांच्या व भक्तांच्या मनात घोंघावत असतानाच न्यायालयानेच पुढाकार घेऊन हा प्रश्न ऐरणीवर आणला आणि आदेश देऊन तो सोडवलाही, मात्र त्याची अंमलबजावणी पोलीस कितपत करू शकतील, अशी शंका सगळ्यांना होती. परंतु, ती पोलिसांनी अनेक मंडळांच्या कार्यकत्र्याना विश्वासात घेतल्याने तिचे निरसन झाले व आदेशाची अंमलबजावणीही शिक्षेच्या भीतीनेच नव्हे तर समन्वय आणि संवादातूनही होऊ शकते, हे दिसून आले.
काही मंडळांच्या कार्यकत्र्यानी सांगितले की, न्यायालयाचा मान राखण्यासाठी व पोलिसांना सहकार्य करण्यासाठी तसेच मिरवणुकीत विघ्न येऊ नये म्हणून आम्ही स्वेच्छेनेच यंदा शांततामय अशी मिरवणूक काढण्याचे ठरविले होते. 
गणरायाच्या स्थापनेपासून ते विसजर्नार्पयत मंडपात वापरल्या जाणा:या ध्वनिक्षेपकाच्या आवाजाची पातळीही यंदा खूपच सुसह्यआहे. ब:याच मंडळांनी केवळ आरतीपुरताच त्याचा वापर केला. त्यामुळे बाप्पांचे आगमन आणि त्याचे वास्तव्य अधिक सुखावह आणि सुसह्यझाले आहे.
 
गणोश मंडळांनी ध्वनिप्रदूषण न करता आवाजाची मर्यादा पाळण्याचे आवाहन मंडळाची बैठक घेऊन केले होते. सर्वच नियम काटेकोर पाळणा:यांना बक्षिसेही देण्यात येणार आहेत. त्यानुसार, अनेक मंडळांनी ही मर्यादा पाळण्याचे मान्यही केल्यानुसार ते आता ध्वनिप्रदूषण करीत नसल्याचे आढळून आले आहे.
- व्ही.व्ही. लक्ष्मीनारायण, सहपोलीस आयुक्त, ठाणो शहर