शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

बाप्पांचे आगमन झाले सुखावह

By admin | Updated: September 2, 2014 00:07 IST

गणपती बाप्पांचे आगमन म्हणजे ढोल, ताशांचा दणदणाट आणि त्याला मिळणा:या कानठळ्या बसवेल अशा बॅन्जोची जोड हे समीकरण ठरलेले होते.

ठाणो : गणपती बाप्पांचे आगमन म्हणजे ढोल, ताशांचा दणदणाट आणि त्याला मिळणा:या कानठळ्या बसवेल अशा बॅन्जोची जोड हे समीकरण ठरलेले होते. बाप्पा जरी मनोवेधक, आकर्षक असले, त्यांचे आगमन सुखावह वाटत असले तरी त्यांच्यासोबत असलेला हा वाद्यांचा दणदणाट आणि खणखणाट मात्र भक्तांना असह्य व्हायचा. परंतु, या वेळी मात्र कायद्याच्या बडग्यामुळे व पोलिसांच्या जागरूकतेमुळे हे प्रकार यंदा ब:याच अंशी टाळता आलेत. त्याला अनेक मंडळांच्या सुजाण पदाधिका:यांनी दिलेली साथदेखील कारणीभूत ठरली, त्यामुळेच यंदाचे बाप्पांचे आगमन जोषात परंतु शांततेत घडून आले. त्याबद्दल गणोशभक्तही समाधान व्यक्त करीत आहेत. 
गणोशोत्सव मंडळांमध्ये जशी मूर्तीच्या उंचीची, सजावटीची व मंडपाच्या भव्यतेची स्पर्धा असते. तशीच स्पर्धा त्यांच्या बाप्पाचे आगमन जास्तीतजास्त दणदणाटात करण्याची असते. मग, त्यासाठी एकाने नाशिकचा प्रसिद्ध ढोल मागविला की, दुसरे मंडळ कर्णकर्कश ताशा मागवायचे तर कुणी जबरदस्त दणदणाट करणारे डीजे आणून त्याला बॅन्जोची जोड द्यायचे. 45 डेसिबल ही मानवी श्रवणशक्तीची कमाल मर्यादा असतानाही 3क्क् ते 4क्क् कधी-कधी त्यापेक्षाही अधिक डेसिबल्सचा दणदणाट घडवणारे डीजे असह्य व्हायचे. ज्या परिसरातून अशी मिरवणूक जायची, तेथील घरांच्या काचा, भांडी, इतर सामान व्हायब्रेट व्हायचे, कधी पडायचे तर ज्यांना ते असह्य व्हायचे, असे भक्त मिरवणुकीतील मूर्तीचे दर्शन होताच दारे, खिडक्या बंद करून घेणो अधिक पसंत करायचे. ज्या ठिकाणी मिरवणूक थांबायची, तिथल्या दुकानदार आणि रहिवाशांवर तसेच पादचा:यांवर कानात कापसाचे बोळे किंवा हाताची बोटे घालण्याची वेळ यायची. या सगळ्या धांगडधिंग्याला कोण आणि कधी आळा घालणार, हा प्रश्न नागरिकांच्या व भक्तांच्या मनात घोंघावत असतानाच न्यायालयानेच पुढाकार घेऊन हा प्रश्न ऐरणीवर आणला आणि आदेश देऊन तो सोडवलाही, मात्र त्याची अंमलबजावणी पोलीस कितपत करू शकतील, अशी शंका सगळ्यांना होती. परंतु, ती पोलिसांनी अनेक मंडळांच्या कार्यकत्र्याना विश्वासात घेतल्याने तिचे निरसन झाले व आदेशाची अंमलबजावणीही शिक्षेच्या भीतीनेच नव्हे तर समन्वय आणि संवादातूनही होऊ शकते, हे दिसून आले.
काही मंडळांच्या कार्यकत्र्यानी सांगितले की, न्यायालयाचा मान राखण्यासाठी व पोलिसांना सहकार्य करण्यासाठी तसेच मिरवणुकीत विघ्न येऊ नये म्हणून आम्ही स्वेच्छेनेच यंदा शांततामय अशी मिरवणूक काढण्याचे ठरविले होते. 
गणरायाच्या स्थापनेपासून ते विसजर्नार्पयत मंडपात वापरल्या जाणा:या ध्वनिक्षेपकाच्या आवाजाची पातळीही यंदा खूपच सुसह्यआहे. ब:याच मंडळांनी केवळ आरतीपुरताच त्याचा वापर केला. त्यामुळे बाप्पांचे आगमन आणि त्याचे वास्तव्य अधिक सुखावह आणि सुसह्यझाले आहे.
 
गणोश मंडळांनी ध्वनिप्रदूषण न करता आवाजाची मर्यादा पाळण्याचे आवाहन मंडळाची बैठक घेऊन केले होते. सर्वच नियम काटेकोर पाळणा:यांना बक्षिसेही देण्यात येणार आहेत. त्यानुसार, अनेक मंडळांनी ही मर्यादा पाळण्याचे मान्यही केल्यानुसार ते आता ध्वनिप्रदूषण करीत नसल्याचे आढळून आले आहे.
- व्ही.व्ही. लक्ष्मीनारायण, सहपोलीस आयुक्त, ठाणो शहर