शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रा जिथे जिथे जाऊन आली तिथे तिथे पाकिस्तानचे ऑपरेशन सिंदूरवेळी हल्ले? गोल्डन टेंपल, पठाणकोट अन् काश्मीर...
2
"बिहार निवडणुकीसाठी भाजपाची खेळी..."; पहलगाम हल्ल्यावर काय म्हणाले यशवंत सिन्हा?
3
“मुंबईकर उद्धव ठाकरेंना त्यांची जागा दाखवतील, मविआच्या ५० जागाही येणार नाही”; भाजपाचा दावा
4
सुरक्षा दलांकडून नक्षलवाद्यांवर आणखी एक मोठा प्रहार, चकमकीत २६ नक्षली ठार
5
तुर्की अन् अझरबैजानला धक्का; भारताने आर्मेनियासोबत केला आकाश 1-एस क्षेपणास्त्र करार
6
इंग्रजी फाडफाड येत नाही, प्रश्नच मिटला! तुम्ही बोला, गुगल समोरच्याला त्याच्या भाषेत ऐकवणार...
7
पूजा खेडकर हिला मोठा दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून अटकपूर्व जामीन मंजूर
8
Jyoti Malhotra : "पाकिस्तानात माझं लग्न करुन द्या"; ज्योती मल्होत्राचं अली हसनसोबतच व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल
9
सोनिया आणि राहुल गांधी यांना झाला १४२ कोटींचा फायदा, नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडीचा कोर्टात आरोप   
10
मुलांचं लग्न जमवताना एकमेकांच्या प्रेमात पडले व्याही आणि विहीण! लग्नासाठी कोर्टात पोहोचले पण... 
11
डॉक्टर की कसाई...! ५० जणांच्या हत्येनंतरही हात थरथरले नाहीत; अंगावर काटा आणणारी थरारक घटना
12
'एक नंबर तुझी कंबर' व्हायरल गाण्यावर नारकर कपलचा डान्स, व्हिएतनाममधून शेअर केला Video
13
Mumbai Rains: मुंबईत पावसाचा हाहाकार! पवईत झाड कोसळल्याने दोन जण जखमी, एकाची प्रकृती गंंभीर
14
'ऑपरेशन सिंदूर'बाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या प्रा. अली खानला अंतरिम जामीन मंजूर
15
बापरे! गर्लफ्रेंड आहे की डाकू, बॉयफ्रेंडला रस्त्यात अडवला, कपडे फाटेपर्यंत चप्पलने मारले; छातीवर बसून गळा ...
16
“SCचे टॉप ५ जज सुट्ट्यांमध्ये कामावर, तरी प्रलंबित याचिकांचे खापर आमच्यावर”; CJI गवई संतापले
17
Mangal Gochar 2025: जूनमध्ये कुंजकेतू योग संघर्ष वाढवणार, 'या' पाच राशींना अधिक सतर्क राहावे लागणार!
18
पाकिस्तानची वाटचाल लष्करी राजवटीच्या दिशेने...; असीम मुनीर बनले दुसरे फिल्ड मार्शल
19
सोनं पुन्हा १ लाखाच्या जवळ? चांदीही ३००० नी महागली, तुमच्या शहरातील दर काय?
20
"मला अभिनयही करायचा आहे...", अभिजीत सावंतने व्यक्त केली इच्छा, बिग बॉसनंतर पुन्हा मिळाली प्रसिद्धी

सुट्टीनंतर बँका आज उघडणार, 4 वेगवेगळ्या लागणार रांगा

By admin | Updated: November 15, 2016 09:38 IST

सोमवारच्या एक दिवसाच्या सुट्टीनंतर देशभरातील बँका आज पुन्हा नागरिकांच्या सेवेसाठी उघडणार आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 15 - सोमवारच्या एक दिवसाच्या सुट्टीनंतर देशभरातील बँका आज पुन्हा नागरिकांच्या सेवेसाठी उघडणार आहे. गुरू नानक यांच्या जयंतीमुळे सोमवारी देशभरातील बँक कर्मचा-यांना सुट्टी होती. बँका बंद असल्यामुळे एटीएमबाहेर नागरिकांनी तोबा गर्दी केली होती. सुट्टीचा संपूर्ण दिवस एटीएमबाहेर रांगा लावण्यात गेल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. नोटबंदीच्या निर्णयामुळे गेल्या चार दिवसांपासून बँका तसेच एटीएमबाहेर नोट बदलण्यासाठी तसेच पैसे काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. 
 
एक दिवसाच्या सुट्टीनंतर बँका उघडणार असल्याने मुंबईसह देशभरात नागरिकांनी पहाटेपासूनच बँका तसेच एटीएमबाहरे रांगा लावल्या आहेत. काही तर चक्क रात्रीपासूनच एटीएम, बँकाबाहेर बसून आहेत. दरम्यान, नागरिकांची मोठ्या प्रमाणात होणारी गर्दी पाहता बँक कर्मचा-यांनी चार वेगवेगळ्या रांगा करण्याचा निर्णय घेतला आहे. पैसे काढण्यासाठी, पैसे भरण्यासाठी, दिव्यांगांसाठी आणि वयोवृद्धांसाठी अशा चार रांगा बँकाबाहेर लावण्यात येणार आहेत. 
 
500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्यात आल्यानंतर सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनावर मोठ्या प्रमाणात परिणाम होत असल्याचे पाहायला मिळत आहे. नोटांच्या कमतरतेमुळे नागरिकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाकडून तात्पुरता काही होईना, पण नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर कोणत्याही एटीएममधून पैसे काढल्यास त्यावर चार्ज लागणार नसल्याचे आरबीआयने स्पष्ट केले आहे. 
बँक, एटीएममधील निर्बंध शिथील 
दरम्यान, नोटबंदीच्या निर्णयानंतर बँक खात्यातून 4000 रुपये काढण्याचे निर्बंध लावण्यात आले होते. मात्र, आता काही प्रमाणात निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. त्यामुळे दिवसाला 4,000 रुपयांऐवजी 4,500 रुपये काढता येऊ शकतात.  तसेच एटीएममधूनदेखील 2,000 रुपयांऐवजी 2,500 रुपयांची रक्कम काढता येणार आहे. यासंदर्भात अर्थ मंत्रालयाने बँकांना आदेश दिले असून, आजपासून त्याची अंमलबजावणी होणार आहे. 
 
 
एसटी महामंडळाचा शेतक-यांना दिलासा
नोटांच्या कमतरतेमुळे एसटी महामंडळाने शेतक-यांना विनाशुल्क भाजीपाला एसटीमधून नेण्यास मंजुरी दिली आहे. 50 किलोपर्यंत भाजीपाला शेतक-यांनी एसटीतून विनाशुल्क नेता येणार आहे.  
 
(भाजीपाल्याची एसटीतून विनाशुल्क वाहतूक)
 
सर्व विमानतळावरील पार्किंग मोफत
तसेच,देशभरातील सर्व विमानतळांवर 21 नोव्हेंबरपर्यंत पार्किंग मोफत करण्यात आली आहे. यामुळे थोड्या प्रमाणात का होईन पण सर्वसामान्यांना दिलासा मिळला आहे.