शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
2
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
3
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
4
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
5
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
6
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
7
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
8
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
10
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
11
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
12
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
13
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
14
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
15
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
16
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
17
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
18
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
19
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
20
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
Daily Top 2Weekly Top 5

लूट रोखण्याची जबाबदारी बँकांचीही!:दीपाली काळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2017 22:44 IST

‘सीसीटीव्ही’सह रखवालदार नियुक्तीच्या आदेशाला कोलदांडा

गेल्या काही वर्षांपासून बँकेतून रोकड काढून बाहेर पडणाऱ्या ग्राहकांना लुटण्याच्या घटना सांगली शहरात सातत्याने घडत आहेत. अवघ्या काही सेकंदात ग्राहकांचा खिसा रिकामा होत आहे. चारच दिवसांपूर्वी मिरजेत भरदिवसा बँकेची ३० लाखांची रोकड लुटण्यात आली. याला जबाबदार कोण? गुन्हा घडल्यानंतर पोलिस येताच तपास सुरु करतात. पण गुन्हेगार ज्या बँकांत गुन्हा करण्यासाठी ‘रेकी’ करतात; त्या बँकांनी काय उपाययोजना केल्या आहेत का? अशाप्रकारचे गुन्हे करणारे गुन्हेगार कोण आहेत? या घटना रोखण्यासाठी पोलिसांकडून काय प्रयत्न सुरु आहेत? ठराविक बँकांच्या परिसरातच अशा घटना घडत असल्याने, बँकांनी काय करायला हवे? याबद्दल सांगली शहर विभागाच्या पोलिस उपअधीक्षक डॉ. दीपाली काळे यांच्याशी साधलेला हा थेट संवाद... प्रश्न : बँकांची रक्कम भरदिवसा लुटली जात असल्याने, याची जबाबदारी कोणाची?उत्तर : बँक, पोस्ट कार्यालय, एटीएम या तीन ठिकाणी प्रामुख्याने ग्राहकांवर ‘वॉच’ ठेवून त्यांच्याकडील रक्कम लुटली जात आहे. या लुटीला संबंधित ग्राहक, बँक, पोस्ट व पोलिस हे चारही घटक जबाबदार आहेत. विशेषत: बँकांची खूप मोठी जबाबदारी आहे. घडलेल्या गुन्ह्याचा तपास करण्यास पोलिस समर्थ आहेत. मात्र बँका व ग्राहकांनीही सुरक्षिततेच्यादृष्टीने सतर्क राहिले पाहिजे. प्रश्न : बँकांनी काय करायला हवे? उत्तर : ग्राहकांचे पैसे सुरक्षित राहावेत, यासाठी बँकेबाहेर, परिसरात व पार्किंगमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावले पाहिजेत. बँकेत रखवालदाराची नियुक्ती आहे. पण बँकेच्या परिसरात आणखी एका रखवालदाराची नेमणूक केली पाहिजे. जेणेकरुन हा रखवालदार बँकेत येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या संशयास्पद हालचाली टिपू शकेल. याशिवाय बँकेत ग्राहकांमध्ये एखाद्या कर्मचाऱ्याची नियुक्ती करावी. चोरटे हे नेहमी ‘रेकी’ करुनच ग्राहकांना लुटतात. एखादी स्लिप घेऊन ती भरण्याचे ते नाटक करतात. मात्र त्यांचे सर्व लक्ष ग्राहकांकडे असते. चोरटे दिवसातून अनेकदा बँकेत जातात. ही बाब रखवालदार व कर्मचाऱ्याच्या लक्षात आली, तर संशयित चोरट्यास पकडता येऊ शकते. त्यामुळे पुढील गुन्ह्यांना आळा बसविण्यात यश मिळेल. बँक अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना हे उपाय सुचविले आहेत. तरीही त्यांनी याची अंमलबजावणी केलेली नाही. एटीएममध्ये पैसे भरण्यास खासगी कंपन्यांना ठेका दिला जातो. हे ठेकेदार स्थानिक लोकांची नियुक्ती करुन त्यांना पैसे भरण्याचे काम देतात. दररोज लाखो रुपये त्यांच्याकडे दिले जातात. हे खासगी कर्मचारी पैसे भरताना कोणतीही काळजी घेत नाहीत. परिणामी मिरजेसारखी घटना घडते. पैसे भरणाऱ्या कर्मचाऱ्यांनी कोट्यवधी रुपयांच्या रकमेवर डल्ला मारला आहे. यासाठी आता बँकेने एटीएममध्ये पैसे भरण्याची स्वत:चीच यंत्रणा उभी केली पाहिजे.प्रश्न : पोलिस यंत्रणा लुटीच्या गुन्ह्याचा तपास कसा करते?उत्तर : ठराविक बँकांच्या परिसरातच ग्राहकांना लुटले जात आहे. या बँकांबाहेर वेशातील पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला आहे. तसेच अशी एखादी घटना घडली, तर गस्ती पथक अवघ्या सात मिनिटात घटनास्थळी दाखल होते. चोरट्यांचा माग काढण्यासाठी तातडीने नाकाबंदी केली जाते. बँकेच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन तपास केला जातो. रेकॉर्डवरील गुन्हेगारांची चौकशी केली जाते. बँकेच्या रखवालदाराकडे चौकशी केली जाते. अशाप्रकारे घडलेल्या गुन्ह्यांचा छडा लावण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे प्रयत्न सुरु आहेत. त्यांना निश्चित यश येईल, असे वाटते. गेल्या तीन महिन्यात ‘चेनस्नॅचिंग’च्या अनेक गुन्ह्यांचा छडा लावण्यात यश आले आहे.प्रश्न : ग्राहकांनी काय काळजी घ्यावी?उत्तर : बँकेतून दहा हजाराची रक्कम काढायची असली तरी ग्राहकांनी काळजी घ्यावी. मोठी रक्कम काढायची असेल तर त्यांनी सोबत कुणाला तरी घ्यावे. रक्कम ठेवण्यासाठी बॅग घ्यावी. बँकेत एखादी व्यक्ती संशयाने पाहत असल्याचे दिसून आले, तर तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा. आपला कोणी तरी पाठलाग करीत असल्यास, ते लक्षात आले पाहिजे.- सचिन लाड, सांगली