शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
2
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
3
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
4
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे 29 महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
5
Car 360 Degree Camera: कारमध्ये ३६० डिग्री कॅमेरा असणं किती फायद्याचं? नेमकं कसं आणि काय काम करतो?
6
Mumbai: खड्ड्यात दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू, पण पोलिसांनी मृतावरच नोंदवला गुन्हा!
7
"आम्ही काही मैत्रिणी नाही आहोत...", लारा दत्तासोबत काम केल्यावर रिंकू राजगुरुची प्रतिक्रिया
8
Supriya Sule: "धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले तर...", खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा!
9
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
10
अर्टिगाचे काही खरे नाही...! ७-सीटर 'ग्रॅव्हाईट' लाँच होणार, ६ लाखांत मिळणार हाय-टेक फीचर्स...
11
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
12
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
13
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
14
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
15
Bike Taxi: मुंबईत बाईक टॅक्सी बंद होणार? रॅपिडो, ओला, उबेरवर कारवाईची टांगती तलवार!
16
"हा माझा शेवटचा Video, मला जबरदस्तीने..."; रशिया-युक्रेन युद्धात अजयचा मृत्यू; पालकांचा टाहो
17
Success Story: आठवीपर्यंत शिक्षण ते ८,००० कोटींचे मालक! जबलपूरच्या सतीश सनपाल यांचा 'बुर्ज खलिफा'पर्यंतचा थक्क करणारा प्रवास
18
भारताच्या 'या' मित्र राष्ट्रात मुस्लीमांची संख्या वेगाने वाढतेय; २०३० पर्यंत हा आकडा जवळपास...
19
२०२६ ची गोड सुरुवात! CNG आणि घरगुती गॅसच्या किमती कमी होणार, किती पैसे वाचणार?
20
मार्गशीर्ष अमावस्या २०२५: १९ डिसेंबरला तळहातावर काढा 'फुली', नशिबाची दारं होतील खुली!
Daily Top 2Weekly Top 5

पीक विम्याच्या रकमेला बँकांची कात्री

By admin | Updated: August 10, 2015 22:57 IST

नवीन कर्जाची रक्कम विम्यातून कपात; शेतकरी थेट लाभापासून वंचित.

संतोष येलकर/अकोला: दुष्काळी परिस्थितीत शेतकर्‍यांच्या पीक कर्जाचे पाच वर्षांसाठी पुनर्गठन करण्यात आले; मात्र पुनर्गठन करून, यावर्षी नवीन पीक कर्ज देण्यात आलेल्या शेतकर्‍यांच्या कर्जात पीक विम्याची रक्कम बँकांकडून जमा केली जात आहे. त्यामुळे शेतकर्‍यांच्या पीक कर्जाचे पुनर्गठन करण्यात आले असले तरी, कर्जाची रक्कम जमा करण्यासाठी, पीक विम्याच्या रकमेला बँकांनी कात्री लावली आहे. विमा रकमेतून कर्जाची कपात करण्यात येत असल्याने, आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांवर पीक विम्याच्या थेट लाभापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. गतवर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने पिके हातून गेली. नापिकीमुळे विदर्भ आणि मराठवाड्यासह राज्यातील विविध भागात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकरी हवालदिल झाला. या पृष्ठभूमीवर गतवर्षी पीक कर्ज घेतलेल्या शेतकर्‍यांच्या पीक कर्जाचे पाच वर्षांसाठी पुनर्गठन करून, कर्जदार शेतकर्‍यांना यावर्षीच्या खरीप हंगामात नवीन कर्ज उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य शासनामार्फत घेण्यात आला. त्यानुसार राज्यातील पीक कर्ज घेतलेल्या शेतकर्‍यांच्या कर्जांचे पुनर्गठन करून, त्यांना नवीन कर्ज उपलब्ध करण्याचे काम बँकांमार्फत करण्यात आले. दरम्यान, राष्ट्रीय कृषी विमा योजनेंतर्गत पिकांचा विमा उतरविलेल्या शेतकर्‍यांठी पीक विम्याची रक्कम शासनामार्फत मंजूर करण्यात आली. ही पीक विम्याची रक्कम गत जुलैअखेरपर्यंत राष्ट्रीय कृषी विमा कंपनीमार्फत राज्यातील प्रत्येक जिल्हय़ात वितरित करण्यात आली. त्यामध्ये अमरावती विभागातील अकोला, अमरावती, वाशिम, बुलडाणा व यवतमाळ इत्यादी पाचही जिल्हय़ातील शेतकर्‍यांसाठी पीक विम्यापोटी ४२१ कोटी ९ लाखांची रक्कम प्राप्त झाली. प्राप्त झालेली पीक विम्याची रक्कम संबंधित शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी बँकांना वितरित करण्यात आली; परंतु पीक कर्जाचे पुनर्गठन करून, नवीन पीक देण्यात आलेल्या शेतकर्‍यांची पीक विम्याची रक्कम बँकांकडून कर्जाच्या रकमेत जमा केली जात आहे. पीक विम्याची रक्कम यावर्षीच्या पीक कर्जापोटी बँकांकडून कपात केली जात असल्याने, नापिकीच्या परिस्थितीत पीक विमा रकमेच्या थेट लाभापासून वंचित राहण्याची वेळ शेतकर्‍यांवर आली आहे. जिल्हा अग्रणी बँक चे व्यवस्थापक तुकाराम गायकवाड यांनी पीक कर्जाचे पुनर्गठन करून, ज्या शेतकर्‍यांना यावर्षी नवीन कर्ज देण्यात आले,अशा शेतकर्‍यांच्या पीक विम्याची रक्कम पुनर्गठित कर्जाच्या रकमेत जमा करण्याच्या रिझर्व बँकेच्या सूचना असल्याचे सांगीतले. त्यानुसार पीक कर्जाचे पुनर्गठन करून, नवीन कर्ज देण्यात आलेल्या शेतकर्‍यांच्या पीक विम्याची रक्कम पुनर्गठित कर्जामध्ये जमा केली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.