शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार
2
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
3
Rohini Khadse-Khewalkar : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया
4
मुलांच्या शिक्षणाचं टेन्शन? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देणार हमखास परतावा आणि टॅक्समध्ये सूट!
5
सगळेच बीएसएनएलमध्ये पोर्ट करतील! ९०० रुपयांच्या आत आणले सहा महिन्यांचे रिचार्ज, Jio-Airtel तर...
6
श्रीमंत बनण्याचा फॅार्म्युला, फक्त बदला या ५ सवयी; महिन्याला वाचवा १० हजार, लोकंही विचारतील कशी झाली 'ही' जादू
7
Barabanki Awshaneshwar Temple Stampede : माकडांनी उड्या मारल्या, तार तुटली अन्...; अवसानेश्वर महादेव मंदिरात कशी झाली चेंगराचेंगरी?
8
"सेटवर ते मस्ती करायचे पण मी...", अशोक सराफ यांनी सांगितला 'करण अर्जुन'चा किस्सा
9
शिंदेसेनेच्या मंत्र्यांना बदनाम करण्याचा कट रचला जातोय का?; रामदास कदमांनी व्यक्त केली शंका
10
आमिर खानच्या घरी पोहचले २५ आयपीएस अधिकारी, चाहते पडले चिंतेत, म्हणाले - "रेड पडली आहे का?"
11
Share Market Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; Sensex २६० अंकांनी घसरला, 'हे' स्टॉक्स आपटले
12
कुणाची किती ताकद हे कळू द्या, एकटे लढून दाखवा; भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेनेला आव्हान?
13
बाराबंकीच्या अवसानेश्वर महादेव मंदिरात चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, ४० जण जखमी
14
रेपो रेट कपातीचा फायदा वाहन कर्जांना देत नाहीत; खासगी बँकांविरोधात फाडाची रिझर्व्ह बँकेकडे तक्रार
15
IND vs ENG : 'गंभीर' मुद्दा! गिलला कदाचित कुलदीपला खेळवायचे होते, पण... गावसकरांचा रोख कुणाकडे?
16
"योगीजी, या लोकांना सोडू नका"; कॉन्स्टेबलच्या पत्नीचा सासरच्यांकडून अमानुष छळ, संपवलं जीवन
17
"तू सिंगल आहेस का?" रिंकू राजगुरूला चाहत्याचा प्रश्न, अभिनेत्रीने रिलेशनशिप स्टेटसच सांगितलं, म्हणाली...
18
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
19
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
20
ठाकरे बंधू पुन्हा भेटले, मनसे-उद्धवसेना युती चर्चांना उधाण; पक्षप्रवेशाचे इनकमिंग थंडावले

बंजारा भाषेला राष्ट्रीय दर्जा मिळावा!

By admin | Updated: February 8, 2016 02:41 IST

बंजारा भाषिक बांधवांचा साहित्य संमेलनात हुंकार.

डॉ. किरण वाघमारे /आत्माराम कनिराम राठोड साहित्यनगरी (वाशिम) : बंजारा भाषेत मौखिक साहित्याची समृद्ध पंरपरा आहे. या भाषेतील साहित्य हे अस्सल लोकजीवन दर्शविणारे आहे. त्याचे जतन होणे काळाची गरज आहे. बंजारा भाषेचा भारतीय घटनेच्या शेड्यूल आठमध्ये अंतर्भाव केला जाणे आवश्यक असून, या भाषेला राष्ट्रीय दर्जा मिळालाच पाहिजे, असा हुंकार देशभरातून आलेल्या समस्त बंजारा बांधवांनी रविवारी वाशिम येथील साहित्य संमेलनाच्या गोरपीठावरून केला. ऑल इंडिया बंजारा सेवा संघाच्यावतीने आयोजित पहिल्या अखिल भारतीय गोर बंजारा साहित्य संमेलनाचा रविवारी थाटात समारोप झाला. यावेळी घेण्यात आलेल्या ठरावात बंजारा भाषेला राष्ट्रीय दर्जा मिळावा, असा आग्रह सर्व मान्यवरांसह उपस्थित बंजारा बांधवांनी धरला. याप्रसंगी मंचावर संमेलनाध्यक्ष गबरूसिंह राठोड, स्वागताध्यक्ष डॉ. टी.सी. राठोड यांच्यासह समाजातील मान्यवर उपस्थित होते. समारोपीय कार्यक्रमात ठरावांचे वाचन करण्यात आले. भारतीय संविधानातील कलम क्रमांक २९ अंतर्गत ३५१ नुसार, भारतात विखुरलेला जो काही आदिवासी समाज आहे, त्यांची वेगळी भाषा व संस्कृती आहे. भाषा व संस्कृतीच्या संवर्धनचा घटनादत्तक अधिकार या समाजाला मिळवा, बंजारा बोलीभाषा जतन करण्यासाठी बंजारा साहित्य अकादमी व बंजारा साहित्य परिषद स्थापन करण्यात यावी, भारतीय घटनेच्या शेड्यूल आठमध्ये बंजारा भाषेचा अंतर्भाव करण्यात यावा, यूजीसीद्वारे भाषा संशोधन व संवर्धन करण्यात यावे, भारत सरकारद्वारे बंजारा साहित्यिकांचा देश व राज्य पातळीवर सन्मान केला जावा, बंजारा भाषा देवनागरी लिपीमध्ये अंतभरूत करावी, शेतकर्‍यांसाठी स्वामिनाथन आयोग स्थापन करावा, शालेय साहित्यात बंजारा साहित्याचा समावेश करावा तसेच स्व. रामसिंहजी भानावत यांच्या सुचनेनुसार बंजारा समाजाचा इतिहास व संशोधनासाठी विद्यापीठामध्ये अध्यासन केंद्र स्थापन करण्यात यावे आदी ठरावांचा यामध्ये समावेश आहे. या सर्वच ठरावांना बंजारा बांधवांनी टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला आणि सर्व मागण्या शासनाने मान्य कराव्या, असा आग्रह धरला.