शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
2
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
3
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
4
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
5
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
6
कथावाचक प्रदीम मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी, २ महिलांचा मृत्यू, अनेकजण जखमी   
7
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
8
Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू
9
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
10
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
11
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
12
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
13
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
14
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
15
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
16
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
17
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
18
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
19
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
20
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन

बांगरवाडीचा स्वयंभू गुप्त विठोबा

By admin | Updated: July 8, 2014 23:31 IST

आषाढी एकादशीनिमित्त दि. 9 रोजी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केल्याची माहिती विठ्ठल रुक्मिणी सेवा मंडळाचे अध्यक्ष नकाजी बांगर यांनी दिली.

प्रसाद आर्वीकर, परभणीमहाराष्ट्राला थोर साधू-संतांची परंपरा आहे़ संत ज्ञानेश्वरांपासून ते अलीकडे संत गाडगेबाबापर्यंतच्या अनेक संतांनी या भूमीत जन्म घेऊन समाजाला सतत जागृत ठेवून प्रगतीकडे जाण्याचा मार्ग दाखविला़ हीच परंपरा वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून सदासर्वकाळ अखंडपणे सुरू आहे़ मराठवाड्याला संतांची भूमी म्हटले जाते़ दरवर्षी आषाढी एकादशीनिमित्त लाखो वारकरी विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपूर येथील विठोबाचे दर्शन घेण्यासाठी पायी जातात़ धर्म आणि तत्वज्ञानाचे मूर्तीमंत प्रतिक असलेले संत ब्ऱ रंगनाथ महाराज परभणीकर यांचा जिल्ह्यात आणि राज्यात मोठा शिष्य परिवार असून, रंगनाथ महाराजांच्या पदस्पर्शाने परभणी नगरी पावन झाली आहे़ परभणी जिल्ह्याला संतांची नगरी म्हणून ओळखले जाते़ श्री रंगनाथ महाराज परभणीकर यांचा जन्म सोनपेठ येथे १८८९ मध्ये झाला़ त्यांच्या आईचे नाव मनुबाई तर आडनाव चिद्रवार असे होते़ बालपणीच आई, वडिलांचे छत्र हरवले़ प़पू़ रंगनाथ गुरुजींना लहान वयापासूनच देवधर्माची आवड असल्याने ते कथा, कीर्तन व प्रवचनासाठी मंदिरात जात़ त्यांचे ज्येष्ठ बंधू विठ्ठलभाऊ यांनी गुरुजींना आई, वडिलांची उणीव भासू दिली नाही़ ज्येष्ठ बंधूचा कपाशीचा व्यापार सांभाळत ते परमार्थही करू लागले़ परंतु, दुर्देवाने व्यापारात आर्थिक नुकसान सोसावे लागले़ तेव्हापासून त्यांनी कधीही हातात तराजू न घेण्याचे ठरविले़ रंगनाथ गुरुजी ब्रह्मचारी होते़ त्यांनी शिष्य निर्माण केले़ परंतु, स्वत:ची परंपरा निर्माण केली नाही़ त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन लोक कीर्तन, प्रवचन करतात़ रंगनाथ गुरुजींनी कधीही शिष्यास आसक्ती निर्माण केली नाही ते खरेखुरे मोक्षदानी गुरू होते़ सत्पुरुषाची जोड ही मोक्ष मार्गाला लावण्यासाठी असते़ लौकिक, व्यवहार जोडण्यासाठी नव्हे, ही पूर्ण समज त्यांनी शिष्यांना दिली़ जो मोक्ष देतो तोच सद्गुरु होय या अर्थाने गुरुजी हे खरेखुरे सद्गुरु होते़ सिद्ध पुरुष योगानंद यांचे शिष्य गंगाराम यांच्याकडून गुरुजींनी परमार्थातील प्राथमिक शिक्षण घेतले़ श्रेष्ठ हरिभक्त व निष्ठावंत वारकरी निवृत्ती बुवा यांच्या हातून गुरुजींनी तुलसीमाला धारण केली व वारकरी सांप्रदायात प्रवेश केला़ प़प़ श्री शंकरानंद सरस्वती स्वामी यांच्याकडे रंगनाथ महाराजांनी विचारसागर व वृत्ती प्रभाकर या गुढ व आघाध तत्वज्ञान दर्शक ग्रंथाचा अभ्यास केला व त्यांच्याच आज्ञेवरून ते आळंदीत साखरे महाराजांच्या साधकाश्रमात आले़ येथून पुढे प्रवचन, कीर्तनाच्या माध्यमातून राज्यभर संत धर्माचे जनजागरण व ज्ञानप्रबोधन त्यांनी केले़ अढळ गुरुनिष्ठा, वेदांतावरील निष्ठा व वारकरी सांप्रदायावरील त्यांची निष्ठा उच्चकोटीची होती़ संसारी लोकांना परमार्थी बनविण्याचे महान कार्य त्यांनी केले़ त्यामुळेच रंगनाथ महाराज हे धर्म व तत्वज्ञानाचे मूर्तीमंत प्रतिक ठरतात.