शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

बंधारा फुटला: गावकरी तीन तास छतावर

By admin | Updated: September 27, 2016 19:56 IST

इमामपूर येथील बंधारा फुटल्याने मंगळवारी सायंकाळी वांगी, शिवणी या गावांमध्ये पाणी शिरले.

ऑनलाइन लोकमतबीड, दि. 27 - मुसळधार पावसानंतर ओव्हरफ्लो झालेला तालुक्यातील इमामपूर येथील बंधारा फुटल्याने मंगळवारी सायंकाळी वांगी, शिवणी या गावांमध्ये पाणी शिरले. तब्बल तीन तास दोन्ही गावांचा संपर्क तुटला होता. जीव मुठीत धरुन दोन्ही गावचे लोक मुलाबाळांसह घरांच्या छतावर जाऊन बसले होते. याचवेळी पावसानेही जोरदार हजेरी लावली. त्यामुळे पाण्याच्या प्रवाहात भरच पडली. सायंकाळी सात वाजेनंतर पूरस्थिती नियंत्रणात आली असून पाणी ओसरण्यास सुरुवात झाली आहे.बीडपासून २० किमी अंतरावर असलेल्या इमामपूर या डोंगरपट्ट्यातील गावाजवळ १५ वर्षांपूर्वी बंधारा बांधण्यात आला होता. हा तलाव सततच्या दुष्काळामुळे तीन वर्षे कोरडाठाक होता. यंदा मुसळधार पावसाने तो भरून वाहू लागला. दरम्यान, सायंकाळी साडेचार वाजता बंधाऱ्याला भगदाड पडले. त्यातून धो- धो पाणी बाहेर पडू लागले. बंधारा फुटल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. इमामपुर येथील टुकूर नदीपात्राने अल्पावधीत रौद्ररुप धारण केले. नदीतून पाणी वांगी, शिवणी या गावांकडे वेगाने झेपावू लागले. इमामपूर येथेही यामुळे गोंधळ उडाला. त्यानंतर ग्रामस्थांनी सुरक्षितस्थळी धाव घेतली. इमामपूर हे उंचीवर वसलेले असून वांगी, शिवणी ही गावे पायथ्याला आहेत. त्यामुळे इमामपूरपेक्षा या दोन गावांना मोठे नुकसान सहन करावे लागले.  टुकूर नदी या दोन्ही गावांमधून गेलेली आहे. पाण्याचा प्रवाह इतका वेगात होता की, पाणी नदीपात्र सोडून जमिनींतून वाहू लागले. एवढ्यात पावसानेही जोरदार हजेरी लावली. त्यामुळे बंधाऱ्यातील पाण्यात पावसाच्या पाण्याची भर पडली. २३०० लोकसंख्या वांगी येथे जि.प. शाळेच्या जवळून पाणी थेट गावात आले. त्यानंतर गावकरी धास्तावले. अनेकांनी भीतीने आपल्या कुटुंबियांसह घराच्या छतावर जाऊन बसणे पसंद केले, तर काही जण झाडावर बसले होते. गावात चोहीकडे पाण्याचा वेढा पडला होता. नदीपात्राजवळील जमिनींतून पाणी वाहिले. बाजरी, सोयाबीन, कापूस, तूर या पिकांसोबत जमीनही वाहून गेली. त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. शिवणीतही याहून वेगळी स्थिती नव्हती. तेथेही संपूर्ण गावाला पाण्याने वेढले होते. शिवणीची लोकसंख्या १७०० असून या गावातील शेतकऱ्यांच्या जमिनीही पाण्यासोबत वाहून गेल्या. गावातील जि.प. शाळेपर्यंत पाण्याचा लोंढा आला होता. विजय सुपेकर, बाळासाहेब डोळस, गणेश शिंदे, अशोक शिंदे, जीवन शिंदे आदींनी गावकऱ्यांना सुरक्षित स्थळी  उंचावर असलेल्या घरांमध्ये हलवले.