शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

बंधारा फुटला: गावकरी तीन तास छतावर

By admin | Updated: September 27, 2016 19:56 IST

इमामपूर येथील बंधारा फुटल्याने मंगळवारी सायंकाळी वांगी, शिवणी या गावांमध्ये पाणी शिरले.

ऑनलाइन लोकमतबीड, दि. 27 - मुसळधार पावसानंतर ओव्हरफ्लो झालेला तालुक्यातील इमामपूर येथील बंधारा फुटल्याने मंगळवारी सायंकाळी वांगी, शिवणी या गावांमध्ये पाणी शिरले. तब्बल तीन तास दोन्ही गावांचा संपर्क तुटला होता. जीव मुठीत धरुन दोन्ही गावचे लोक मुलाबाळांसह घरांच्या छतावर जाऊन बसले होते. याचवेळी पावसानेही जोरदार हजेरी लावली. त्यामुळे पाण्याच्या प्रवाहात भरच पडली. सायंकाळी सात वाजेनंतर पूरस्थिती नियंत्रणात आली असून पाणी ओसरण्यास सुरुवात झाली आहे.बीडपासून २० किमी अंतरावर असलेल्या इमामपूर या डोंगरपट्ट्यातील गावाजवळ १५ वर्षांपूर्वी बंधारा बांधण्यात आला होता. हा तलाव सततच्या दुष्काळामुळे तीन वर्षे कोरडाठाक होता. यंदा मुसळधार पावसाने तो भरून वाहू लागला. दरम्यान, सायंकाळी साडेचार वाजता बंधाऱ्याला भगदाड पडले. त्यातून धो- धो पाणी बाहेर पडू लागले. बंधारा फुटल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. इमामपुर येथील टुकूर नदीपात्राने अल्पावधीत रौद्ररुप धारण केले. नदीतून पाणी वांगी, शिवणी या गावांकडे वेगाने झेपावू लागले. इमामपूर येथेही यामुळे गोंधळ उडाला. त्यानंतर ग्रामस्थांनी सुरक्षितस्थळी धाव घेतली. इमामपूर हे उंचीवर वसलेले असून वांगी, शिवणी ही गावे पायथ्याला आहेत. त्यामुळे इमामपूरपेक्षा या दोन गावांना मोठे नुकसान सहन करावे लागले.  टुकूर नदी या दोन्ही गावांमधून गेलेली आहे. पाण्याचा प्रवाह इतका वेगात होता की, पाणी नदीपात्र सोडून जमिनींतून वाहू लागले. एवढ्यात पावसानेही जोरदार हजेरी लावली. त्यामुळे बंधाऱ्यातील पाण्यात पावसाच्या पाण्याची भर पडली. २३०० लोकसंख्या वांगी येथे जि.प. शाळेच्या जवळून पाणी थेट गावात आले. त्यानंतर गावकरी धास्तावले. अनेकांनी भीतीने आपल्या कुटुंबियांसह घराच्या छतावर जाऊन बसणे पसंद केले, तर काही जण झाडावर बसले होते. गावात चोहीकडे पाण्याचा वेढा पडला होता. नदीपात्राजवळील जमिनींतून पाणी वाहिले. बाजरी, सोयाबीन, कापूस, तूर या पिकांसोबत जमीनही वाहून गेली. त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. शिवणीतही याहून वेगळी स्थिती नव्हती. तेथेही संपूर्ण गावाला पाण्याने वेढले होते. शिवणीची लोकसंख्या १७०० असून या गावातील शेतकऱ्यांच्या जमिनीही पाण्यासोबत वाहून गेल्या. गावातील जि.प. शाळेपर्यंत पाण्याचा लोंढा आला होता. विजय सुपेकर, बाळासाहेब डोळस, गणेश शिंदे, अशोक शिंदे, जीवन शिंदे आदींनी गावकऱ्यांना सुरक्षित स्थळी  उंचावर असलेल्या घरांमध्ये हलवले.