शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
6
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
7
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
8
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
9
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
10
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
11
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
12
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
13
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
14
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
15
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
16
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
17
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
18
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
19
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
20
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
Daily Top 2Weekly Top 5

‘बंदिस्त जलवाहिनी’ अधांतरीच!

By admin | Updated: May 30, 2016 01:45 IST

आॅगस्ट क्रांतिदिनी मावळाच्या भूमीत पाण्यासाठी रक्त सांडले. तीन शेतकऱ्यांचे बळी गेले.

पिंपरी : आॅगस्ट क्रांतिदिनी मावळाच्या भूमीत पाण्यासाठी रक्त सांडले. तीन शेतकऱ्यांचे बळी गेले. पवना बंदिस्त जलवाहिनीचा प्रकल्प स्थगित करण्यात आला. त्यानंतर चार वर्षे उलटून गेली, तरी प्रकल्प अधांतरीच आहे. आतापर्यंतचे १४७ कोटी पाण्यात गेले आहेत. पिंपरी-चिंचवडची जीवनदायिनी म्हणजेच पवना माय होय. मावळातील पवना धरणातून उद्योगनगरीला पाणीपुरवठा होता. धरणात असलेल्या १०.७६ टीएमसी साठ्यापैकी महापालिकेला ६.५५ टीएमसी पाणी आवश्यक होते. त्यानुसार पाटबंधारे विभागाने ४६७.६८ एमएलडी एवढा पाण्याचा कोटा मंजूर केला. या साठ्यास राज्य शासनानेही मंजुरी दिली. त्यानुसार सन २०३१पर्यंत २९ लाख ७ हजार ७५७ लोकसंख्येनुसार पिंपरी-चिंचवड महापालिकेने कृती आराखडा केला. धरणाच्या जलाशयातून जॅकवेल व पम्प हाऊसद्वारे पाणी उचलून प्राधिकरणातील पेठ २३मधील टेकडीवरील बीपीटीमध्ये सोडण्यात येणार होते. बंदिस्त जलवाहिनीद्वारे पाणी नेऊ नये, म्हणून मावळवासीयांनी आंदोलन केले. आॅगस्ट क्रांतिदिनी (दि. ९ आॅगस्ट २०११) पुणे-मुंबई द्रुतगतीवर बऊर येथे गोळीबार झाला. मावळचा गोळीबार देशभर गाजला होता. संसदेत आणि विधानसभेत या प्रकरणाचे पडसाद उमटले होते. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही जलवाहिनीच्या कामास स्थगिती दिली होती. शासन व काँग्रेसच्या वतीने मदत केली. प्रकल्पास जैसे थे ठेवण्याचा आदेश देऊन एकसदस्यीय समिती नेमली होती. भाजपा कार्यकर्ते सरकारच्या विरोधात गेल्या दोन दिवसांपूर्वी कालव्यातून किंवा नदीतून पाणी सोडू नये, बंदिस्त वाहिनीद्वारे पाणी पुरवावे, असे धोरण भाजपा सरकारने स्वीकारल्याने मावळातील जलवाहिनी होणार की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. पवना बंदिस्त जलवाहिनीला मावळात भाजपाचा विरोध होता. भाजपाचे सरकार आल्यानंतर कार्यकर्त्यांवरील गुन्हे काढून घेतले जातील, पुनर्वसन होईल, अशी अपेक्षा मावळवासीयांना होती. मात्र, सरकारने वेगळा निर्णय दिल्याने मावळातील कार्यकर्ते पवना जलवाहिनी विरोधात सरकारच्या विरोधात उभे राहणार आहेत. काहीही झाले, तरी जलवाहिनी होऊ देणार नाही, ची भूमिका आहे. त्यामुळे सरकारसमोरील अडचणी वाढल्या आहेत. अधिकारी-ठेकेदार-पदाधिकारी यांची अभद्र युतीजमीन संपादनाची कार्यवाही पूर्ण न करताच कामाची निविदा काढली. ३० मार्च २००९ला निविदा काढली. प्रकल्पासाठी ३९७ कोटी ९३ लाख असा खर्च अपेक्षित होता. पहिल्या टप्प्याच्या कामास २३३.८५ कोटी खर्च अपेक्षित होता. काम पूर्ण होण्याची मुदत २९ मार्च २०१० होती. एनसीसी, एसएमसी इंदू या कंत्राटदारास निविदा दिली. पहिल्या टप्प्यातील रक्कम ठेकेदाराला तातडीने अदा केली गेली. चर खोदण्यापलीकडे फार काम झालेच नाही. आंदोलनामुळे हा प्रकल्प २ वर्षे लांबला आणि प्रकल्पाची रक्कम ७५० कोटी रुपयांवर गेली. काम पूर्ण नसतानाही पहिल्या टप्प्यात रक्कम मिळाल्याने ठेकेदाराची चांदी झाली. दुसरीकडे जनतेच्या पैशांचा चुराडा झाला. जनतेचे १४२ कोटी रुपये पाण्यात गेले आहेत. या प्रकरणी कोणावरही कारवाई झालेली नाही. राजकीय अभय मिळाल्याने आणि पदाधिकारी-अधिकारी-ठेकेदार या अभद्र युतीमुळे अद्यापही कोणावरही कारवाई झालेली नाही.१४२ कोटी रुपये गेले पाण्यातपिंपरी-चिंचवड उद्योगनगरीला पाणी मिळावे म्हणून शेतकऱ्यांच्या भावना लक्षात न घेता महापालिका व जिल्हा प्रशासनाने पवना बंदिस्त जलवाहिनीचा प्रश्न दामटून नेला. गोळीबारात तीन शेतकरी शहीद झाले. ठप्प झालेल्या या प्रकल्पाचे काय होणार, शहराला २४ तास पाणी कधी मिळणार, असा प्रश्न आहे. प्रकल्प थांबल्याने जनतेचे १४२ कोटी रुपये पाण्यात गेले आहेत.शेतकऱ्यांना मोबदला नाहीचशेतकऱ्यांवर विविध प्रकल्पांत अन्याय झालेला आहे. त्यांना अजूनही मोबदला दिलेला नाही. मृत शेतकऱ्यांची कौटुंबिक परिस्थिती हलाखीची आहे. त्यांचा प्रमुख आधार गेल्याने संबंधित कुटुंबातील व्यक्तीच्या घरातील सदस्याला महापालिका नोकरीत सामावून घ्यावे, महापालिकेच्या वतीने पाच लाखांची मदत देण्यात यावी, अशी मागणी केली. नोकरीचे आश्वासन पूर्ण केले असले, तरी मोबदला दिला गेलेला नाही, तसेच पवना धरणग्रस्तांचे आणखी प्रश्नही सोडविलेले नाहीत.